शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
4
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
5
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
6
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
7
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
8
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
9
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
10
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
11
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
12
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
13
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
14
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
15
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
16
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
17
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
18
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
19
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
20
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
Daily Top 2Weekly Top 5

अनुसूचित जमाती समितीचा दौरा

By admin | Updated: September 29, 2016 00:35 IST

निवेदनांचा वर्षाव : जिल्हा परिषद, कोळी महादेव संघटनेचे साकडे

नाशिक : जिल्हा दौऱ्यावर आलेल्या राज्याच्या विधान मंडळ अनुसूचित जमाती कल्याण समितीची भेट घेऊन जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांसह आदिवासी कोळी महादेव संघटनेने विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. जिल्हा समिती दौऱ्यावर आलेल्या समितीच्या पदाधिकाऱ्यांना भेटून अनेकांनी आपली भूमिका मांडली. शासनाकडे करण्यात आलेला पत्रव्यवहार, दिलेली निवेदने, मिळालेली आश्वासने याबाबत झालेल्या दिरंगाई बाबत समितीकडे अनेक सदस्यांनी लेखी स्वरूपात तक्रारी मांडल्या.१ जिल्हा परिषद अध्यक्ष विजयश्री चुंभळे यांनी समितीचे अध्यक्ष आमदार रूपेश म्हात्रे यांना २७०२ लेखाशीर्षचा निधी वळविल्याबाबत निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे की, जिल्हा परिषदेच्या सन २०१६-१७ आदिवासी व बिगर आदिवासी योजना लेखाशीर्ष २७०२ अंतर्गत मंजूर निधी जिल्हाधिकारी कार्यालयाने परस्पर जलयुक्त शिवार अभियानासाठी वर्ग करण्याबाबत जिल्हा परिषदेला पत्र पाठविले आहे. जिल्हा परिषदेच्या २४ सप्टेंबरच्या सर्वसाधारण सभेत जिल्हाधिकारी यांनी पाठविलेल्या पत्राचे वाचन करण्यात आल्यानंतर सभागृहातील सदस्य संतप्त झाले. हे पत्र निर्गमित करून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या हक्कावर अतिक्रमण केल्याची भावना सदस्यांची झाली आहे. वास्तविक पाहता जिल्हा परिषदेस निधी मंजुरी ही जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी परस्पर अशा प्रकारे निधी वळविणे चुकीचे आहे. त्यामुळे या प्रकारामुळे जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा स्थगित करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेले पत्र तत्काळ रद्द करण्यात यावे, असे निवेदनात म्हटले आहे. समाज कल्याण समिती सभापती उषा बच्छाव यांनी समिती अध्यक्ष आमदार रूपेश म्हात्रे यांना निवेदन दिले. जिल्ह्यातील देवळा, मालेगाव, कळवण व बागलाण या तालुक्यात ६० ते ७० हजार लोकसंख्या असलेला महादेव कोळी समाज आहे. या तालुक्यातील संबंधित समाजाच्या जात दाखल्यांना जात वैधता प्रमाणपत्र तत्काळ मिळावे, जात पडताळणीच्या जाचक अटी रद्द करण्यात याव्यात, ७० टक्के आदिवासी लोकसंख्या असलेल्या गावांचा आदिवासी क्षेत्रात समावेश करावा, १५ जून १९९५ च्या निर्णयानुसार आदिवासी कर्मचाऱ्यांना सेवेत देण्यात आलेल्या संरक्षणाची व्याप्ती वाढवावी आदि मागण्यांचा निवेदनात समावेश आहे. यावेळी सभापती शोभा डोखळे, सदस्य गोरख बोडके, प्रा. अशोक जाधव आदि उपस्थित होते.३ आदिवासी कोळी महादेव समाज संघटनेच्या वतीने अनुसूचित जमाती कल्याण समितीला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आदिवासी विकास विभागाच्या वसतिगृहांमध्ये विद्यार्थ्यांना सकस आहार व दर्जेदार भोजन मिळत नाही. अशी तक्रार करण्यात आली. भोजनाचा ठेकेदार विद्यार्थ्यांना अरेरावी करतो. त्याबाबत कार्यवाही व्हावी. यावेळी संघटनेचे पृथ्वीराज अंडे, प्रवीण कडाळे, देवीदास वाटाणे, दीपक श्रीखंडे, धनराज चेहेरे, रोशन गांगुर्डे, सुमीत कौले आदि उपस्थित होते.