शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

येवल्यात आंदोलनाला हिंसक वळण

By admin | Updated: June 2, 2017 00:53 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : शेतकऱ्यांच्या संपाला येवला येथे हिंसक वळण लागले़ गाड्यांवर दगडफेक करण्यासह वाहनांचे नुकसान करण्याच्या घटना घडल्या

 लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : शेतकऱ्यांच्या संपाला येवला येथे हिंसक वळण लागले़ गाड्यांवर दगडफेक करण्यासह वाहनांचे नुकसान करण्याच्या घटना घडल्या, दरम्यान, संपाचा आठवडे बाजारावर परिणाम झाल्याचे दिसून आले़येवल्यात अश्रुधुराचा मारागुरु वारी दुपारी आंदोलनाला हिंसक वळण लागले. पिंपळगाव जलाल टोलनाक्यावर दगडफेक करून गाड्यांचे नुकसान केले. यामध्ये पोलिसांच्या गाडीचे नुकसान झाल्याचे वृत्त आहे. दगडफेकीत पोलीस कर्मचारी जखमी झाला. पोलीस अधीक्षक अंकुश शिंदे यांच्यासह राज्य राखीव दलाची कुमक तत्काळ घटनास्थळी आली. यावेळी पोलीस अधीक्षक अंकुश शिंदे यांनी अश्रुधुराचा मारा करण्याचे आदेश दिले. यात चार अश्रुधुराच्या नळकांड्यांपैकी एक नळकांडे उंदीरवाडी येथील शेतकरी बापूसाहेब जाधव यांच्या पायावर लागल्याने ते जखमी झाले. त्यांना ग्रामीण रुग्णालयात आणण्यासाठी दोन युवकानी पुढाकार घेतला. मात्र आंदोलनकर्ते समजून उंदीरवाडी येथील सुनील राजुळे व दत्तात्रय पवार यांना पोलिसांनी लाठीचा प्रसाद दिला. या आंदोलनात पोलीस नाईक समाधान पाटील यांना डोक्याला दगड लागला असून, त्यांना येवला ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, पोलिसांनी प्लॅस्टिक बुलेटचे दोन राउंड फायर केल्याने आंदोलनकर्ते पसार झाले. सायंकाळी पोलिसांच्या हस्तक्षेपाने वाहतूक सुरळीत करण्यात आली. नांदुरी घाटात वाहनांची तपासणीकिसान क्र ांती मोर्चा व कळवण तालुक्यातील शेतकऱ्यांनी पुकारलेल्या संपाला कळवण तालुक्यात प्रतिसाद मिळाला असून, गुजरातकडे भाजीपाला व दूध जाऊ नये यासाठी नांदुरी घाटात तळ ठोकून वाहनांची तपासणी केली जात आहे.नांदुरी घाटातील कळवण- दिंडोरी हद्दीत नाशिककडे भाजीपाला घेऊन जाणारी वाहने अडवून वाहनांची तपासणी करून भाजीपाल्याची वाहने माघारी पाठवली. शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष देवीदास पवार व शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख कारभारी अहेर, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र भामरे, पोपट पवार यांनी आक्र मक भूमिका घेऊन दुपारी नांदुरी घाटात तळ ठोकून वाहने माघारी फिरवली. तालुकाध्यक्ष अ‍ॅग्रो डीलर असोसिएशनने शेतकरी संपाला पाठिंबा दिला असल्याची माहिती शेतकरी सेवा केंद्राचे संचालक राजेंद्र मालपुरे यांनी दिली. आंदोलनात पोपट पवार, दिलीप देशमुख, राजेंद्र अहेर, रत्नाकर गांगुर्डे, शिवाजी रौंदळ, संदीप पगार, रमेश वाघ आदींसह तालुक्यातील शेतकरी बांधव सहभागी झाले होते.आठवडे बाजारावर परिणामन्यायडोंगरी : शेतकरी संपात ग्रामीण भागातील शेतकरी वर्गाने सक्रिय सहभाग नोंदवला असून, तालुक्याचा आठवडे बाजारासह ग्रामीण भागात चांगलाच परिणाम जाणवत आहे. पालेभाज्या, दूध मिळेनासे झाले आहे. शेतकऱ्यांनी रस्त्यावरील भाजीपाला व्यापाऱ्यांची गाडी अडवून भाजी रस्त्यावर फेकण्याचा प्रकार अनेक ठिकाणी पाहावयास मिळाला. न्यायडोंगरी व परिसरातील पिंपरखेड, जळगाव खुर्द, सावरगाव, परधाडी, बाभूळवाडी या भागातील शेतकरी आपल्या विविध मागण्यांसाठी व शासनाचे लक्ष वेधण्यासाठी पुकारलेल्या संपात मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. न्यायडोंगरी परिसरातील शेतकऱ्यांनी येथील तलाठी यांना आपल्या विविध मागण्यांचे निवेदन दिले.