शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
2
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
3
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
4
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
5
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
6
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
7
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
8
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
9
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
10
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
11
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
12
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
13
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
14
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
15
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
16
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
17
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
18
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
19
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
20
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
Daily Top 2Weekly Top 5

उकड्यामुळे द्राक्षबागा पुन्हा संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2019 00:13 IST

डावणी व भुरी, घडकूज या रोगांपासून वाचलेल्या द्राक्षबागांवर आता उकड्याचे प्रमाण वाढल्याने बागा पुन्हा धोक्यात आल्या आहेत. बागेतील निम्म्यापेक्षा जास्त द्राक्षघड उकड्याला बळी पडले आहे, तर थंडीने द्राक्षमण्यांना तडे गेल्याने उत्पादनात घट येणार असल्याने द्राक्ष उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे.

पाटोदा : डावणी व भुरी, घडकूज या रोगांपासून वाचलेल्या द्राक्षबागांवर आता उकड्याचे प्रमाण वाढल्याने बागा पुन्हा धोक्यात आल्या आहेत. बागेतील निम्म्यापेक्षा जास्त द्राक्षघड उकड्याला बळी पडले आहे, तर थंडीने द्राक्षमण्यांना तडे गेल्याने उत्पादनात घट येणार असल्याने द्राक्ष उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे.गेल्या एक-दीड महिन्यापासून वातावरणात सतत बदल होत असल्याने द्राक्षबागांवर विविध रोगांनी थैमान घातले आहे. पहिला रोग आटोक्यात येण्याच्या वेळेस दुसरा रोग दारात उभा राहत असल्याने द्राक्षबागांवर बुरशीनाशके व औषध फवारण्या वाढल्याने उत्पादन खर्चात मोठी वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या मागे संकटांचे ग्रहण लागले आहे. संकटाचे ग्रहण सुटण्याची शक्यता कमी झाली आहे.अवकाळी पावसामुळे येवला तालुक्यातील निम्म्याहून जास्त द्राक्षबागांना यावर्षी फळधारणा न झाल्याने शेतकऱ्यांनी द्राक्षबागांसाठी एकरी चार ते पाच लाख रुपयांपर्यंत केलेला संपूर्ण खर्च वाया गेल्याने शेतकºयांचे नुकसान झाले आहे. ज्या काही थोड्याफार द्राक्षबागा वाचल्या होत्या त्या बागांना वातावरणातील बदलामुळे विविध रोगांना सामोरे जावे लागत आहे.औषध फवारणीचा परिणामगेल्या काही दिवसांपासून परिसरात पहाटे धुके, सकाळी दव व दिवसभर ढगाळ वातावरण राहत असल्यामुळे द्राक्षबागांवर डावणी, भुरी, घडकूज व इतर रोगांचा प्रादुर्भाव वाढल्याने या रोगांपासून बागा वाचविण्यासाठी शेतकरीवर्गाने द्राक्षबागांवर बुरशीनाशक व महागड्या औषधांची फवारणी केली. वातावरणातील सततचा होत असलेला बदल व या जास्तीच्या औषध फवारणीचा द्राक्षमण्यांवर परिणाम झाला असून, द्राक्षघडातील निम्म्यापेक्षा जास्त मणी उकड्याला बळी पडले आहेत. उकड्याने द्राक्षमणी हे नरम होऊन खराब होत असल्याने उत्पादक शेतकरी हवालदिल झाला असून,त्याला हुडहुडी भरली आहे.सतत बदलते वातावरण, थंडी, धुके, दव व पावसामुळे औषध फवारणी वाढली. वातावरण व औषध फवारणीचा ताळमेळ न बसल्याने उकड्याचे प्रमाण वाढले आहे. या उकड्याने शेतकºयांना लाखो रु पयांच्या नुकसानीस सामोरे जावे लागणार आहे.- लक्ष्मण शेळके,द्राक्ष उत्पादक, ठाणगाव

टॅग्स :agricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्र