शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
3
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
4
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
5
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
6
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
7
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
8
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
9
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
10
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
11
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
12
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
13
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
14
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
15
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
16
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
17
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
18
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
19
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
20
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या

उकड्यामुळे द्राक्षबागा पुन्हा संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2019 00:13 IST

डावणी व भुरी, घडकूज या रोगांपासून वाचलेल्या द्राक्षबागांवर आता उकड्याचे प्रमाण वाढल्याने बागा पुन्हा धोक्यात आल्या आहेत. बागेतील निम्म्यापेक्षा जास्त द्राक्षघड उकड्याला बळी पडले आहे, तर थंडीने द्राक्षमण्यांना तडे गेल्याने उत्पादनात घट येणार असल्याने द्राक्ष उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे.

पाटोदा : डावणी व भुरी, घडकूज या रोगांपासून वाचलेल्या द्राक्षबागांवर आता उकड्याचे प्रमाण वाढल्याने बागा पुन्हा धोक्यात आल्या आहेत. बागेतील निम्म्यापेक्षा जास्त द्राक्षघड उकड्याला बळी पडले आहे, तर थंडीने द्राक्षमण्यांना तडे गेल्याने उत्पादनात घट येणार असल्याने द्राक्ष उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे.गेल्या एक-दीड महिन्यापासून वातावरणात सतत बदल होत असल्याने द्राक्षबागांवर विविध रोगांनी थैमान घातले आहे. पहिला रोग आटोक्यात येण्याच्या वेळेस दुसरा रोग दारात उभा राहत असल्याने द्राक्षबागांवर बुरशीनाशके व औषध फवारण्या वाढल्याने उत्पादन खर्चात मोठी वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या मागे संकटांचे ग्रहण लागले आहे. संकटाचे ग्रहण सुटण्याची शक्यता कमी झाली आहे.अवकाळी पावसामुळे येवला तालुक्यातील निम्म्याहून जास्त द्राक्षबागांना यावर्षी फळधारणा न झाल्याने शेतकऱ्यांनी द्राक्षबागांसाठी एकरी चार ते पाच लाख रुपयांपर्यंत केलेला संपूर्ण खर्च वाया गेल्याने शेतकºयांचे नुकसान झाले आहे. ज्या काही थोड्याफार द्राक्षबागा वाचल्या होत्या त्या बागांना वातावरणातील बदलामुळे विविध रोगांना सामोरे जावे लागत आहे.औषध फवारणीचा परिणामगेल्या काही दिवसांपासून परिसरात पहाटे धुके, सकाळी दव व दिवसभर ढगाळ वातावरण राहत असल्यामुळे द्राक्षबागांवर डावणी, भुरी, घडकूज व इतर रोगांचा प्रादुर्भाव वाढल्याने या रोगांपासून बागा वाचविण्यासाठी शेतकरीवर्गाने द्राक्षबागांवर बुरशीनाशक व महागड्या औषधांची फवारणी केली. वातावरणातील सततचा होत असलेला बदल व या जास्तीच्या औषध फवारणीचा द्राक्षमण्यांवर परिणाम झाला असून, द्राक्षघडातील निम्म्यापेक्षा जास्त मणी उकड्याला बळी पडले आहेत. उकड्याने द्राक्षमणी हे नरम होऊन खराब होत असल्याने उत्पादक शेतकरी हवालदिल झाला असून,त्याला हुडहुडी भरली आहे.सतत बदलते वातावरण, थंडी, धुके, दव व पावसामुळे औषध फवारणी वाढली. वातावरण व औषध फवारणीचा ताळमेळ न बसल्याने उकड्याचे प्रमाण वाढले आहे. या उकड्याने शेतकºयांना लाखो रु पयांच्या नुकसानीस सामोरे जावे लागणार आहे.- लक्ष्मण शेळके,द्राक्ष उत्पादक, ठाणगाव

टॅग्स :agricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्र