शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

ग्राम विद्युत सेवक घेणार गावाची काळजी :नियोजन

By admin | Updated: April 12, 2017 14:07 IST

विस्कळीत वीजपुरवठा आणि वीजेचे वाढते दर अशा दुहेरी संकटात सापडलेल्या ग्राहकांना महावितरणचा चांगलाच फटका बसत आहे.

संदीप भालेराव / नाशिक : विस्कळीत वीजपुरवठा आणि वीजेचे वाढते दर अशा दुहेरी संकटात सापडलेल्या ग्राहकांना महावितरणचा चांगलाच फटका बसत आहे. विशेष म्हणजे ग्रामीण भागातील वीजेच्या संदर्भातील तक्रारींसाठी एखाद्या पोस्टमनसारखी गावकऱ्यांना लाईनमनची वाट पाहावी लागते. परंतु आता गावकऱ्यांची प्रतीक्षा संपणार असून शासनाने प्रत्येक गावात ग्राम विद्युत सेवक नियुक्त करण्याची तयारी चालविली आहे. महावितरणने प्रशासकीय खर्च कमी करण्यावर भर दिला आहे. त्यामुळे भरतीचा प्रश्न दुरच आहे. दुसरीकडे कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याने कमी मनुष्यबळावर महावितरणला ग्रामीण भागात सेवा दयावी लागते. कर्मचारी कमी असल्याने वीज गळती अर्थात वीजचोरीला आळा घालणे शक्य होत नसल्याने गळतीचे प्रमाणही मोठे आहे. त्यातही वीजचोरी रोखण्यात आलेल्या अपयशामुळेही गळतीचे प्रमाण वाढतच आहे.कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी असल्यामुळे ज्या प्रमाणे वीजव्यवस्थेवर नियंत्रण मिळविणे कठिंण असते त्याप्रमाणेच ग्राहकांच्या तक्रारींकडे लक्ष देण्यासही कर्मचारी अपुरे पडतात. या प्रकरणामुळे गावातील विद्युत डीपी, भारनियम, वीजतारा, विद्युत खांब, वीजचोरी तसेच वीज जोडणीच्या बाबतीतील तक्रारी ऐकण्यासाठीच कर्मचारी नसल्याने ग्रामीण भागात महावितरण आणि ग्राहकांमधील संवाद कमी होत चालल्याचे देखील महावितरणच्या लक्षात आले आहे. यावर तोडगा म्हणून महावितरणने काही उपायोजना चालविल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून ग्राम विद्युत सेवकाची संकल्पना पुढे आली आहे.