शहरं
Join us  
Trending Stories
1
...म्हणून तर आज सीमेवर शांतता नव्हती ना? भारत-पाकिस्तान युद्धविरामावर DGMO आज चर्चा करणार
2
मृत्यूने गाठण्यापूर्वी 'ती' "मला जगायचंय" एवढेच म्हणत राहिली अन् अखेरचा घेतला श्वास
3
ट्रम्पनी म्हटलं खूप छान, चीननं केलं उलट काम; असं काय चाललंय ज्याचा भारतावर थेट होऊ शकतो परिणाम?
4
India Pakistan War:भारत - पाकिस्तानमधील तणाव निवळतोय, रात्री कोणताही हल्ला झाला नाही; लष्कराने दिली माहिती
5
भारत-पाकिस्तान तणाव कमी करण्यासाठी अमेरिकेनं खरंच मध्यस्थी केली? जाणून घ्या, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
6
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
7
मुलांसाठी Post Office ची खास स्कीम, गॅरंटीड रिटर्न; विमा कव्हरसह बोनसही, अनेकांना याबद्दल कल्पनाही नाही
8
कुठलाही भारतीय पायलट ताब्यात नाही, आमच्या एका विमानाचं नुकसान; पाक लष्कराची कबुली
9
आजचे राशीभविष्य १२ मे २०२५ : हरवलेली वस्तू अचानकपणे सापडेल, कोणाच्या नशिबात काय...
10
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
11
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
12
हेअर ट्रान्सप्लांट करणं इंजिनिअरच्या जीवावर बेतलं; इंफेक्शनमुळे मृत्यू, डॉक्टरवर गुन्हा दाखल
13
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
14
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
15
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
16
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
17
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
18
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
19
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
20
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू

ग्राम विद्युत सेवक घेणार गावाची काळजी :नियोजन

By admin | Updated: April 12, 2017 14:07 IST

विस्कळीत वीजपुरवठा आणि वीजेचे वाढते दर अशा दुहेरी संकटात सापडलेल्या ग्राहकांना महावितरणचा चांगलाच फटका बसत आहे.

संदीप भालेराव / नाशिक : विस्कळीत वीजपुरवठा आणि वीजेचे वाढते दर अशा दुहेरी संकटात सापडलेल्या ग्राहकांना महावितरणचा चांगलाच फटका बसत आहे. विशेष म्हणजे ग्रामीण भागातील वीजेच्या संदर्भातील तक्रारींसाठी एखाद्या पोस्टमनसारखी गावकऱ्यांना लाईनमनची वाट पाहावी लागते. परंतु आता गावकऱ्यांची प्रतीक्षा संपणार असून शासनाने प्रत्येक गावात ग्राम विद्युत सेवक नियुक्त करण्याची तयारी चालविली आहे. महावितरणने प्रशासकीय खर्च कमी करण्यावर भर दिला आहे. त्यामुळे भरतीचा प्रश्न दुरच आहे. दुसरीकडे कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याने कमी मनुष्यबळावर महावितरणला ग्रामीण भागात सेवा दयावी लागते. कर्मचारी कमी असल्याने वीज गळती अर्थात वीजचोरीला आळा घालणे शक्य होत नसल्याने गळतीचे प्रमाणही मोठे आहे. त्यातही वीजचोरी रोखण्यात आलेल्या अपयशामुळेही गळतीचे प्रमाण वाढतच आहे.कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी असल्यामुळे ज्या प्रमाणे वीजव्यवस्थेवर नियंत्रण मिळविणे कठिंण असते त्याप्रमाणेच ग्राहकांच्या तक्रारींकडे लक्ष देण्यासही कर्मचारी अपुरे पडतात. या प्रकरणामुळे गावातील विद्युत डीपी, भारनियम, वीजतारा, विद्युत खांब, वीजचोरी तसेच वीज जोडणीच्या बाबतीतील तक्रारी ऐकण्यासाठीच कर्मचारी नसल्याने ग्रामीण भागात महावितरण आणि ग्राहकांमधील संवाद कमी होत चालल्याचे देखील महावितरणच्या लक्षात आले आहे. यावर तोडगा म्हणून महावितरणने काही उपायोजना चालविल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून ग्राम विद्युत सेवकाची संकल्पना पुढे आली आहे.