शहरं
Join us  
Trending Stories
1
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
3
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
4
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
5
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
6
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
7
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
8
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
9
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
10
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
11
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
12
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
13
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
14
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
15
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
16
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
17
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
18
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
19
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
20
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास

ग्राम विद्युत सेवक घेणार गावाची काळजी :नियोजन

By admin | Updated: April 12, 2017 14:07 IST

विस्कळीत वीजपुरवठा आणि वीजेचे वाढते दर अशा दुहेरी संकटात सापडलेल्या ग्राहकांना महावितरणचा चांगलाच फटका बसत आहे.

संदीप भालेराव / नाशिक : विस्कळीत वीजपुरवठा आणि वीजेचे वाढते दर अशा दुहेरी संकटात सापडलेल्या ग्राहकांना महावितरणचा चांगलाच फटका बसत आहे. विशेष म्हणजे ग्रामीण भागातील वीजेच्या संदर्भातील तक्रारींसाठी एखाद्या पोस्टमनसारखी गावकऱ्यांना लाईनमनची वाट पाहावी लागते. परंतु आता गावकऱ्यांची प्रतीक्षा संपणार असून शासनाने प्रत्येक गावात ग्राम विद्युत सेवक नियुक्त करण्याची तयारी चालविली आहे. महावितरणने प्रशासकीय खर्च कमी करण्यावर भर दिला आहे. त्यामुळे भरतीचा प्रश्न दुरच आहे. दुसरीकडे कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याने कमी मनुष्यबळावर महावितरणला ग्रामीण भागात सेवा दयावी लागते. कर्मचारी कमी असल्याने वीज गळती अर्थात वीजचोरीला आळा घालणे शक्य होत नसल्याने गळतीचे प्रमाणही मोठे आहे. त्यातही वीजचोरी रोखण्यात आलेल्या अपयशामुळेही गळतीचे प्रमाण वाढतच आहे.कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी असल्यामुळे ज्या प्रमाणे वीजव्यवस्थेवर नियंत्रण मिळविणे कठिंण असते त्याप्रमाणेच ग्राहकांच्या तक्रारींकडे लक्ष देण्यासही कर्मचारी अपुरे पडतात. या प्रकरणामुळे गावातील विद्युत डीपी, भारनियम, वीजतारा, विद्युत खांब, वीजचोरी तसेच वीज जोडणीच्या बाबतीतील तक्रारी ऐकण्यासाठीच कर्मचारी नसल्याने ग्रामीण भागात महावितरण आणि ग्राहकांमधील संवाद कमी होत चालल्याचे देखील महावितरणच्या लक्षात आले आहे. यावर तोडगा म्हणून महावितरणने काही उपायोजना चालविल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून ग्राम विद्युत सेवकाची संकल्पना पुढे आली आहे.