शहरं
Join us  
Trending Stories
1
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
2
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
3
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
4
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
5
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
6
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
7
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
8
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
9
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
10
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
11
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
12
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
13
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
14
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
15
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
16
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
17
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
18
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
19
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
20
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा

दरेवाडीचे ग्रामस्थ करणार मूळ जागेवर झेंडावंदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2019 17:40 IST

नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील नव्याने झालेल्या भाम धरणाच्या परिसरातील प्रकल्पग्रस्त नागरिकांच्या पुर्नवसनाच्या अडचणी अद्याप सोहविण्यात न आल्याने दरेवाडीच्या संतप्त प्रकल्पबाधितांनी २६ जोनेवरी रोजी सदरच्या मुळ जागेवर घषंडावंदन करण्याचा इरादा व्यक्त केला आहे.

ठळक मुद्देइगतपुरी : प्रकल्पबाधितांचा पुर्नवसनाकरीता आक्र मक पवित्रा

नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील नव्याने झालेल्या भाम धरणाच्या परिसरातील प्रकल्पग्रस्त नागरिकांच्या पुर्नवसनाच्या अडचणी अद्याप सोहविण्यात न आल्याने दरेवाडीच्या संतप्त प्रकल्पबाधितांनी २६ जोनेवरी रोजी सदरच्या मुळ जागेवर घषंडावंदन करण्याचा इरादा व्यक्त केला आहे.सदर प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न नवीन वर्षात तरी सुटतील अशी आशा होती, मात्र इगतपुरी तालुका तहसील प्रशासनाने शासनाकडे प्रस्ताव पाठवून डिसेंबर अखेर पर्यंत प्रश्न मार्गी लावू असे लेखी आश्वासन देऊनही अद्याप पुनर्वसनाच्या कुठल्याही हालचाली दिसत नसल्यामुळे संतप्त झालेल्या दरेवाडी ग्रामस्थानी प्रजासत्ताक दिनी आपल्या मूळ जागेत झेंडावंदन करून तिथेच पुन्हा राहण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचे निवेदन ग्रामस्थानी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा पुनर्वसन अधिकारी, इगतपुरी तहसीलदार व पोलीस प्रशासनाकडे दिले आहे. यामुळे पुन्हा एकदा भाम धरणग्रस्त नागरिकांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.इगतपुरी तालुक्यातील काळूस्ते येथे पंतप्रधान सिंचन योजनेतून सुमारे अडीच टीएमसी क्षमतेचे धरण बांधण्यात आलेले आहे. या धरणाच्या प्रारंभीपासून येथील प्रकल्प बाधितांच्या पुनर्वसनाचा मूळ प्रश्न शासनाकडून सोडविण्यात आलेला नाही. या धरणामुळे संपूर्ण दरेवाडी बाधित होऊन ग्रामस्थांची शंभर टक्के घरे पूर्णपणे पाण्याखाली गेली आहेत. त्यामुळे प्रशासनाने या नागरिकांना तात्पुरते शेड उभारून कसे बसे पुनर्वसन करण्याचा प्रयत्न केला असला तरी तो दरेवाडीकरांना मान्य नाही.नवीन हक्काच्या जागेत कायमस्वरूपी सर्व सोयीसुविधायुक्त जागेत पुनर्वसन करण्यासाठी ग्रामस्थांनी अनेकदा शासनाकडे आपली कैफियत मांडली. कित्येकदा अर्ज, विनंत्या ही करण्यात आल्या मात्र कुणीही दखल घेतली नाही. म्हणून गेल्या १० डिसेंबर रोजी श्रमजीवी संघटनेच्या माध्यमातून इगतपुरीच्या तहसील कार्यालयावर संतप्त प्रकल्पबाधित नागरिकांनी आपला बिºहाड मोर्चा काढून मूळ मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधले होते. त्यावेळी तहसीलदार वंदना खरमाळे व संबंधित अधिकारी यांनी लेखी उत्तर देऊन डिसेंबर अखेर शासनाकडे प्रस्ताव पाठवून प्रकल्पबाधितांचा विषय मार्गी लावण्याचे आश्वासन दिले होते.मात्र जानेवारीचा पंधरवाडा उलटून गेला तरी कसलीही दाद मिळत नसल्याचे बघून पुनर्वसनाची आस लावून बसलेल्या बाधित दरेवाडीकरांवर शासनाच्या व प्रशासनाच्या नाकर्ते पणामुळे पून्हा आपल्या मूळ जागेवर राहण्याची वेळ आली आहे. या मूळ ठिकाणी तुटलेली घरे, पडलेल्या भीती व पाणी असून जर या ठिकाणी काही बरेवाईट घडून धोका निर्माण झाल्यास याची संपूर्ण जबाबदारी शासनाची राहील असा इशारा निवेदनात देण्यात आलेला आहे. यामुळे इगतपुरी प्रशासनाची धावपळ उडाली आहे.या निवेदनावर शांताराम भगत, सीताराम गावंडा, बाळू गावंडा, अरु ण गावंडा, गणपत गावंडा, साईनाथ गावंडा, यशवंत पारधी आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.----------------शासनाने या धरणाची निर्मिती करतेवेळी प्रकल्पात गेलेल्या आदिवासी नागरीकांच्या जमिनीचा मोबदला देण्यात कसर केली आहे. अशी नागरिकांची तक्र ार आहे. शिवाय गत वर्षी भाम धरणात प्रथमच पाणी साठवले गेले. पुनर्वसनाच्या अटी शर्थी पूर्णपणे शसनाकडून पाळल्या गेल्याच नाही तर मग अधिकारी लोकांनी पाणी साठा करण्याची घाई का केली? असा सवाल उपस्थित झाला आहे.प्रथम र्पुावसन मगच पाणी हे धोरण शासनाकडून पाळण्यात आलेले नाही. संपूर्ण दरेवाडी बाधित असतांना पावसाळ्यात नागरिकांना गळक्या शेडमध्ये रहावे लागलेले आहे.----------------निवेदनाची प्रत. (फोटो १७ निवेदन)