शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

विंचूर येथे ग्रामसुरक्षा दलाची बैठक

By admin | Updated: July 30, 2014 00:21 IST

विंचूर येथे ग्रामसुरक्षा दलाची बैठक

विंचूर : येथे ग्रामसुरक्षा दलाची बैठक उत्साहात पार पडली. उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप आटोळे यांनी यावेळी मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, गावात शांतता राखण्यासाठी ग्रामसुरक्षा दलासह नागरिकांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. ग्रामीण भागात वाडी वस्त्यांवरील गुन्हेगारी घटनांना प्रतिबंध करण्याच्या दृष्टिकोनातून महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेंतर्गत सातव्या वर्षात गावपातळीवर ग्रामसुरक्षा दल स्थापना करण्यात आली आहे. या दलामुळे पोलीस यंत्रणेला अतिरिक्त कुमक उपलब्ध झाली आहे. गावात सर्व जाती धर्माचे लोक गुण्यागोविंदाने नांदत असतील तरच गावात लक्ष्मी नांदेल, असेही त्यांनी सांगितले. याप्रसंगी पंचक्रोशितील सरपंच व ग्रामसुरक्षा दलाचे प्रतिनिधी उपस्थित होते.परिसरात गणेशोत्सवासह आगामी विधानसभा निवडणूक शांततेत व्हाव्यात यासाठी बैठका आयोजित केल्या जात आहेत. गावाच्या सुरक्षेसाठी १८ ते ३५ वर्ष वयोगटातील युवकांचे ग्रामसुरक्षा दल कार्यरत ठेवल्यास चोऱ्या, लूटमार होणार नाहीत. त्यासाठी सर्वांनी लक्ष देऊन गावातील शांतता अबाधित ठेवा, असे आवाहन यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांनी केले. यावेळी उपस्थितांना नागरिकांनी सुरक्षिततेसाठी कोणकोणत्या उपाययोजना कराव्यात याची माहितीपत्रके दिली. परिसरातील नागरिकांनी आपल्या गावातील समस्या पोलीस प्रशासनापुढे मांडल्या असता त्यावर तत्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना उपविभागीय अधिकारी संदीप आटोळे यांनी दिल्या. याप्रसंगी विंचूरचे सरपंच अविनाश दुसाने, विष्णूनगरचे सरपंच किशोर मवाळ, धारणगाव वीरचे पोलीस पाटील विजयकुमार गंभीरे, सरपंच ज्ञानेश्वर गंभीरे, देवगाव सरपंच सुरेंद्र अढांगळे, डोंगरगावचे सरपंच बन्सी नागरे, कानळद सरपंच तानाजी जाधव यांसह सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आर.टी. तांदळकर, एल.के. धोक्रट, सूरज मेढे, राष्ट्रवादी तालुका उपाध्यक्ष प्रदीप तिपायले, विंचूर ग्रामपालिकेचे सदस्य देवीसिंग परदेशी, नीलेश गायकवाड, रणजीत गुंजाळ, महेंद्र पुंड, प्रकाश काळे, दीपक राऊत व परिसरातील ग्रामसुरक्षा दलाचे प्रतिनिधी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.