शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार विधानसभा निवडणुकीचा फैसला; ५ कोटी मतांच्या मोजणीकडे देशाचे लक्ष! मतमोजणीची वेळ काय?
2
दिल्ली हल्ल्यापूर्वी पैसा आला कुठून? एनआयएसोबत ईडी करणार चौकशी, गृह मंत्रालयात उच्चस्तरीय बैठकीत झाला निर्णय
3
मराठी अधिकारी करणार दिल्लीच्या स्फोटाचा तपास
4
द. आफ्रिकेच्या फिरकीपुढे परीक्षा, पहिली कसोटी ईडनवर आजपासून, ‘डब्ल्यूटीसी’मध्ये स्थान बळकट करण्याची भारताकडे संधी
5
व्हाइट कॉलर टेरर मॉड्यूल : काश्मिरात १३ ठिकाणी छापे
6
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
7
नवले पूल पुन्हा 'डेथ स्पॉट'; कंटेनर अपघातातील ९ मृतांमध्ये एका कुटुंबाचा समावेश
8
गोळ्या झाडून व्यावसायिकाचा खून करणाऱ्या संशयितांच्या शोधात पाच पथके रवाना
9
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
10
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
11
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
12
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
13
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
14
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
15
'माझ्या मृत्युला आईच जबाबदार, तिला कडक शिक्षा करा', सोलापुरात वकील तरुणाने बेडरुममध्येच संपवले आयुष्य
16
भाजपाला वनमंत्री गणेश नाईकांच्या जनता दरबाराचे बळ;  शिंदेसेनेच्या मंत्री सरनाईकना रोखण्यासाठी नाईक मैदानात 
17
दिल्लीनंतर आता मुंबईच्या आकाशावर जीपीएस स्पूफिंगचे सावट; सिग्नलमध्ये बिघाडबाबत एएआयने दिला इशारा
18
बिहारमध्ये NDA कडून मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार? मतमोजणीपूर्वीच चिराग पासवान यांच्या पक्षाचा मोठा दावा!
19
'इलेक्ट्रिक व्हेईकल्सना प्रोत्साहन देण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील लग्झरी वाहनांवर...', सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला
20
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
Daily Top 2Weekly Top 5

ग्राम विद्युत व्यवस्थापक योजना कागदावरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2018 01:48 IST

सायखेडा : खेडेगावात निर्माण होणाऱ्या विजेच्या समस्या तत्काळ सोडविण्यासाठी शासनाने तीन हजार लोकसंख्या असलेल्या गावातील विद्युत क्षेत्रातील आयटीआय केलेल्या बेरोजगार युवकांची निवड करण्यासंदर्भात आॅक्टोबर २०१६ मध्ये काढलेला शासननिर्णय एकदा सरकारी बस्तानात गुंडाळून ठेवला आहे.

सायखेडा : खेडेगावात निर्माण होणाऱ्या विजेच्या समस्या तत्काळ सोडविण्यासाठी शासनाने तीन हजार लोकसंख्या असलेल्या गावातील विद्युत क्षेत्रातील आयटीआय केलेल्या बेरोजगार युवकांची निवड करण्यासंदर्भात आॅक्टोबर २०१६ मध्ये काढलेला शासननिर्णय एकदा सरकारी बस्तानात गुंडाळून ठेवला आहे.राज्यात तीन हजार लोकसंख्या असलेली २३,६७१ गावे असून, या गावात विजेच्या अनेक समस्या निर्माण होत असतात. परिसरातील चार-पाच गावे मिळून एक वायरमनची नियुक्ती केलेली असते. अनेक गावे देखरेखीखाली असल्याने वायरमन अनेकवेळा तत्काळ उपलब्ध होत नाही. शिवाय खेड्यात शेतिपंप, शेतात वास्तव्याला असणारे शेतकरी यामुळे विजेचे जाळे पसरलेले आहे. कामे अनेक असल्याने वायरमन जाऊ शकत नाही. अशावेळी लोक खासगी व्यक्तींकडून कामे करून घेतात. मात्र त्यास जबाबदारी नसल्याने कामाचे स्वरूप बदलते किरकोळ कामासाठी नागरिकांना मोठी रक्कम मोजावी लागते. शिवाय काही दुर्घटना घडली तर वीज वितरण कंपनी जबाबदार नसते. त्यामुळे गावातील डीपीवरील फ्यूज बदलणे, डीओ टाकणे, मीटर बदलणे, तारा तुटल्यास त्या जोडणे, वीजबिल वाटप करणे, वीजबिल वसूल करणे यासारखी कामे करण्यासाठी गावातील योग्य शिक्षण झालेल्या उमेदवारांची मौखिक आणि प्रात्यक्षिक परीक्षा घेऊन मदतनीस म्हणून निवड करावी, असे पत्र वीज मंत्रालयाने आॅक्टोबर २०१६ मध्ये काढले होते.या आधारावर अनेक ग्रामपंचायतींनी गावातीलच बेरोजगार युवकांची निवड केली होती. काही महिने कामदेखील केले. मात्र त्यानंतर कोणत्याही शासकीय यंत्रनेने पुढील अंमलबजावणी केली नसल्याने ग्राम विद्युत व्यवस्थापकाची योजना अखेर शासनाने लाल फितीत गुंडाळून ठेवली आहे. यामुळे ग्रामीण भागातील विजेच्या समस्या कायम आहेत.

टॅग्स :electricityवीज