शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
3
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
4
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
5
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
6
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
7
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
8
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
9
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
10
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
11
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
12
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
13
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
14
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
15
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
16
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
17
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
18
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
19
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
20
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट

ग्राम विद्युत व्यवस्थापक योजना कागदावरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2018 01:48 IST

सायखेडा : खेडेगावात निर्माण होणाऱ्या विजेच्या समस्या तत्काळ सोडविण्यासाठी शासनाने तीन हजार लोकसंख्या असलेल्या गावातील विद्युत क्षेत्रातील आयटीआय केलेल्या बेरोजगार युवकांची निवड करण्यासंदर्भात आॅक्टोबर २०१६ मध्ये काढलेला शासननिर्णय एकदा सरकारी बस्तानात गुंडाळून ठेवला आहे.

सायखेडा : खेडेगावात निर्माण होणाऱ्या विजेच्या समस्या तत्काळ सोडविण्यासाठी शासनाने तीन हजार लोकसंख्या असलेल्या गावातील विद्युत क्षेत्रातील आयटीआय केलेल्या बेरोजगार युवकांची निवड करण्यासंदर्भात आॅक्टोबर २०१६ मध्ये काढलेला शासननिर्णय एकदा सरकारी बस्तानात गुंडाळून ठेवला आहे.राज्यात तीन हजार लोकसंख्या असलेली २३,६७१ गावे असून, या गावात विजेच्या अनेक समस्या निर्माण होत असतात. परिसरातील चार-पाच गावे मिळून एक वायरमनची नियुक्ती केलेली असते. अनेक गावे देखरेखीखाली असल्याने वायरमन अनेकवेळा तत्काळ उपलब्ध होत नाही. शिवाय खेड्यात शेतिपंप, शेतात वास्तव्याला असणारे शेतकरी यामुळे विजेचे जाळे पसरलेले आहे. कामे अनेक असल्याने वायरमन जाऊ शकत नाही. अशावेळी लोक खासगी व्यक्तींकडून कामे करून घेतात. मात्र त्यास जबाबदारी नसल्याने कामाचे स्वरूप बदलते किरकोळ कामासाठी नागरिकांना मोठी रक्कम मोजावी लागते. शिवाय काही दुर्घटना घडली तर वीज वितरण कंपनी जबाबदार नसते. त्यामुळे गावातील डीपीवरील फ्यूज बदलणे, डीओ टाकणे, मीटर बदलणे, तारा तुटल्यास त्या जोडणे, वीजबिल वाटप करणे, वीजबिल वसूल करणे यासारखी कामे करण्यासाठी गावातील योग्य शिक्षण झालेल्या उमेदवारांची मौखिक आणि प्रात्यक्षिक परीक्षा घेऊन मदतनीस म्हणून निवड करावी, असे पत्र वीज मंत्रालयाने आॅक्टोबर २०१६ मध्ये काढले होते.या आधारावर अनेक ग्रामपंचायतींनी गावातीलच बेरोजगार युवकांची निवड केली होती. काही महिने कामदेखील केले. मात्र त्यानंतर कोणत्याही शासकीय यंत्रनेने पुढील अंमलबजावणी केली नसल्याने ग्राम विद्युत व्यवस्थापकाची योजना अखेर शासनाने लाल फितीत गुंडाळून ठेवली आहे. यामुळे ग्रामीण भागातील विजेच्या समस्या कायम आहेत.

टॅग्स :electricityवीज