शहरं
Join us  
Trending Stories
1
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
2
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
3
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
4
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
5
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
6
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
7
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
8
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
9
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
10
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
11
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
12
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
13
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
14
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
15
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
16
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
17
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
18
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
19
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
20
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!

चिंचोलीत साजरी होणार एक गाव एक होळी

By admin | Updated: March 22, 2016 23:10 IST

चिंचोलीत साजरी होणार एक गाव एक होळी

 नायगाव : होळी सण साजरा करण्यासाठी वृक्षतोड न करता गवऱ्या व टाकाऊ वस्तूंची होळी करण्याचा संकल्प करत गावात एकच होळी पेटविण्याचा आदर्श ठराव चिंचोली येथे ग्रामसभेत एकमताने मंजूर करण्यात आल्याची माहिती पोलीस पाटील मोहन सांगळे यांनी दिली.दिवसेंदिवस विविध कारणांसाठी होणारी बेसुमार वृक्षतोड पर्यावरणाचे संतुलन बिघडवण्यास कारणीभूत ठरली आहे. वृक्षतोड थांबविण्यासाठी जागतिक स्तरावर विविध उपाययोजना राबविल्या जात आहे. या उपाययोजनांना हातभार लावण्यासाठी चिंचोलीकरांनी गावात एकच होळी पेटविण्याचा निर्णय घेतला आहे. वृक्षतोड थांबविण्यासाठी होळीत लाकडांचा वापर पूर्णपणे थांबवून गोवऱ्या, कपडे, खोके आदि टाकाऊ वस्तू टाकण्याचे आवाहन ग्रामसभेत करण्यात आले आहे. जंगल संवर्धन होण्यासाठी वृक्षतोड थांबविण्याचा संकल्प करत होळी सण साध्या पद्धतीने साजरा करण्याचा ठराव यावेळी एकमताने मंजूर करण्यात आला. यावेळी पोलीसपाटील सांगळे यांच्यासह तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष राजू नवाळे, शालेय समिती अध्यक्ष दत्तू नवाळे, सूर्यभान नवाळे, सोमनाथ दराडे, एकनाथ झाडे, राजू उगले, अनिल उगले, ज्ञानेश्वर सानप, पवन नवाळे, सुदेश तुपे, आर. पी. झाडे आदिंसह ग्रामस्थ बैठकीस मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)