शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
2
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
3
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
4
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
5
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
6
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
7
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
8
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
9
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
10
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
11
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
12
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
13
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
14
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
15
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
16
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
17
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
18
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
19
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
20
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई

विजयनगरला डेंग्यूसदृश रुग्णसंख्येत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2017 00:29 IST

गेल्या काही महिन्यांत विजयनगर परिसरात डेंग्यूसदृश आजाराचे रुग्ण आढळून आल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. परिसरातील अस्वच्छता आणि पाण्याच्या डबक्यांमुळे परिसरात डासांची उत्पत्ती वाढली असून, यामुळे रुग्णांचे प्रमाण वाढले असल्याचे बोलले जात आहे.

भगूर : गेल्या काही महिन्यांत विजयनगर परिसरात डेंग्यूसदृश आजाराचे रुग्ण आढळून आल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. परिसरातील अस्वच्छता आणि पाण्याच्या डबक्यांमुळे परिसरात डासांची उत्पत्ती वाढली असून, यामुळे रुग्णांचे प्रमाण वाढले असल्याचे बोलले जात आहे. विशेषत: विजयनगर परिसरात अशा प्रकारच्या रुग्णांचे प्रमाण अधिक असल्याने संपूर्ण परिसरात स्वच्छता करण्याबरोबरच रुग्णांची विशेष तपासणी करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.  कॅम्प परिसरातील कॉलनी परिसरात अर्धवट स्थितीत असलेले बांधकाम तसेच मोकळे भूखंड येथे पाण्याचे डबके साचलेले आहे. अर्धवट स्थितीत बांधकाम असल्याने याठिकाणी असलेल्या उघड्यावरील पाण्याच्या टाक्या आणि डबक्यांमुळे डासांचे प्रमाण वाढलेले आहे. मोकळ्या भूखंडावर वाढलेले गवत आणि स्वच्छतेचा अभाव असल्यामुळे आजारात वाढ झाली आहे. दीड महिन्यापूर्वीच कॉलनी परिसरातील एका मुलीला डेंग्यूची लागण झाली होती. त्यानंतर डेंग्यूचे अनेक रुग्ण आढळले होते. त्यावेळी परिसरातील स्वच्छतेची मोठ्या प्रमाणात मागणी करण्यात आली होती.  परिसरातील अनेक लोक आजारी असून, अनेकांना खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करावे लागले आहे. नाशिकरोड येथील बिटको रुग्णालयात देखील अनेकांवर उपचार सुरू आहेत. अर्धवट स्थितीतील बांधकामाकडे झालेले दुर्लक्ष, छावणी परिषदेने स्वच्छतेचा ठेका दिलेला आहे; मात्र त्यांच्यावर कुणाचाही अंकुश नसल्याने पुरेशी स्वच्छता नसल्याची देखील नागरिकांची तक्रार आहे.आरोप-प्रत्यारोपकॅन्टोन्मेंटच्या हद्दीत असलेल्या विजयनगरसह आजूबाजूच्या परिसरात डेंग्यूसदृश आजाराचे रुग्ण आढळत असताना छावणी परिषदेतील आजी-माजी उपाध्यक्ष आणि सदस्य एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करीत आहेत. आरोग्याच्या मुद्द्यावर बोलण्यापेक्षा भ्रष्टाचार आणि नोकरभरती आणि इतर अन्य विषयांवर बोलण्याच्या प्रकारामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याविषयी त्यांना कळकळ नसल्याची भावना व्यक्त केली जात आहे. प्रशासकीय कामकाज आणि प्रशासन चालविणे या दोन्ही आघाड्यांवर संबंधितांनी कामकाज केले तर आरोग्याचा प्रश्न सुटू शकेल, अशी भावना नागरिक व्यक्त करीत आहेत.