शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
2
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
3
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
4
‘कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरण माध्यमांतूनच कळाले’
5
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
6
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
7
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
8
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
9
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
10
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
11
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
12
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
13
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
14
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
15
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
16
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
17
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
18
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
19
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
20
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 

विजय मल्ल्यांचे कर्ज माफ केले

By admin | Updated: November 19, 2016 00:05 IST

आता माझेही करा,सफाई कामगाराचे स्टेट बॅँकेला साकडे

नाशिक : भारतीय स्टेट बॅँकेने उद्योगपती विजय मल्ल्या यांचे १२०० कोटी रुपयांचे कर्ज माफ केले, मी एक गरीब माणूस असून, सफाई कामगार आहे. त्यामुळे माझेही कर्ज याच धोरणानुसार माफ करावे, अशी मागणी त्र्यंबकेश्वर नगरपालिकेत काम करणाऱ्या भाऊराव सीताराम सोनवणे या कर्मचाऱ्याने स्टेट बॅँकेच्या त्र्यंबकेश्वर शाखेकडे केली आहे.देशातील सर्वात मोठी बॅँक असलेल्या स्टेट बॅँक आॅफ इंडियाने देशातील ६३ बड्या उद्योगपतींचे सात हजार कोटी रुपयांचे कर्ज माफ केले आहे. त्यात विदेशात पळून गेलेल्या मद्यसम्राट विजय मल्ल्या यांचा समावेश असून, त्यांचे एक हजार २०१ कोटी रुपयांचे कर्ज माफ करण्यात आले आहे. लोकमतच्या या बातमीचा संदर्भ घेऊनच त्र्यंबकेश्वर येथील या सफाई कामगाराने स्टेट बॅँकेत हे पत्र दिले आहे. भाऊराव सोनवणे याने आपल्या मुलाच्या आजारपणासाठी दीड लाख रुपयांचे कर्ज काढले आहे. तीन वर्षे मुदतीचे हे कर्ज आहे. यासंदर्भात बॅँकेच्या शाखा व्यवस्थापकांना दिलेल्या पत्रात त्यांनी म्हटले आहे की, भारतीय स्टेट बॅँक यांनी वैयक्तिक कर्ज उद्योगपती विजय मल्ल्या यांना भारतीय स्टेट बॅँकेचे असलेले १२०१ कोटी रुपयांचे कर्ज माफ केल्याचे लोकमत वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाले आहे, ही बाब अत्यंत चांगली आहे. तरी मी आपणास विनंती करतो की, मी एक गरीब घरातील असून, नगर परिषदेत सफाई कामगार या पदावर काम करतो. ज्या अर्थी आपली बॅँक मोठ्या उद्योगपतींचे कर्ज माफ करते, त्याचप्रमाणे माझे दीड लाख रुपयांचे वैयक्तिक कर्ज त्याच धोरणानुसार माफ करावे, ही विनंती असे नमूद करण्यात आले आहे. सोशल मीडियावरून हे पत्र व्हायरल झाले असून, सरकारचा उद्योगपतींना कर्जमाफी देण्याचा निर्णय आता सामान्यांना लागू करावा अशी टिप्पणी त्यावर होत आहे. (प्रतिनिधी)