शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडक्या बहिणीं’साठी अजित पवार यांनी आभाळातून पैसे आणायचे का? मंत्री मुश्रीफ यांचा टोला
2
पहलगाम हल्ल्यानंतर भारताला मिळाली जपानची साथ; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मानले आभार
3
मोदी सरकार देतंय ₹५ लाख लिमिट असलेलं क्रेडिट कार्ड; कसा मिळेल फायदा, जाणून घ्या
4
Nashik Crime: तिन्ही कोयत्यांवर जाधव बंधूंच्या रक्ताचे डाग आहेत तसेच; महाजनच्या घरात सापडली शस्त्रे
5
Ather Energy IPO चं अलॉटमेंट 'असं' करा चेक, ग्रे मार्केट प्रीमिअम काय देतोय संकेत?
6
POK नाही तर 'लाहोर'वरही भारताचा ताबा होता; UNSC च्या मध्यस्थीनं कसा वाचला पाकिस्तान?
7
आम्हाला वाचवा...भारताच्या मित्रराष्ट्रांसमोर पाकने पसरले हात; अमेरिका-रशियाने दिले 'हे' उत्तर
8
Rahul Gandhi: राहुल गांधी यांना मोठा दिलासा, नागरिकत्वाबाबत दाखल केलेली याचिका न्यायालयाने फेटाळली
9
संतोष देशमुखांच्या कन्येचे 12वीत घवघवीत यश; वैभवीने मिळवले 85.33 टक्के गुण...
10
शाब्बास पोरी! ३ वेळा नापास होऊनही मानली नाही हार, मजुराची लेक झाली IAS अधिकारी
11
PF Account मधून किती रक्कम तुम्ही काढू शकता? काय आहेत नियम आणि अटी
12
परीक्षेत नापास, आयुष्यात पास! दहावीत मुलगा फेल झाला तरी पालकांनी कापला केक, कारण...
13
गायीच्या शेणापासून बनवलेल्या रंगानेच सरकारी कार्यालये रंगवा; CM योगी आदित्यनाथ यांचे आदेश 
14
खळबळजनक! मनाविरुद्ध लग्न होताच काढला पतीचा काटा; बॉयफ्रेंडसह ७ जणांना अटक
15
'गँग्ज ऑफ वासेपूर', 'दबंग' फेम प्रसिद्ध कलाकाराचं दुःखद निधन, बॉलिवूडवर पसरली शोककळा
16
"पाकिस्तानी आर्मी तिथल्या तरुणांना आवडत नाही", बॉलिवूड सिंगरचा दावा, म्हणाला- "ते म्हणाले की तुम्ही भाग्यवान..."
17
IPL 2025: यंदा आरसीबीनं ट्रॉफी जिंकली नाही तर बायकोला घटस्फोट देणार; चाहत्याचा व्हिडीओ व्हायरल
18
उज्जैनच्या महाकाल मंदिरात भीषण आग, धुराचे लोट पाहून भाविकांनाही भरली धडकी!
19
बोगस शिक्षक भरती: जुने मुख्याध्यापक आणि अधिकारी म्हणतात, 'तो मी नव्हेच', बँक खाती गोठवले
20
'बाजीराव मस्तानी'मध्ये दिसल्या असत्या अलका कुबल; म्हणाल्या, "भन्साळींना भेटले पण त्यांनी..."

याद्यांमधील गोंधळास मतदारच जबाबदार

By admin | Updated: February 22, 2017 22:50 IST

प्रशासनाचा पवित्रा : मतदारांवरच फोडले खापर

नाशिक : महापालिका निवडणुकीसाठी मतदार याद्यांमध्ये झालेल्या गोंधळाची जबाबदारी घेण्यास मनपा प्रशासन तयार नाही, याउलट या गोंधळाला मतदारच जबाबदार असून, प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर त्यात योग्य त्या सुधारणा- दुरुस्त्या करून घेण्याची जबाबदारी मतदारांची होती, असा पवित्रा मनपा प्रशासनाने घेतला आहे.  महापालिका निवडणुकीसाठी मंगळवारी (दि.२१) मतदान घेण्यात आले. यंदा मतांचा टक्का वाढून मतदान विक्रमी ६२ टक्के नोंदविले गेले असले तरी जवळपास सर्वच प्रभागांमध्ये मतदार याद्यांमधील गोंधळाचा फटका शेकडो मतदारांना बसल्याने त्यांना मतदानापासून वंचित राहावे लागले. असंख्य मतदारांना त्यांची नावे मतदार यादीत शोधूनही सापडली नाहीत, तर शेकडो मतदारांचे वास्तव्य एका प्रभागात तर मतदान दुसऱ्या प्रभागात, अशी स्थिती निदर्शनास आली. एकाच कुटुंबातील सदस्यांना वेगवेगळ्या मतदान केंद्रांवर मतदान करावे लागले, तर अनेकांना नेहमीच्या मतदान केंद्रांऐवजी दूर अंतरावर पायपीट करत मतदानासाठी जावे लागले. मतदार यादीत नावे गायब झाल्याने पंचवटीतील म्हसरूळ याठिकाणी मतदारांकडून रास्ता रोकोचा प्रयत्न झाला, तर नाशिकरोड विभागातही मतदार यादीवरून गोंधळ उडाला. या साऱ्या गोंधळाबाबत महापालिका आयुक्त तथा निवडणूक अधिकारी अभिषेक कृष्ण यांनी मात्र, मतदारांनाच जबाबदार धरले आहे. ज्या मतदारांची तक्रार आहे त्यांनी तशी लेखी तक्रार करावी. (प्रतिनिधी)नाशिकरोडला पायरेटेड सीडीनाशिकरोडला मतदार यादीबाबत झालेल्या गोंधळाचे कारण निराळे होते. मतदार यादीत सुधारणा व दुरुस्त्यांचे काम सुरू असतानाच संबंधितांनी कुठून तरी मतदार यादी असलेली सीडी मिळविली आणि त्याच्या पायरेटेड कॉपी प्रभागात वाटल्या. त्यामुळे त्यात त्रुटी दिसून येणारच. महापालिकेने अंतिम मतदार यादी घोषित केल्यानंतर त्याच्या सीडी उपलब्ध करून दिल्या होत्या, असेही आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी स्पष्ट केले.वास्तविक प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केल्यानंतर त्यावर रीतसर हरकती व सूचना मागविण्यात आल्या होत्या. त्याचवेळी मतदारांनी आपले नाव यादीत आहे किंवा नाही, याची खात्री करून घेणे आवश्यक होते.  त्यावेळी प्राप्त ६५० हरकतींवर कार्यवाही करत प्रशासनाने त्या निकालीही काढल्या होत्या. मात्र, स्वत: जागृत न राहता ऐन मतदानाच्या वेळी ओरड करणे उचित नसल्याचेही आयुक्तांनी सांगितले.  उलट मतांचा टक्का वाढावा यासाठी महापालिका प्रशासन सातत्याने प्रयत्न करत आली आहे. त्यातूनच मतदानाची काही प्रमाणात टक्केवारी वाढण्यास मदत झाल्याचा दावाही त्यांनी केला.