शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
3
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
4
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
5
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
6
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
7
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
8
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
9
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
10
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
11
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
12
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
13
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
14
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
15
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
16
Bhendwal Bhavishyvani 2025: शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
17
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
18
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
19
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
20
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'

स्वातंत्र्य उपभोगतानाच सतर्कता आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2017 00:55 IST

हवे तसे जगण्याचा प्रत्येक स्त्रीला अधिकार आहे. तिला आवडत असतात त्या गोष्टी तिने निश्चित कराव्यात. हे साºया प्रकारचे स्वातंत्र्य उपभोगताना त्यामुळे होणाºया परिणामांची जबाबदारीही महिलांनाच घ्यावी लागणार आहे आणि त्यासाठी त्यांनी सिद्ध असणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन स्व-संरक्षक प्रशिक्षक अंजुषा चौघुले यांनी केले.

नाशिक : हवे तसे जगण्याचा प्रत्येक स्त्रीला अधिकार आहे. तिला आवडत असतात त्या गोष्टी तिने निश्चित कराव्यात. हे साºया प्रकारचे स्वातंत्र्य उपभोगताना त्यामुळे होणाºया परिणामांची जबाबदारीही महिलांनाच घ्यावी लागणार आहे आणि त्यासाठी त्यांनी सिद्ध असणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन स्व-संरक्षक प्रशिक्षक अंजुषा चौघुले यांनी केले. पोलीस आयुक्तालय व शासनाच्या महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने दादासाहेब गायकवाड सभागृहात आयोजित ‘मी माझी रक्षक’ या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. चौघुले पुढे म्हणाल्या की, आवडीचे पोषाख करणे, हव्या त्या वेळी हव्या त्या ठिकाणी जाणे, हवे ते खाणे-पिणे, मजा करणे या साºया गोष्टी करण्याचे स्वातंत्र्य महिलांना आहेत. हे स्वातंत्र उपभोगताना त्याचे काही परिणाम झाले तर मात्र महिलांनी त्याला सक्षमतेने तोंड देण्याची तयारी ठेवावी. ती असेल तरच तुम्ही निश्चिंतपणे जीवन जगू शकाल, असे सांगत त्यांनी महिलांनी स्व-संरक्षणाच्या विविध पैलूंबाबत प्रात्यक्षिकांसह माहिती दिली. यावेळी व्यासपीठावर आमदार देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे, महापौर रंजना भानसी, पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल, मिसेस ग्लोबल युनायटेड नमिता कोहोक, आंतरराष्टÑीय धावपटू कविता राऊत, मोनिका आथरे, महिला बालकल्याण विभागाच्या सचिव विनिता सिंगल, जिल्हा परिषदेचे उपकार्यकारी अधिकारी दत्तात्रय मुंढे, जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे, योग अभ्यासिका प्रज्ञा पाटील, रोहिणी दराडे, पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.शहरातील विविध क्षेत्रात उल्लोखनीय कामगिरी करणाºया महिलांचा मान्यवरांच्या हस्ते यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात बलदंड देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार देवयानी फरांदे व सीमा हिरे यांनी मनोगत व्यक्त केले. विनिता सिंगल यांनी महिलांना आज प्रत्येक टप्प्यावर निरनिराळ्या प्रश्नांना सामोरे जावे लागत आहे. त्याचा विचार करून महाराष्टÑ शासन निरनिराळ्या योजना व उपक्रमांद्वारे महिलांच्या सबलीकरणावर भर देत असल्याचे त्यांनी सांगितले. पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांनी सायबर गुन्हे, कुटुंबातील संवादाचे महत्त्व, सोशल मीडियाचा काळजीपूर्वक वापर आदींविषयी मार्गदर्शन केले. सीमा पेठकर यांनी सूत्रसंचालन केले.स्व-संरक्षणाचा गुरूमंत्रमहिलांनी स्व-संरक्षणासाठी आत्मविश्वास, आंतरशक्ती, सामान्यज्ञान, सतर्कता व तार्किकता या पंचसूत्रीचा हुशारीने वापर करावा. दररोज सकाळी स्वत:शी संवाद साधावा. महिलांनी वयाच्या कोणत्याही टप्प्यात शिकणे, स्वत:ला अद्ययावत करणे थांबवू नये. मागे पडलेल्या आवडी-निवडी वेळ मिळताच पूर्ण कराव्यात. शारीरिक, भावनिक आणि आर्थिकदृष्ट्या सक्षमता आणावी. छोट्या-छोट्या कामांसाठी परावलंबित्व कमी करावे. घरात, समाजात वावरताना वाईट प्रवृत्तीच्या माणसांकडून शारीरिक त्रास दिला जात असेल तर त्याला कडकपणे प्रतिकार करा, अशा अनेक महत्त्वपूर्ण सूचना अंजुषा चौघुले यांनी यावेळी केल्या.