शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
4
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
5
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
6
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
7
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
8
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
9
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
10
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
11
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
12
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
13
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
14
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
15
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
16
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
17
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
18
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
19
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
20
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू

वीज समस्येने बळीराजा त्रस्त

By admin | Updated: October 30, 2014 22:56 IST

वीज समस्येने बळीराजा त्रस्त

ममदापूर : येवला तालुक्यातील ममदापूर परिसरात शेतकरी विजेमुळे त्रस्त झाला आहे. विद्युतवितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना कुठलेही गांभीर्य नसल्याने शेतकरी वर्गात कमालीची अस्वस्थता पसरली आहे.या परिसरात पाऊस कमी असल्याने विहिरींनादेखील पाणी कमी आहे. तरीदेखील गुडघे वस्तीवरील डीपी गेल्या दहा दिवसांत तीन वेळेस जळाल्याने शेतकरी हैराण झाले आहे. सुरुवातीला डीपी जळाल्याने शेतकऱ्यांनी मनमाड येथून डीपी आणली; परंतु दोनच दिवसांत सदर डीपी जळाली. त्यानंतर शेतकऱ्यांनी वर्गणी काढून पुन्हा मनमाड येथून डीपी आणली, असे तीन वेळेस झाले. त्यामुळे मनमाडवरून मिळणारी डीपी ही जुनी किंवा जळालेली असते की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे. फक्त शेतकऱ्यांची समजूत म्हणून मनमाड येथून डीपी दिली जाते. शेतकऱ्यांना अद्यापपर्यंत कुठलेही उत्पादन मिळाले नाही. त्यामुळे थोडे पाणी विहिरीत असूनदेखील ते पिकांना देता येत नसल्याने व विद्युत वितरण कंपनीचे अधिकारी याचा गांभीर्याने विचार करत नसल्याने शेतकरी अधिकच अडचणीत सापडला आहे. (वार्ताहर)