शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
4
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
5
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
6
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
7
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
8
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
9
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
10
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
11
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
12
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
13
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
14
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
15
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
16
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
17
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
18
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
19
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
20
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?

केंद्राच्या धोरणामुळे बळीराजा त्रस्त

By admin | Updated: September 2, 2014 01:11 IST

केंद्राच्या धोरणामुळे बळीराजा त्रस्त

नायगाव : विविध नैसर्गिक संकटांना तोंड देत पिकविलेला कांदा यंदा केंद्र शासनाच्या शेतकरीविरोधी धोरणामुळे बाजार समितीत कवडीमोल किमतीत विकावा लागला. निर्यातबंदी केल्याने बळीराजा त्रस्त झाला आहे. आता शेतकऱ्यांकडील कांदा चाळीत नासून गेला व संपल्यानंतर निर्यातबंदी उठवल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.केंद्र शासनाने कांद्याचे निर्यातमूल्य वाढवितानाच त्याची रवानगी जीवनावश्यक वस्तूंच्या यादीत केल्याने सध्या शेतकऱ्यांचे अच्छे दिन येण्याचे स्वप्न भंगलेच, परंतु ‘बुरे दिन’ आल्याची अनुभूती येऊ लागली आहे. देशात थेट इजिप्तहून कांद्याची आयात करून त्यावर कडी करण्यात आल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांच्या मालाच्या किमतींमध्ये चढउतार होत होते. कांद्याचे उत्पादन कमी झाले अथवा परदेशातील मागणी वाढल्यावर निर्यात वाढली की त्यांचे दर वाढत होते. त्यातून काही शेतकऱ्यांचा फायदा होत होता. त्याच वेळी लोकसभा निवडणुकीत मोदींच्या ‘अच्छे दिन आनेवाले है’ या घोषणेमुळे देशभरातील अन्नदात्याने त्यांच्या झोळीत मतांचे दान टाकले. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यावर आता चांगले खरोखरच चांगले दिवस येतील, शेतमालाला चांगले दर मिळतील, दोन पैसे खिशात खुळखुळू लागतील, मुला-बाळींचे लग्न करता येतील, कर्जाचा बोझा कमी होण्यास मदत होईल, शेतात प्रगती करता येईल अशी भाबडी स्वप्ने पहाणाऱ्या शेतकऱ्यांच्या पदरी मात्र घोर निराशा पडली आहे. मोदी सरकारने कृषी प्रधान देशातील पिकविणाऱ्या गरीब अन्नदात्याचे हित पहाण्याऐवजी शहरी नागरिकांचे हित जोपासल्याचे सध्या दिसून येत आहे. त्यामुळे अन्नदात्याला ‘चांगले’ दिवस येणे दूरच मात्र वाईट दिवसांचा सामना करण्याची वेळ आल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकांवरही त्याचा परिणाम होणार असल्याचे गावागावांध्ये बोलले जात आहे. देशात सर्वाधिक संख्या शेतकऱ्यांची आहे. शहरातील नोकरदारवर्गामध्येही अनेक शेतकऱ्यांची मुले आहेत. शेतीसाठी लागणाऱ्या कारखान्यातून तयार होणारे व शेतकऱ्यांना विक्री करणारे बी-बियाणे, रासायनिक खते, कीटकनाशके, शेती औजारे यांच्या किमती भरमसाठ वाढल्या आहेत. त्यामुळे उत्पादन खर्चात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. मात्र शेतकऱ्यांच्या एकाही मालाला बाजारात समाधानकारक दर मिळत नाही. त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी होऊ लागले आहेत. बळीराजा संकटात सापडला आहे. मात्र सत्ताधारी व विरोधी असे कोणतेही राजकीय नेते शेतकऱ्यांच्या बाजूला उभे राहत नसल्याने ‘कोणी न्याय देईल का, न्याय?’ अशी आर्त हाक बळीराजा देऊ लागला आहे. (वार्ताहर)