शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

केंद्राच्या धोरणामुळे बळीराजा त्रस्त

By admin | Updated: September 2, 2014 01:11 IST

केंद्राच्या धोरणामुळे बळीराजा त्रस्त

नायगाव : विविध नैसर्गिक संकटांना तोंड देत पिकविलेला कांदा यंदा केंद्र शासनाच्या शेतकरीविरोधी धोरणामुळे बाजार समितीत कवडीमोल किमतीत विकावा लागला. निर्यातबंदी केल्याने बळीराजा त्रस्त झाला आहे. आता शेतकऱ्यांकडील कांदा चाळीत नासून गेला व संपल्यानंतर निर्यातबंदी उठवल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.केंद्र शासनाने कांद्याचे निर्यातमूल्य वाढवितानाच त्याची रवानगी जीवनावश्यक वस्तूंच्या यादीत केल्याने सध्या शेतकऱ्यांचे अच्छे दिन येण्याचे स्वप्न भंगलेच, परंतु ‘बुरे दिन’ आल्याची अनुभूती येऊ लागली आहे. देशात थेट इजिप्तहून कांद्याची आयात करून त्यावर कडी करण्यात आल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांच्या मालाच्या किमतींमध्ये चढउतार होत होते. कांद्याचे उत्पादन कमी झाले अथवा परदेशातील मागणी वाढल्यावर निर्यात वाढली की त्यांचे दर वाढत होते. त्यातून काही शेतकऱ्यांचा फायदा होत होता. त्याच वेळी लोकसभा निवडणुकीत मोदींच्या ‘अच्छे दिन आनेवाले है’ या घोषणेमुळे देशभरातील अन्नदात्याने त्यांच्या झोळीत मतांचे दान टाकले. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यावर आता चांगले खरोखरच चांगले दिवस येतील, शेतमालाला चांगले दर मिळतील, दोन पैसे खिशात खुळखुळू लागतील, मुला-बाळींचे लग्न करता येतील, कर्जाचा बोझा कमी होण्यास मदत होईल, शेतात प्रगती करता येईल अशी भाबडी स्वप्ने पहाणाऱ्या शेतकऱ्यांच्या पदरी मात्र घोर निराशा पडली आहे. मोदी सरकारने कृषी प्रधान देशातील पिकविणाऱ्या गरीब अन्नदात्याचे हित पहाण्याऐवजी शहरी नागरिकांचे हित जोपासल्याचे सध्या दिसून येत आहे. त्यामुळे अन्नदात्याला ‘चांगले’ दिवस येणे दूरच मात्र वाईट दिवसांचा सामना करण्याची वेळ आल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकांवरही त्याचा परिणाम होणार असल्याचे गावागावांध्ये बोलले जात आहे. देशात सर्वाधिक संख्या शेतकऱ्यांची आहे. शहरातील नोकरदारवर्गामध्येही अनेक शेतकऱ्यांची मुले आहेत. शेतीसाठी लागणाऱ्या कारखान्यातून तयार होणारे व शेतकऱ्यांना विक्री करणारे बी-बियाणे, रासायनिक खते, कीटकनाशके, शेती औजारे यांच्या किमती भरमसाठ वाढल्या आहेत. त्यामुळे उत्पादन खर्चात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. मात्र शेतकऱ्यांच्या एकाही मालाला बाजारात समाधानकारक दर मिळत नाही. त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी होऊ लागले आहेत. बळीराजा संकटात सापडला आहे. मात्र सत्ताधारी व विरोधी असे कोणतेही राजकीय नेते शेतकऱ्यांच्या बाजूला उभे राहत नसल्याने ‘कोणी न्याय देईल का, न्याय?’ अशी आर्त हाक बळीराजा देऊ लागला आहे. (वार्ताहर)