शहरं
Join us  
Trending Stories
1
हल्ला थांबवू शकत नाही, इराणला प्रत्युत्तर देणे गरजेचे..; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर नेतन्याहूंचे उत्तर
2
“देशभरात मराठी भाषा लागू करणार का?”; हिंदी सक्तीवरुन मनोज जरांगेंचा सरकारला थेट सवाल
3
Viral Video : एक बाईक अन् १० लोक! दुचाकीस्वाराचा जुगाड बघून डोकं चक्रावेल
4
इस्रायलने सीझफायर तोडले, ट्रम्प प्रचंड नाराज; म्हणाले, तातडीने पायलटना माघारी बोलवा...
5
EPFO ची मोठी घोषणा; आता मिळणार ५ लाख रुपयांपर्यंतचा अ‍ॅडव्हान्स PF, जाणून घ्या...
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इस्रायलने केला इराणवर हल्ला, तेहरान स्फोटांनी हादरले!
7
यशस्वी जैस्वाल पुन्हा चुकला! चौथा कॅच सोडला अन् इंग्लंडला दुसरा शतकवीर मिळाला
8
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
9
आधी सेलिब्रेशन! आता 'रेड अलर्ट' Look सह शुबमन गिलमध्ये दिसली विराटची झलक
10
तुर्कीला धडा शिकवण्याची तयारी सुरू?; सर्वात मोठ्या शत्रूच्या देशात पोहचले भारतीय हवाई दल प्रमुख
11
“वायनाडमध्ये वाढलेले मतदार लोकशाही, महाराष्ट्रात वाढले तर चोरी?”; BJPचा राहुल गांधींना सवाल
12
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
13
मुंबईतील बड्या उद्योजकाचे गुप्त ‘महादान’; अयोध्येतील राम मंदिराला तब्बल १७५ किलो सोने अर्पण
14
डॅशिंग 'शिवा' खऱ्या आयुष्यात आहे खूपच बोल्ड; पूर्वा कौशिकचं नवं फोटोशूट पाहिलंत का?
15
Panchayat 4 Review : 'वो अफ़्साना जिसे अंजाम तक लाना न हो मुमकिन..'; दुर्दैवाने 'पंचायत ४'विषयी हेच म्हणावं लागेल
16
Nuclear Weapon : कोणता देश अणुबॉम्ब बनवतोय अन् कोणता नाही? कसं आणि कोण ठेवतं लक्ष? जाणून घ्या...
17
“भास्कर जाधवांनी शिंदेंचे नेतृत्व स्वीकारले तर आनंद, मातोश्रीवरचा राग...”; कुणी दिला सल्ला?
18
दिलजीत दोसांझच्या सिनेमात पाकिस्तानी अभिनेत्रीची भूमिका, टीका झाल्यावर म्हणाला...
19
Rahul Gandhi :'निवडणुका नियमांनुसार होतात', राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाचे उत्तर; चर्चेसाठी बोलावले
20
अपघाताच्या एक दिवस आधी एअर इंडियाच्या सीईओंचा पगार ४६% वाढवला; आता किती पैसे मिळतात?

यात्रेपूर्वीच दोनशे बोकडांचा बळी

By admin | Updated: February 20, 2016 22:02 IST

वडांगळी : सतीमाता-सामतदादांचा आजपासून यात्रोत्सव

वडांगळी : वैशिष्ट्यपूर्ण परंपरा व रूढी जपणाऱ्या देशभरातील बंजारा समाजाचे आराध्य दैवत असलेल्या वडांगळी येथील सतीमाता व सामतदादा यात्रोत्सवास रविवार (दि. २१) पासून प्रारंभ होत आहे. यानिमित्त विविध धार्मिक व करमणुकीच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात्रोत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे. दरम्यान, यात्रेला प्रारंभ होण्यापूर्वीच दोनशेहून अधिक बोकडांचा बळी देत बंजारा भाविकांनी नवसपूर्तीस प्रारंभ केला आहे. प्रतिवर्षी माघ पौर्णिमेस होणाऱ्या यात्रेच्या निमित्ताने येथे बंजारा समाजाचा जणू कुंभमेळाच भरत असतो. या समाजातील महिला व पुरुषांनी काळाच्या ओघात आपली पारंपरिक वेशभूषा बाजूला सारल्याचे दिसत असले तरी आपल्या रूढी, प्रथा व परंपरा मात्र सोडल्याचे दिसत नाही. धोतर अथवा चोळणा, अंगरखा आणि डोक्यावर लाल रंगाचे पागोटे असा या बंजारा समाजातील पुरुषांचा पूर्वीचा पेहराव असे, तर लाल रंगाचा घागरा, चोळी, कशिदा, कवड्या व आरशांच्या तुकड्यांनी सजविलेली भडक ओढणी, हातात हस्तीदंती कडे, शिंंगांच्या व पितळेच्या बांगड्या असा महिलांचा पोशाख मोठ्या प्रमाणावर दिसायचा. तथापि, कालपरत्वे राहणीमानात बदल दिसत असून पुरुष इतरांसारखे शर्ट-पॅण्ट तर स्त्रिया सहावारी साड्या परिधान करू लागल्या आहेत. या समाजाकडून पूर्वी ऊस तोडणीची कामे मोठ्या प्रमाणावर केली जात. मात्र शैक्षणिक सुविधा सर्वत्र उपलब्ध झाल्याने अनेकजण उच्चशिक्षण घेऊन नोकरी-व्यवसाय करू लागल्याचेही आढळून येते. प्रथमश्रेणी अधिकारी म्हणून काहीजण कार्यरत आहेत. इतकेच नव्हे तर राजकीय क्षेत्रातही यांनी आपला ठसा उमटविला आहे. कै. वसंतराव फुलसिंग नाईक, कै. सुधाकरराव नाईक यांनी राज्याचे मुख्यमंत्रिपद भूषविले. विद्यमान महसूल राज्यमंत्री संजय राठोड हेही याच समाजाचे आहेत. गळीत हंगामात ऊस तोडणीसाठी आजही ग्रामीण भागात या समाजाचे तांडे मोठ्या संख्येने काम करताना आढळतात.प्रवासाची साधने कमी असल्यापासून बंजारा भाविक विदर्भ-मराठवाड्यातून बैलगाड्यांत बसून शेकडो मैलांचा प्रवास करीत यात्रेसाठी येत असत; मात्र आर्थिक स्थिती उंचावलेले बंजारा बांधव बदलत्या काळात स्वत:च्या वातानुकूलित वाहनातून यात्रेसाठी येतात. राहणीमानात बदल झाला; मात्र त्यांचे अंतरंग रूढी, प्रथा व परंपरांना धरून असल्याचे दिसते. संततीप्राप्ती, विवाह, नोकरी आदिंच्या नवसपूर्तीसाठी एका कुटुंबाकडून किमान १ ते ५ बोकडांचे बळी दिले जातात. यात्रा काळात उघड्यावर बोकडबळी देण्यावर बंदी घालण्यात आल्यामुळे ट्रस्टच्या वतीने स्वतंत्र वधगृह बांधण्यात आले आहे. यामुळे उघड्यावरील बोकडबळीला आळा बसला आहे; मात्र बोकडबळी बंद करण्यासाठी अद्याप तरी एकाही संस्थेला विशेष यश लाभल्याचे दिसत नाही. अनेक संस्था केवळ प्रसिद्धी मिळविण्यासाठी तात्पुरते प्रबोधन करीत असल्याची चर्चा आहे. उघड्यावर होणाऱ्या बोकडबळींना मज्जाव केल्याने ते वधगृहात होत आहेत. ट्रस्ट व प्रशासकीय यंत्रणेचे यश एवढ्यापुरते सीमित आहे; मात्र सेवाभावी संस्थांनीच आवाज उठवून ते करण्यास भाग पाडले. बोकडबळी पूर्णत: बंद करण्यात संस्थांना यश मिळाले नसले तरी या संस्थाही खचलेल्या नाहीत. त्यामुळे आज ना उद्या नवसासाठीचे बोकडबळी बंद होतील अशी आशा पुरोगामी कार्यकर्त्यांना वाटते आहे. (वार्ताहर) दरम्यान, यात्रा सुरू होण्यापूर्वी गेल्या आठवडाभरात भाविकांनी नवसपूर्तीसाठी सुमारे दोनशेहून अधिक बोकडांचा बळी दिला आहे.