शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
2
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
3
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
4
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
5
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
6
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी
7
युक्रेननंतर आता रशियाने पोलंडवर हल्ला केला? रशियन ड्रोनच्या प्रवेशामुळे नाटो देशांमध्ये घबराट
8
मागे धगधगतं संसद भवन अन् पुढ्यात Gen-Z आनंदोलनकर्त्याचे ठुमके! नेपाळमधील Viral Video
9
Ghibli चे दिवस गेले! Nano banana model/BANDAI-style ट्रेंडिंग इमेज ट्राय केली का? 'हा' घ्या Prompt
10
भारतीय क्रिकेटरने स्वत:च्या हानिमून ट्रिपला रिंकू सिंगलाही नेलं होतं सोबत, वाचा धमाल किस्सा
11
११ वर्षांच्या मुलीने असा लावला नेपाळमधील ओली सरकारला सुरुंग, तो अपघात घडला आणि....
12
Urban Company IPO लाँच, जबरदस्त ग्रोथ आणि अधिक मूल्यांकन; काय आहे अधिक माहिती, गुंतवणूक करावी का? 
13
नेपाळमध्ये निदर्शने, सत्तापालट सुरू असतानाच आता पाकिस्तानच्या या प्रांतात बंद, जनता संतापली
14
'सरकारचे कौतुक, पण धोका दिल्यास सोडणार नाही': मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा
15
भारताबाबत ट्रेड डीलवर ट्रम्प यांची एक पोस्ट आणि 'या' शेअर्समध्ये सुस्साट तेजी; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
16
भारत-नेपाळ सीमेवरून घुसखोरीचा प्रयत्न; नेपाळच्या तुरुंगातून पळालेल्या ५ कैद्यांचा अटक
17
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंसह २ प्रमुख नेते 'शिवतीर्थ'वर दाखल; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची घेतली भेट
18
सुलतानी संकटाचे बळी! एका महिन्यात १०१ शेतकऱ्यांची मृत्यूला मिठी; दोन जिल्ह्यांतच ६७ घटना
19
"सामान्य भक्तांना धक्काबुक्की, मारहाण हाच त्यांचा खरा चेहरा...", 'लालबागचा राजा' मंडळाला मराठी अभिनेत्रीच्या नवऱ्याने सुनावलं
20
संकष्ट चतुर्थी 2025: पितृपक्षातील संकष्टीला चंद्रोदय कधी? पहा गणेश पूजन विधी आणि शुभ मुहूर्त

यात्रेपूर्वीच दोनशे बोकडांचा बळी

By admin | Updated: February 20, 2016 22:02 IST

वडांगळी : सतीमाता-सामतदादांचा आजपासून यात्रोत्सव

वडांगळी : वैशिष्ट्यपूर्ण परंपरा व रूढी जपणाऱ्या देशभरातील बंजारा समाजाचे आराध्य दैवत असलेल्या वडांगळी येथील सतीमाता व सामतदादा यात्रोत्सवास रविवार (दि. २१) पासून प्रारंभ होत आहे. यानिमित्त विविध धार्मिक व करमणुकीच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात्रोत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे. दरम्यान, यात्रेला प्रारंभ होण्यापूर्वीच दोनशेहून अधिक बोकडांचा बळी देत बंजारा भाविकांनी नवसपूर्तीस प्रारंभ केला आहे. प्रतिवर्षी माघ पौर्णिमेस होणाऱ्या यात्रेच्या निमित्ताने येथे बंजारा समाजाचा जणू कुंभमेळाच भरत असतो. या समाजातील महिला व पुरुषांनी काळाच्या ओघात आपली पारंपरिक वेशभूषा बाजूला सारल्याचे दिसत असले तरी आपल्या रूढी, प्रथा व परंपरा मात्र सोडल्याचे दिसत नाही. धोतर अथवा चोळणा, अंगरखा आणि डोक्यावर लाल रंगाचे पागोटे असा या बंजारा समाजातील पुरुषांचा पूर्वीचा पेहराव असे, तर लाल रंगाचा घागरा, चोळी, कशिदा, कवड्या व आरशांच्या तुकड्यांनी सजविलेली भडक ओढणी, हातात हस्तीदंती कडे, शिंंगांच्या व पितळेच्या बांगड्या असा महिलांचा पोशाख मोठ्या प्रमाणावर दिसायचा. तथापि, कालपरत्वे राहणीमानात बदल दिसत असून पुरुष इतरांसारखे शर्ट-पॅण्ट तर स्त्रिया सहावारी साड्या परिधान करू लागल्या आहेत. या समाजाकडून पूर्वी ऊस तोडणीची कामे मोठ्या प्रमाणावर केली जात. मात्र शैक्षणिक सुविधा सर्वत्र उपलब्ध झाल्याने अनेकजण उच्चशिक्षण घेऊन नोकरी-व्यवसाय करू लागल्याचेही आढळून येते. प्रथमश्रेणी अधिकारी म्हणून काहीजण कार्यरत आहेत. इतकेच नव्हे तर राजकीय क्षेत्रातही यांनी आपला ठसा उमटविला आहे. कै. वसंतराव फुलसिंग नाईक, कै. सुधाकरराव नाईक यांनी राज्याचे मुख्यमंत्रिपद भूषविले. विद्यमान महसूल राज्यमंत्री संजय राठोड हेही याच समाजाचे आहेत. गळीत हंगामात ऊस तोडणीसाठी आजही ग्रामीण भागात या समाजाचे तांडे मोठ्या संख्येने काम करताना आढळतात.प्रवासाची साधने कमी असल्यापासून बंजारा भाविक विदर्भ-मराठवाड्यातून बैलगाड्यांत बसून शेकडो मैलांचा प्रवास करीत यात्रेसाठी येत असत; मात्र आर्थिक स्थिती उंचावलेले बंजारा बांधव बदलत्या काळात स्वत:च्या वातानुकूलित वाहनातून यात्रेसाठी येतात. राहणीमानात बदल झाला; मात्र त्यांचे अंतरंग रूढी, प्रथा व परंपरांना धरून असल्याचे दिसते. संततीप्राप्ती, विवाह, नोकरी आदिंच्या नवसपूर्तीसाठी एका कुटुंबाकडून किमान १ ते ५ बोकडांचे बळी दिले जातात. यात्रा काळात उघड्यावर बोकडबळी देण्यावर बंदी घालण्यात आल्यामुळे ट्रस्टच्या वतीने स्वतंत्र वधगृह बांधण्यात आले आहे. यामुळे उघड्यावरील बोकडबळीला आळा बसला आहे; मात्र बोकडबळी बंद करण्यासाठी अद्याप तरी एकाही संस्थेला विशेष यश लाभल्याचे दिसत नाही. अनेक संस्था केवळ प्रसिद्धी मिळविण्यासाठी तात्पुरते प्रबोधन करीत असल्याची चर्चा आहे. उघड्यावर होणाऱ्या बोकडबळींना मज्जाव केल्याने ते वधगृहात होत आहेत. ट्रस्ट व प्रशासकीय यंत्रणेचे यश एवढ्यापुरते सीमित आहे; मात्र सेवाभावी संस्थांनीच आवाज उठवून ते करण्यास भाग पाडले. बोकडबळी पूर्णत: बंद करण्यात संस्थांना यश मिळाले नसले तरी या संस्थाही खचलेल्या नाहीत. त्यामुळे आज ना उद्या नवसासाठीचे बोकडबळी बंद होतील अशी आशा पुरोगामी कार्यकर्त्यांना वाटते आहे. (वार्ताहर) दरम्यान, यात्रा सुरू होण्यापूर्वी गेल्या आठवडाभरात भाविकांनी नवसपूर्तीसाठी सुमारे दोनशेहून अधिक बोकडांचा बळी दिला आहे.