शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
2
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
3
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
4
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
5
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
6
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
7
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
8
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
9
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
10
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
11
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
12
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
13
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
14
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
15
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
16
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
17
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
18
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
19
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
20
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू

दोन वर्षांत साठ झाडांचा बळी

By admin | Updated: June 5, 2017 00:34 IST

नाशिक : सलग दोन वर्षांपासून मान्सूनपूर्व पावसाचा वादळी वाऱ्यासह शहराला तडाखा बसत आहे.

 लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : सलग दोन वर्षांपासून मान्सूनपूर्व पावसाचा वादळी वाऱ्यासह शहराला तडाखा बसत आहे. गेल्या वर्षीदेखील मान्सून सुरू होण्याअगोदर वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने तीस झाडे उन्मळून पडली होती. याच घटनेची यंदाही शनिवारी (दि.३) पुनरावृत्ती झाली. दोन वर्षांत वादळी वाऱ्याने शहरातील साठ झाडांचा बळी गेल्याचे अग्निशामक विभागाकडे आलेल्या ‘कॉल’च्या नोंदीवरून स्पष्ट होते.शनिवारी दुपारपासून शहरासह उपनगरीय भागांमध्ये अचानकपणे सुरू झालेला वादळी वारा व पावसाने शहरात एकूण तीस वृक्षांचा बळी घेतला. वृक्ष कोसळल्याने सुदैवाने कोठेही कोणालाही दुखापत झाली नाही. शहरातील विविध भागांमध्ये झाड कोसळून त्याखाली वाहने दबल्याच्याही घटना घडल्या आहेत. सिल्व्हरओक, काशिद, पॅतोडिया, गुलमोहर, अकेशिया, रेन ट्री, पेल्ट्राफ ोरम यांसारखे ठिसूळ प्रजातीचे वृक्ष वादळी वाऱ्याने कोसळल्याचे वृक्षप्रेमींनी सांगितले. सातपूर भागातील शिवाजीनगर, अशोकनगर, श्रीकृष्ण कॉलनी, मुंबई नाका, त्र्यंबकरोड, पंचवटी, दहीपूल, महात्मानगर, काठे गल्ली, कॉलेजरोड, पखालरोड आदि भागात वृक्ष उन्मळून पडल्याच्या घटना घडल्या आहेत. एकूणच गेल्या वर्षीदेखील जूनच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या वादळी पावसाने तीस झाडे कोसळली होती. यावर्षीदेखील तीस झाडे उद्ध्वस्त झाली आहेत. या घटनांमध्ये काही ठिकाणी वाहनांचे नुकसानही झाले आहे. बहुतांश ठिकाणी कोसळलेल्या झाडांमध्ये भारतीय प्रजातींचा समावेश नव्हता.यंदा वृक्षसंपदेला मोठा फटका४यावर्षी महापालिकेने न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबाजवणी करत गंगापूररोडवरील दुतर्फा असलेली झाडे भुईसपाट केली. यावेळी शेकडो वृक्ष भर उन्हाळ्यात जमीनदोस्त करण्यात आली. अशाच प्रकारे दिंडोरीरोड, पेठरोड, टाकळीरोड परिसरातही वाहतुकीला अडथळा होत असल्याने वृक्ष काढण्यात आले. शनिवारी झालेल्या वादळी वाऱ्याने तीस वृक्षांचा बळी घेतला. यामुळे यंदा शहरातील वृक्षसंपदेला मोठा फटका बसला आहे. महापालिकेने जेवढे वृक्ष तोडले त्या बदल्यात ठेकेदारांमार्फत लागवड केलेल्या रोपट्यांचे वृक्षांमध्ये रूपांतर करण्यासाठी प्रयत्नशील राहण्याची गरज असल्याची अपेक्षा जागतिक पर्यावरण दिनानिमित्त केली जात आहे.