शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात भाजपची अळीमिळी गुपचिळी! 'उमेदवारी मिळाली हो...!' उमेदवारांचे समर्थकांना सकाळीच गेले फोन, एबी फॉर्म उद्या मिळणार?
2
मुंबईत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का; मुंबई अध्यक्षा राखी जाधव यांचा भाजपात प्रवेश
3
"माझी शिवसेनेतून हकालपट्टी करा, कारण..."; KDMC च्या माजी सभागृह नेत्याचं एकनाथ शिंदेंना पत्र
4
‘मोदी आणि ईव्हीएमच्या बळावर भाजपा माज करतोय, कोणत्याही परिस्थितीत मुंबईला वाचवायचंय’, राज ठाकरेंचं मोठं विधान 
5
VHT 2025 : टीम इंडियातील 'ध्रुवतारा' चमकला! पांड्याच्या संघातील गोलंदाजांना धु धु धुतलं
6
पश्चिममध्ये तीन प्रभागांत भाजप विरुद्ध भाजप! शिंदेसेना- राष्ट्रवादी एकत्र, महाविकास आघाडीचा प्रभाव
7
५ वर्षांत १०००% चं रिटर्न, आज अचानक जोरदार आपटला हा शेअर; कोणता आहे स्टॉक, कारण काय?
8
तोच तोच ईमेल आयडी वापरून कंटाळा आलाय? गुगल देतेय युजरनेम बदलायची संधी, अकाऊंट तेच राहणार पण...
9
राम मंदिराचा धर्म ध्वज भाविकांना भावला, देशभरातून मोठी मागणी; किती रुपयांना मिळते प्रतिकृती?
10
अरावली प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने आपल्याच निर्णयाला दिली स्थगिती, सरकारकडून माहिती अन् तज्ञ समितीकडून अहवाल मागवला
11
नोकरीत मन रमेना, म्हणून सुरु केली नायका; फाल्गुनी नायर कशा बनल्या सर्वात श्रीमंत 'सेल्फ-मेड' महिला?
12
शिंदेसेना-राष्ट्रवादीचा ५९:४१ टक्के जागांचा फॉर्म्युला; मध्यरात्रीपर्यंत चर्चांचा घोळ, भाजप युतीसाठी अनुत्सुक
13
वंदे भारत, राजधानी विसरा; हायड्रोजन ट्रेन लोको पायलटला किती पगार मिळणार? लवकरच सेवेत येणार
14
BMC ELection BJP List: भाजपाने मुंबई महापालिकेसाठी ६६ उमेदवारांची केली घोषणा, पहिल्या यादीत कोणाची नावे? 
15
भाजपा-शिंदेसेनेच्या बैठकीत 'ठिणगी'? १५ मिनिटांत वातावरण तापले अन् मंत्री ताडकन् बाहेर पडले
16
या छोट्याशा देशाने स्टारलिंकला सेवा बंद करायला लावली? जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या कंपनीला झुकायला भाग पाडले...
17
"एक सूप मी ८ दिवस पाणी घालून प्यायचे...", 'तुझ्यात जीव रंगला'मधल्या वहिनीसाहेबांनी सांगितला कठीण काळ
18
धनु राशीसाठी नवीन वर्ष 2026: प्रगती आणि भाग्योदयाचे वर्ष; जोखीम घेण्याची वृत्ती देईल मोठे यश! 
19
Gold Silver Price Today: चांदी एका झटक्यात ₹१५,३७९ नं महागली, सोनंही नव्या उच्चांकी स्तरावर; पटापट चेक करा १८, २२ आणि २४ कॅरेटचा भाव
20
कुलदीप सेंगरचा जामीन स्थगित; उन्नाव बलात्कार प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

बळीराजाच्या संतापाचा उद्रेक!

By admin | Updated: June 2, 2017 02:07 IST

नाशिक : शेतकऱ्यांना कर्जमुक्ती, बिनव्याजी कर्ज यांसह विविध मागण्यांसाठी गुरुवारपासून बेमुदत संपावर उतरलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला हिंसक वळण लागले.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : शेतकऱ्यांना कर्जमुक्ती, बिनव्याजी कर्ज यांसह विविध मागण्यांसाठी गुरुवारपासून बेमुदत संपावर उतरलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला हिंसक वळण लागले. दूध व भाजीपाल्यासह शेतमालाची वाहतूक करणारी वाहने अडवून त्यातील माल रस्त्यावर फेकण्याचे तसेच लूटमार करण्याच्या घटना घडल्याने पोलिसांना बळाचा वापर करून काही ठिकाणी लाठीमार, तर येवल्यात गोळीबार करावा लागला. यात कोणी जखमी झाले नसले तरी, निफाड, नैताळे, लासलगाव, येवला आदी गावांमध्ये तणावसदृश परिस्थिती निर्माण झाल्याने प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शेतकऱ्यांच्या या संप काळात जिल्ह्यातील बाजार समित्या पोलीस बंदोबस्तात दिवसभर सुरू असल्या तरी, शेतकऱ्यांनी लिलावासाठी मालच न आणल्याने कोणताही व्यवहार होऊ शकलेला नाही, मात्र शेतकऱ्यांनी वा बाजार समित्यांनी पोलीस बंदोबस्ताची मागणी केल्यास त्यांचा माल अन्य जिल्ह्यांत अथवा वाशी, मुंबईकडे पाठविण्याची तयारी प्रशासनाने केली आहे. जिल्"ात संकलित होणाऱ्या तीन लाख लिटर दुधाचा सर्वांत मोठा प्रश्न प्रशासनासमोर उभा राहिला असून, बुधवारी अनेक ठिकाणी दुधाचे टॅँकर अडवून ठेवण्यात आल्याने दुधाचे वितरण होऊ शकले नाही, मात्र शुक्रवारपासून खऱ्या अर्थाने दूध टंचाईला शहरवासीयांना सामोरे जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. ग्रामीण भागाप्रमाणे नाशिक शहरातही शेतकरी संपाची झळ बसली असून, नाशिक बाजार समितीत सकाळी संतप्त शेतकऱ्यांनी भाजीपाला विक्रीसाठी आलेल्या विक्रेत्यांचा शेतमाल फेकून देत, काही व्यापाऱ्यांचे गुदामेही फोडून त्यातील मालाची नासधूस केली आहे. नाशिक तालुक्यातील गिरणारे येथे शेतकऱ्यांनी जिल्हा बॅँकेच्या मालमत्ता जप्तीच्या नोटिसांची होळी करून, कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. या आंदोलनाची सुरुवात येवला-कोपरगाव येथे पहाटे झाली. शेतमाल वाहून नेणाऱ्या एका टेम्पोमध्ये मांस वाहतूक होत असल्याच्या संशयावरून आंदोलकांनी टेम्पो अडविला व त्याच्या चालकाला बेदम मारहाण करीत टेम्पो पेटवून दिला. त्यामुळे कोपरगावकडे जाणाऱ्या रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली, जमाव हिंसक झाल्याचे पाहून पोलिसांनी बळाचा वापर करून त्याला पांगविण्याचा प्रयत्न केल्याने परिस्थिती शांत होण्याऐवजी आणखीच चिघळली, परिणामी दोन ते तीन हजार शेतकरी रस्त्यावर उतरले व त्यांनी येईल ती वाहने अडवून त्यातील माल रस्त्यावर फेकून दिला. शेतकरी आंदोलनाचे पडसाद निफाड-येवला रोडवरील लासलगाव, नैताळे येथेही उमटले. शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरून सरकारविरुद्ध जोरदार घोषणाबाजी करून वाहने अडविली, सकाळच्या सुमारास बाजार समितीकडे माल घेऊन जात असलेले ट्रॅक्टर, टेम्पो अडवून त्यातील डाळींब, आंबा, कांदे आदी माल रस्त्यावर फेकण्यास सुरुवात केली, त्यामुळे वाहनचालकांनी जिवाच्या भीतीने वाहने रस्त्यावरच सोडून पळ काढला, परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून पोलीस व दंगा नियंत्रण पथकाने धाव घेत लाठीमार करून आंदोलकांना पांगविले. निफाड येथेही शेकडो शेतकऱ्यांनी एकत्र येत बाजार समितीत जाऊ पाहणारी वाहने अडवून माघारी फिरविली, तर दिंडोरी येथे पालखेड फाट्यावर आंदोलकांनी अचानक रास्ता रोको करून वाहतूक काहीकाळ रोखून धरली. नाशिक-त्र्यंबकरोडवरील तुपादेवी फाटा येथेही शेतकऱ्यांनी शेतमाल घेऊन जाणारी वाहने अडविली. जिल्"ातील ग्रामीण भागात तसेच नाशिक शहरात ठिकठिकाणी शेतमालाचे शेकडो वाहने लूटमारीच्या भीतीने रस्त्याच्या कडेला उभे करण्यात आले असून, काही कंपन्यांना परदेशात माल वेळेत निर्यात करायचा असल्याने त्यांची कोंडी झाली आहे.