शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण...
2
इराणनंतर लागणार पाकिस्तानचा नंबर...! इस्रायल हल्ल्यानंतर काय म्हणाले पाकिस्तानी 'एक्सपर्ट्स'? बसलीय RAW ची दहशत
3
Sachin Tendulkar, IND vs ENG: 'पतौडी ट्रॉफी'चं नाव बदलण्याच्या वादावर अखेर सचिन तेंडुलकरने सोडलं मौन, म्हणाला- "हा निर्णय"
4
जमिनीवर असलेल्या त्या वस्तूमुळे भीषण विमान अपघातात वाचले विश्वास कुमारचे प्राण, काय होतं ते?
5
एकमेकांचे हात पकडले, धायमोकलून रडले अन् चालत्या ट्रेनसमोर उडी मारली; जोडप्याचा दुर्दैवी अंत
6
असीम मुनीर यांची भेट घेऊन ट्रम्प यांनी दिले संकेत; पाकिस्तान मित्र इराणला धोका देणार?
7
विमानाची मोठी दुर्घटना टळली! इंडिगोच्या फ्लाइटला पक्षी धडकला, पायलटने घेतला मोठा निर्णय
8
१० रुपयांची फाटकी नोट बदलणार राजा रघुवंशी प्रकरणाची कहाणी? संशयाच्या फेऱ्यात अडकला 'हा' व्यक्ती!
9
“पुढील आषाढी एकादशीला अजित पवार CM म्हणून शासकीय पूजा करतील”; कुणी घातले पांडुरंगाला साकडे?
10
Mumbai Rains: मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
11
बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण: मिडकॅप, स्मॉलकॅपला मोठा फटका; 'या' क्षेत्रात मात्र तेजी!
12
मुलीच्या होणाऱ्या नवऱ्यासोबतच जुळलं सूत अन् झाली फरार, आता सपना देवी कुठे?
13
जुलै २०२५ वर खिळून आहेत इतिहास, खगोलशास्त्र आणि ज्योतिषशास्त्राच्या नजरा; पण का?
14
Mumbai Crime: मुंबईतील प्रतिष्ठित कॉलेजमध्ये विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू, कुटुंबीयांचा गंभीर आरोप
15
इराणसाठी इस्लामिक देश बनले काळ, अमेरिकेने रचला चक्रव्यूह; ४० हजार जवान अलर्टवर
16
Ahmedabad Plane Crash : भयंकर! आईच्या डोळ्यादेखत १५ वर्षांचा लेक जिवंत जळाला; काळजात चर्र करणारी घटना
17
IND vs ENG : आम्ही बुमराहला घाबरत नाही! तो सर्वोत्तम गोलंदाज असला तरी... मॅच आधी काय म्हणाला बेन स्टोक्स?
18
शिवसेनेच्या दोन्ही गटांमध्ये माजी आमदारांसाठी रस्सीखेच; ‘रात्रीस खेळ चाले’चा सिलसिला सुरू
19
यम' समोरून फक्त बघूनच गेले! बोलेरो गाडी हवेत ४ वेळा पलटी झाली; पाहा व्हायरल व्हिडीओ
20
IND vs ENG: पहिल्यांदाच कसोटी कर्णधार म्हणून खेळणाऱ्या शुबमन गिलला रवी शास्त्रींचा मोलाचा सल्ला, म्हणाले...

बळीराजाच्या संतापाचा उद्रेक!

By admin | Updated: June 2, 2017 02:07 IST

नाशिक : शेतकऱ्यांना कर्जमुक्ती, बिनव्याजी कर्ज यांसह विविध मागण्यांसाठी गुरुवारपासून बेमुदत संपावर उतरलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला हिंसक वळण लागले.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : शेतकऱ्यांना कर्जमुक्ती, बिनव्याजी कर्ज यांसह विविध मागण्यांसाठी गुरुवारपासून बेमुदत संपावर उतरलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला हिंसक वळण लागले. दूध व भाजीपाल्यासह शेतमालाची वाहतूक करणारी वाहने अडवून त्यातील माल रस्त्यावर फेकण्याचे तसेच लूटमार करण्याच्या घटना घडल्याने पोलिसांना बळाचा वापर करून काही ठिकाणी लाठीमार, तर येवल्यात गोळीबार करावा लागला. यात कोणी जखमी झाले नसले तरी, निफाड, नैताळे, लासलगाव, येवला आदी गावांमध्ये तणावसदृश परिस्थिती निर्माण झाल्याने प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शेतकऱ्यांच्या या संप काळात जिल्ह्यातील बाजार समित्या पोलीस बंदोबस्तात दिवसभर सुरू असल्या तरी, शेतकऱ्यांनी लिलावासाठी मालच न आणल्याने कोणताही व्यवहार होऊ शकलेला नाही, मात्र शेतकऱ्यांनी वा बाजार समित्यांनी पोलीस बंदोबस्ताची मागणी केल्यास त्यांचा माल अन्य जिल्ह्यांत अथवा वाशी, मुंबईकडे पाठविण्याची तयारी प्रशासनाने केली आहे. जिल्"ात संकलित होणाऱ्या तीन लाख लिटर दुधाचा सर्वांत मोठा प्रश्न प्रशासनासमोर उभा राहिला असून, बुधवारी अनेक ठिकाणी दुधाचे टॅँकर अडवून ठेवण्यात आल्याने दुधाचे वितरण होऊ शकले नाही, मात्र शुक्रवारपासून खऱ्या अर्थाने दूध टंचाईला शहरवासीयांना सामोरे जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. ग्रामीण भागाप्रमाणे नाशिक शहरातही शेतकरी संपाची झळ बसली असून, नाशिक बाजार समितीत सकाळी संतप्त शेतकऱ्यांनी भाजीपाला विक्रीसाठी आलेल्या विक्रेत्यांचा शेतमाल फेकून देत, काही व्यापाऱ्यांचे गुदामेही फोडून त्यातील मालाची नासधूस केली आहे. नाशिक तालुक्यातील गिरणारे येथे शेतकऱ्यांनी जिल्हा बॅँकेच्या मालमत्ता जप्तीच्या नोटिसांची होळी करून, कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. या आंदोलनाची सुरुवात येवला-कोपरगाव येथे पहाटे झाली. शेतमाल वाहून नेणाऱ्या एका टेम्पोमध्ये मांस वाहतूक होत असल्याच्या संशयावरून आंदोलकांनी टेम्पो अडविला व त्याच्या चालकाला बेदम मारहाण करीत टेम्पो पेटवून दिला. त्यामुळे कोपरगावकडे जाणाऱ्या रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली, जमाव हिंसक झाल्याचे पाहून पोलिसांनी बळाचा वापर करून त्याला पांगविण्याचा प्रयत्न केल्याने परिस्थिती शांत होण्याऐवजी आणखीच चिघळली, परिणामी दोन ते तीन हजार शेतकरी रस्त्यावर उतरले व त्यांनी येईल ती वाहने अडवून त्यातील माल रस्त्यावर फेकून दिला. शेतकरी आंदोलनाचे पडसाद निफाड-येवला रोडवरील लासलगाव, नैताळे येथेही उमटले. शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरून सरकारविरुद्ध जोरदार घोषणाबाजी करून वाहने अडविली, सकाळच्या सुमारास बाजार समितीकडे माल घेऊन जात असलेले ट्रॅक्टर, टेम्पो अडवून त्यातील डाळींब, आंबा, कांदे आदी माल रस्त्यावर फेकण्यास सुरुवात केली, त्यामुळे वाहनचालकांनी जिवाच्या भीतीने वाहने रस्त्यावरच सोडून पळ काढला, परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून पोलीस व दंगा नियंत्रण पथकाने धाव घेत लाठीमार करून आंदोलकांना पांगविले. निफाड येथेही शेकडो शेतकऱ्यांनी एकत्र येत बाजार समितीत जाऊ पाहणारी वाहने अडवून माघारी फिरविली, तर दिंडोरी येथे पालखेड फाट्यावर आंदोलकांनी अचानक रास्ता रोको करून वाहतूक काहीकाळ रोखून धरली. नाशिक-त्र्यंबकरोडवरील तुपादेवी फाटा येथेही शेतकऱ्यांनी शेतमाल घेऊन जाणारी वाहने अडविली. जिल्"ातील ग्रामीण भागात तसेच नाशिक शहरात ठिकठिकाणी शेतमालाचे शेकडो वाहने लूटमारीच्या भीतीने रस्त्याच्या कडेला उभे करण्यात आले असून, काही कंपन्यांना परदेशात माल वेळेत निर्यात करायचा असल्याने त्यांची कोंडी झाली आहे.