शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
4
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
6
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
7
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
8
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
9
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
10
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
11
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
12
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
13
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
14
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
15
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
16
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
17
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
18
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
19
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
20
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...

बळीराजाच्या संतापाचा उद्रेक!

By admin | Updated: June 2, 2017 02:07 IST

नाशिक : शेतकऱ्यांना कर्जमुक्ती, बिनव्याजी कर्ज यांसह विविध मागण्यांसाठी गुरुवारपासून बेमुदत संपावर उतरलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला हिंसक वळण लागले.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : शेतकऱ्यांना कर्जमुक्ती, बिनव्याजी कर्ज यांसह विविध मागण्यांसाठी गुरुवारपासून बेमुदत संपावर उतरलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला हिंसक वळण लागले. दूध व भाजीपाल्यासह शेतमालाची वाहतूक करणारी वाहने अडवून त्यातील माल रस्त्यावर फेकण्याचे तसेच लूटमार करण्याच्या घटना घडल्याने पोलिसांना बळाचा वापर करून काही ठिकाणी लाठीमार, तर येवल्यात गोळीबार करावा लागला. यात कोणी जखमी झाले नसले तरी, निफाड, नैताळे, लासलगाव, येवला आदी गावांमध्ये तणावसदृश परिस्थिती निर्माण झाल्याने प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शेतकऱ्यांच्या या संप काळात जिल्ह्यातील बाजार समित्या पोलीस बंदोबस्तात दिवसभर सुरू असल्या तरी, शेतकऱ्यांनी लिलावासाठी मालच न आणल्याने कोणताही व्यवहार होऊ शकलेला नाही, मात्र शेतकऱ्यांनी वा बाजार समित्यांनी पोलीस बंदोबस्ताची मागणी केल्यास त्यांचा माल अन्य जिल्ह्यांत अथवा वाशी, मुंबईकडे पाठविण्याची तयारी प्रशासनाने केली आहे. जिल्"ात संकलित होणाऱ्या तीन लाख लिटर दुधाचा सर्वांत मोठा प्रश्न प्रशासनासमोर उभा राहिला असून, बुधवारी अनेक ठिकाणी दुधाचे टॅँकर अडवून ठेवण्यात आल्याने दुधाचे वितरण होऊ शकले नाही, मात्र शुक्रवारपासून खऱ्या अर्थाने दूध टंचाईला शहरवासीयांना सामोरे जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. ग्रामीण भागाप्रमाणे नाशिक शहरातही शेतकरी संपाची झळ बसली असून, नाशिक बाजार समितीत सकाळी संतप्त शेतकऱ्यांनी भाजीपाला विक्रीसाठी आलेल्या विक्रेत्यांचा शेतमाल फेकून देत, काही व्यापाऱ्यांचे गुदामेही फोडून त्यातील मालाची नासधूस केली आहे. नाशिक तालुक्यातील गिरणारे येथे शेतकऱ्यांनी जिल्हा बॅँकेच्या मालमत्ता जप्तीच्या नोटिसांची होळी करून, कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. या आंदोलनाची सुरुवात येवला-कोपरगाव येथे पहाटे झाली. शेतमाल वाहून नेणाऱ्या एका टेम्पोमध्ये मांस वाहतूक होत असल्याच्या संशयावरून आंदोलकांनी टेम्पो अडविला व त्याच्या चालकाला बेदम मारहाण करीत टेम्पो पेटवून दिला. त्यामुळे कोपरगावकडे जाणाऱ्या रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली, जमाव हिंसक झाल्याचे पाहून पोलिसांनी बळाचा वापर करून त्याला पांगविण्याचा प्रयत्न केल्याने परिस्थिती शांत होण्याऐवजी आणखीच चिघळली, परिणामी दोन ते तीन हजार शेतकरी रस्त्यावर उतरले व त्यांनी येईल ती वाहने अडवून त्यातील माल रस्त्यावर फेकून दिला. शेतकरी आंदोलनाचे पडसाद निफाड-येवला रोडवरील लासलगाव, नैताळे येथेही उमटले. शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरून सरकारविरुद्ध जोरदार घोषणाबाजी करून वाहने अडविली, सकाळच्या सुमारास बाजार समितीकडे माल घेऊन जात असलेले ट्रॅक्टर, टेम्पो अडवून त्यातील डाळींब, आंबा, कांदे आदी माल रस्त्यावर फेकण्यास सुरुवात केली, त्यामुळे वाहनचालकांनी जिवाच्या भीतीने वाहने रस्त्यावरच सोडून पळ काढला, परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून पोलीस व दंगा नियंत्रण पथकाने धाव घेत लाठीमार करून आंदोलकांना पांगविले. निफाड येथेही शेकडो शेतकऱ्यांनी एकत्र येत बाजार समितीत जाऊ पाहणारी वाहने अडवून माघारी फिरविली, तर दिंडोरी येथे पालखेड फाट्यावर आंदोलकांनी अचानक रास्ता रोको करून वाहतूक काहीकाळ रोखून धरली. नाशिक-त्र्यंबकरोडवरील तुपादेवी फाटा येथेही शेतकऱ्यांनी शेतमाल घेऊन जाणारी वाहने अडविली. जिल्"ातील ग्रामीण भागात तसेच नाशिक शहरात ठिकठिकाणी शेतमालाचे शेकडो वाहने लूटमारीच्या भीतीने रस्त्याच्या कडेला उभे करण्यात आले असून, काही कंपन्यांना परदेशात माल वेळेत निर्यात करायचा असल्याने त्यांची कोंडी झाली आहे.