शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
2
कोणत्या खासदारांनी क्रॉस व्होटिंग केली? सर्वत्र चर्चा; महाराष्ट्रासह 'या' राज्यातील खासदार संशयाच्या भोवऱ्यात
3
हैदराबाद गॅझेटियरनंतर सरकारची नवी हालचाल; मराठा उपसमितीने उचलले महत्त्वाचे पाऊल 
4
भारताच्या 'आयटी'वर नवे संकट! 'या' कंपन्यांवर २५ टक्के कर लावण्याचा अमेरिकी खासदाराचा प्रस्ताव
5
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५: जिभेवर ताबा ठेवावा लागेल, वरिष्ठांशी वाद होण्याची शक्यता
6
अग्रलेख: भडकलेली 'जेन-झी'! भारताला अधिक सजग राहावे लागणार
7
टोळीयुद्धाने हादरली नवी मुंबई; गुंड राजकुमार म्हात्रेला मारहाण, खुटारीमध्ये हवेत गोळीबार
8
धुमसते नेपाळ : संसद पेटविली; सर्वोच्च न्यायालय आणि अॅटर्नी जनरल कार्यालयात तोडफोड
9
मालेगाव २००८ बॉम्बस्फोट: प्रज्ञा ठाकूर, पुरोहितसह ६ जणांच्या मुक्ततेला उच्च न्यायालयात आव्हान
10
विशेष लेख: उपराष्ट्रपतिपदाच्या खुर्चीत 'खेळात न उतरणारा खेळाडू'
11
Apple Awe Dropping Event : Apple नं लाँच केला सर्वात स्लीम iPhone 17 Air! जाणून घ्या, किंमत अन् संपूर्ण स्पेसिफिकेशंस
12
Asia Cup 2025: कधी अन् कुठं पाहता येईल IND vs UAE मॅच? कसा आहे दोन्ही संघांमधील हेड-टू-हेड रेकॉर्ड?
13
iPhone 17, iPhone 17 Air, Pro आणि Pro Max ची किंमत किती? जाणून घ्या सविस्तर
14
अफगाणिस्तानची विजयी सलामी; हाँगकाँगची पाटी पुन्हा कोरीच! Asia Cup स्पर्धेतील सलग १२ वा पराभव
15
Apple Event 2025 : iPhone 17 Pro आणि 17 Pro Max लाँच, नवीन डिझाइन, अपग्रेड कॅमेरा अन्...; जाणून घ्या किंमत
16
Apple Event 2025 : iPhone 17 सीरीज लाँच, Pro Motion डिस्प्ले, 20 मिनिटांत चार्ज, आणखी काय-काय आहे खास? जाणून घ्या
17
ठाण्यात सत्ता आणायची असेल तर रावणाच्या...; गणेश नाईकांनी फुंकलं ठाणे महापालिका निवडणुकीचं रणशिंग
18
Apple Awe Dropping Event : Apple Watch 11 लाँच, '5G'सह मिळणार 'हे' ढासू फीचर्स; आतापर्यंतची 'बेस्ट स्मार्ट वॉच', कंपनीचा दावा
19
Apple चे नवे AirPods Pro 3 लाँच; किंमत मोठी, पण फीचर्स खुश करणारे!
20
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...

नांदूरशिंगोटेत नळाद्वारे चक्क जिवंत अळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2020 01:20 IST

नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे गावातील नळांना मंगळवारी (दि.१४) जंतुमिश्रित पाणीपुरवठा झाल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे. नळाद्वारे चक्क जिवंत अळ्या आल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने तत्काळ उपाययोजना करून शुद्ध पाणीपुरवठा करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे गावातील नळांना मंगळवारी (दि.१४) जंतुमिश्रित पाणीपुरवठा झाल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे. नळाद्वारे चक्क जिवंत अळ्या आल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने तत्काळ उपाययोजना करून शुद्ध पाणीपुरवठा करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.नांदूरशिंगोटे गावाला कणकोरीसह पाच गाव नळपाणी पुरवठा योजनेतून दिवसाआड पाणीपुरवठा केला जातो. सदरची योजना भोजापूर धरणातून राबविण्यात आली असून, चास खिंडीत जलशुद्धीकरण केंद्र उभारण्यात आले आहे. दीड वर्षापूर्वी नादुरुस्त असलेले जलशुद्धीकरण केंद्रावर ४० लाख रुपये खर्च करून दुरुस्त करण्यात आले आहे.परंतु काही दिवसातच तेथील यंत्रणा कुचकामी ठरली असून, पाणी शुद्ध करण्याचेही यंत्र बंद असल्याचे समजते. तर नांदूरशिंगोटे गावात एक कोटी सतरा लाख रुपये खर्च करून मुख्यमंत्री पेयजल योजनेतूननवीन पाइपलाइन करण्यात आली आहे.शासनाने कोट्यवधी रुपये खर्च करूनही ग्रामस्थांना जंतुमिश्रित पाणी पिण्याची वेळ आली आहे. याअगोदर पंधरा दिवसांपूर्वीही गावात जंतुमिश्रित पाणी आल्याच्या तक्रारी होत्या. त्यावेळी सरपंच गोपाल शेळके व उपसरपंच रंजना शेळके तसेच ग्रामपंचायत प्रशासनाने दखल घेत जलशुद्धीकरण केंद्र तसेच गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या जलकुंभाची कर्मचाऱ्यांमार्फत स्वच्छता मोहीम राबविण्यात आली होती. त्यानंतर पाणीपुरवठा सुरुळीत झाला होता. पुन्हा मंगळवारी सकाळी गावातील नळांना जंतुमिश्रित पाणी झाल्याने महिलांनी रोष व्यक्त केला आहे.---------------------दुरुस्ती करण्याचे आश्वासनजलशुद्धीकरण केंद्रावर जाऊन यंत्रसामग्रीची व पाणीपुरवठ्याची पाहणी केली आहे. तसेच तेथून पुढे गावातील जलकुंभापर्यंत जलवाहिनीची तपासणी करून माहिती घेतली. गावातील नवीन पाइपलाइनमधून जर जंतुमिश्रित पाणीपुरवठा झाला असेल तर त्याची तत्काळ दुरुस्ती करण्यात येईल. दहा दिवसांपूर्वी जलकुंभाची स्वच्छता करण्यात आली आहे. अपवाद वगळता मागील काळातही गावाला स्वच्छ व शुद्ध पाणीपुरवठा झालेला आहे. तसेच पुढील काळातही गावात स्वच्छ व शुद्ध पाणीपुरवठा करण्यात येईल, असे सरपंच गोपाल शेळके यांनी सांगितले़गावातील नळांना जंतुमिश्रित पाणी आल्याने ग्रामस्थांनी भ्रमणध्वनी करून व समक्ष पदाधिकाºयांकडे गाºहाणे मांडले आहे. त्यामुळे पाइपलाइन सदोष की जलशुद्धीकरण केंद्रात बिघाड झाला, असा प्रश्न् प्रशासनाने पुढे पडला आहे. गावातील सर्वच भागात नळाद्वारे चक्क अळ्या आल्याने प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.

टॅग्स :Nashikनाशिक