शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
2
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
3
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
4
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य
5
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
6
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
7
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
8
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
9
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
10
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
11
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
12
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
13
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
14
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
15
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
16
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
17
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
18
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
20
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष

नांदूरशिंगोटेत नळाद्वारे चक्क जिवंत अळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2020 01:20 IST

नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे गावातील नळांना मंगळवारी (दि.१४) जंतुमिश्रित पाणीपुरवठा झाल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे. नळाद्वारे चक्क जिवंत अळ्या आल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने तत्काळ उपाययोजना करून शुद्ध पाणीपुरवठा करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे गावातील नळांना मंगळवारी (दि.१४) जंतुमिश्रित पाणीपुरवठा झाल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे. नळाद्वारे चक्क जिवंत अळ्या आल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने तत्काळ उपाययोजना करून शुद्ध पाणीपुरवठा करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.नांदूरशिंगोटे गावाला कणकोरीसह पाच गाव नळपाणी पुरवठा योजनेतून दिवसाआड पाणीपुरवठा केला जातो. सदरची योजना भोजापूर धरणातून राबविण्यात आली असून, चास खिंडीत जलशुद्धीकरण केंद्र उभारण्यात आले आहे. दीड वर्षापूर्वी नादुरुस्त असलेले जलशुद्धीकरण केंद्रावर ४० लाख रुपये खर्च करून दुरुस्त करण्यात आले आहे.परंतु काही दिवसातच तेथील यंत्रणा कुचकामी ठरली असून, पाणी शुद्ध करण्याचेही यंत्र बंद असल्याचे समजते. तर नांदूरशिंगोटे गावात एक कोटी सतरा लाख रुपये खर्च करून मुख्यमंत्री पेयजल योजनेतूननवीन पाइपलाइन करण्यात आली आहे.शासनाने कोट्यवधी रुपये खर्च करूनही ग्रामस्थांना जंतुमिश्रित पाणी पिण्याची वेळ आली आहे. याअगोदर पंधरा दिवसांपूर्वीही गावात जंतुमिश्रित पाणी आल्याच्या तक्रारी होत्या. त्यावेळी सरपंच गोपाल शेळके व उपसरपंच रंजना शेळके तसेच ग्रामपंचायत प्रशासनाने दखल घेत जलशुद्धीकरण केंद्र तसेच गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या जलकुंभाची कर्मचाऱ्यांमार्फत स्वच्छता मोहीम राबविण्यात आली होती. त्यानंतर पाणीपुरवठा सुरुळीत झाला होता. पुन्हा मंगळवारी सकाळी गावातील नळांना जंतुमिश्रित पाणी झाल्याने महिलांनी रोष व्यक्त केला आहे.---------------------दुरुस्ती करण्याचे आश्वासनजलशुद्धीकरण केंद्रावर जाऊन यंत्रसामग्रीची व पाणीपुरवठ्याची पाहणी केली आहे. तसेच तेथून पुढे गावातील जलकुंभापर्यंत जलवाहिनीची तपासणी करून माहिती घेतली. गावातील नवीन पाइपलाइनमधून जर जंतुमिश्रित पाणीपुरवठा झाला असेल तर त्याची तत्काळ दुरुस्ती करण्यात येईल. दहा दिवसांपूर्वी जलकुंभाची स्वच्छता करण्यात आली आहे. अपवाद वगळता मागील काळातही गावाला स्वच्छ व शुद्ध पाणीपुरवठा झालेला आहे. तसेच पुढील काळातही गावात स्वच्छ व शुद्ध पाणीपुरवठा करण्यात येईल, असे सरपंच गोपाल शेळके यांनी सांगितले़गावातील नळांना जंतुमिश्रित पाणी आल्याने ग्रामस्थांनी भ्रमणध्वनी करून व समक्ष पदाधिकाºयांकडे गाºहाणे मांडले आहे. त्यामुळे पाइपलाइन सदोष की जलशुद्धीकरण केंद्रात बिघाड झाला, असा प्रश्न् प्रशासनाने पुढे पडला आहे. गावातील सर्वच भागात नळाद्वारे चक्क अळ्या आल्याने प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.

टॅग्स :Nashikनाशिक