शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

नांदूरशिंगोटेत नळाद्वारे चक्क जिवंत अळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2020 01:20 IST

नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे गावातील नळांना मंगळवारी (दि.१४) जंतुमिश्रित पाणीपुरवठा झाल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे. नळाद्वारे चक्क जिवंत अळ्या आल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने तत्काळ उपाययोजना करून शुद्ध पाणीपुरवठा करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे गावातील नळांना मंगळवारी (दि.१४) जंतुमिश्रित पाणीपुरवठा झाल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे. नळाद्वारे चक्क जिवंत अळ्या आल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने तत्काळ उपाययोजना करून शुद्ध पाणीपुरवठा करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.नांदूरशिंगोटे गावाला कणकोरीसह पाच गाव नळपाणी पुरवठा योजनेतून दिवसाआड पाणीपुरवठा केला जातो. सदरची योजना भोजापूर धरणातून राबविण्यात आली असून, चास खिंडीत जलशुद्धीकरण केंद्र उभारण्यात आले आहे. दीड वर्षापूर्वी नादुरुस्त असलेले जलशुद्धीकरण केंद्रावर ४० लाख रुपये खर्च करून दुरुस्त करण्यात आले आहे.परंतु काही दिवसातच तेथील यंत्रणा कुचकामी ठरली असून, पाणी शुद्ध करण्याचेही यंत्र बंद असल्याचे समजते. तर नांदूरशिंगोटे गावात एक कोटी सतरा लाख रुपये खर्च करून मुख्यमंत्री पेयजल योजनेतूननवीन पाइपलाइन करण्यात आली आहे.शासनाने कोट्यवधी रुपये खर्च करूनही ग्रामस्थांना जंतुमिश्रित पाणी पिण्याची वेळ आली आहे. याअगोदर पंधरा दिवसांपूर्वीही गावात जंतुमिश्रित पाणी आल्याच्या तक्रारी होत्या. त्यावेळी सरपंच गोपाल शेळके व उपसरपंच रंजना शेळके तसेच ग्रामपंचायत प्रशासनाने दखल घेत जलशुद्धीकरण केंद्र तसेच गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या जलकुंभाची कर्मचाऱ्यांमार्फत स्वच्छता मोहीम राबविण्यात आली होती. त्यानंतर पाणीपुरवठा सुरुळीत झाला होता. पुन्हा मंगळवारी सकाळी गावातील नळांना जंतुमिश्रित पाणी झाल्याने महिलांनी रोष व्यक्त केला आहे.---------------------दुरुस्ती करण्याचे आश्वासनजलशुद्धीकरण केंद्रावर जाऊन यंत्रसामग्रीची व पाणीपुरवठ्याची पाहणी केली आहे. तसेच तेथून पुढे गावातील जलकुंभापर्यंत जलवाहिनीची तपासणी करून माहिती घेतली. गावातील नवीन पाइपलाइनमधून जर जंतुमिश्रित पाणीपुरवठा झाला असेल तर त्याची तत्काळ दुरुस्ती करण्यात येईल. दहा दिवसांपूर्वी जलकुंभाची स्वच्छता करण्यात आली आहे. अपवाद वगळता मागील काळातही गावाला स्वच्छ व शुद्ध पाणीपुरवठा झालेला आहे. तसेच पुढील काळातही गावात स्वच्छ व शुद्ध पाणीपुरवठा करण्यात येईल, असे सरपंच गोपाल शेळके यांनी सांगितले़गावातील नळांना जंतुमिश्रित पाणी आल्याने ग्रामस्थांनी भ्रमणध्वनी करून व समक्ष पदाधिकाºयांकडे गाºहाणे मांडले आहे. त्यामुळे पाइपलाइन सदोष की जलशुद्धीकरण केंद्रात बिघाड झाला, असा प्रश्न् प्रशासनाने पुढे पडला आहे. गावातील सर्वच भागात नळाद्वारे चक्क अळ्या आल्याने प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.

टॅग्स :Nashikनाशिक