शहरं
Join us  
Trending Stories
1
"सरकार झुकणार नाही, सोशल मीडियावरील बंदी हटणार नाही..."; काय म्हणाले नेपाळचे पंतप्रधान केपी ओली?
2
नेपाळमध्ये Gen-Z आंदोलन, 19 जणांचा मृत्यू, नैतिक जबाबदारी घेत गृहमंत्र्यांचा राजीनामा; आता PM ओलींवर दबाव!
3
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
4
कोठारीत थरार...! पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या; मानसिक आजारातून घडली घटना
5
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
6
याला म्हणतात 'पैसा ही पैसा'...! १ लाखाचे झाले १२ कोटी, फक्त ₹१५ च्या शेअरनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल; तुमच्याकडे आहे का?
7
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
8
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
9
हुंडाबळीच्या खटल्यात पती, सासूला सक्तमजुरी; १५ वर्षांची शिक्षा
10
सराईत गुन्हेगारांची टाेळी; पाच जणांविराेधात मकोका, लातूर पाेलिसांचा दणका
11
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
12
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
13
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
14
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
15
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
16
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
17
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
18
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
19
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
20
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?

उपक्रमशील : मानवनिर्मित प्रवास साधनांचा घेतला प्रत्यक्ष अनुभव वाघेरा येथील विद्यार्थ्यांची हवाईसफर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2018 00:18 IST

पेठ : सहल म्हटले की, शालेय मुलांसाठी अत्यानंदाचा क्षण. मग साधी परिसर सहल, वनभोजन, क्षेत्रभेट असो, की महामंडळाच्या लालपरीतून देवदर्शन.

ठळक मुद्देऔरंगाबाद ते मुंबई अशी विमानाने हवाई सफरविमानाने सहलीचा अनुभव

पेठ : सहल म्हटले की, शालेय मुलांसाठी अत्यानंदाचा क्षण. मग साधी परिसर सहल, वनभोजन, क्षेत्रभेट असो, की महामंडळाच्या लालपरीतून देवदर्शन. त्यात एखादी सहल जर थेट अवकाशातून झेप घेणारी असेल तर मुलांचा आनंद काही विरळाच. असाच एक सुखद अनुभव वाघेरा येथील निवासी आश्रमशाळेतील आदिवासी विद्यार्थ्यांनी औरंगाबाद ते मुंबई विमानप्रवास करत मुंबईदर्शन करून घेतला.महाराष्ट्र समाज सेवा संघ, नाशिक संचलित विठ्ठलराव पटवर्धन उत्कर्ष आश्रमशाळा, वाघेरा येथील इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांनी औरंगाबाद ते मुंबई अशी विमानाने हवाई सफर केली. राज्याच्या इतिहासात प्रथमच आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी विमानाने सहलीचा अनुभव घेतला. या सहलीची वैशिष्ट्ये म्हणजे रस्ते, लोहमार्ग, जल व हवाईमार्ग या सर्व साधनांचा अनुभव घेणे हे होते. येथील उपक्रमशील वर्गशिक्षक राजेश भोये, मुख्याध्यापक संदीप चौधरी यांनी या सहलीचे आयोजन केले होते. यात वाघेरा ते नाशिक बसने, नाशिक ते औरंगाबाद रेल्वेने, औरंगाबाद ते मुंबई विमानाने, मुंबईत समुद्र बोटीने असा नियोजन केल्याप्रमाणे विद्यार्थ्यांनी प्रवास अनुभवला. वाघेरा आश्रमशाळा विद्यार्थ्यांना अनेकविध शैक्षणिक अनुभव देण्यासाठी नेहमीच पुढाकार घेते. त्याचदृष्टीने या सहलीचेही आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांसोबत वर्गशिक्षक राजेश भोये, मुख्याध्यापक संदीप चौधरी, शिक्षक रंजना तायडे, रंजना खंबाईत, अधीक्षिका संगीता मालुंजकर होते. सहलीदरम्यान दोन दिवस विद्यार्थ्यांचा भोजन खर्च शिवाजी नागरे व शांताराम मानभाव यांनी सामाजिक जाणीव ठेवत स्वखर्चाने केला. सहलीदरम्यान विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनीही विद्यार्थ्यांशी संवाद साधला.शाळेच्या या आगळ्या-वेगळ्या सहलीबद्दल संस्थाप्रमुख चंद्रकांत धामणे, सचिव सुधाकर साळी व सर्व संस्था पदाधिकारी, माध्यमिक मुख्याध्यापक नितीन पवार सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, पालकांनी कौतुक केले.