शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा कर्णधार दहशतवाद्यांना, मसूद अझहरला मॅच फी दान करणार; तशी घोषणाच केली...
2
भारतीय सैन्य अन् पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबांना सर्व मॅचची फी देणार; सूर्यकुमार यादवची घोषणा
3
संतापजनक! आधी मारहाण, नंतर शाळेच्या खिडकीला उलटे टांगले; ७ वर्षाच्या मुलावर क्रूरता
4
'४ वर्षांपूर्वीपासून...', सोनम वांगचुकच्या पाकिस्तान कनेक्शनवर त्याची पत्नी गीतांजली वांगचुक काय म्हणाल्या?
5
सोशल मीडियावरील ती पोस्ट! ...अन् टीम इंडियानं अख्ख्या जगासमोर घेतला पाक मंत्र्याचा बदला
6
तुमची मुलगी म्हणेल Thank You! या ६ बेस्ट स्कीम्स देतील जबरदस्त नफा, ५ नंबरच्या स्कीमनं तर पक्कं होईल तिचं भविष्य सुरक्षित
7
IND vs Pak: "अभिषेक बच्चन चांगला खेळलास", भारताने आशिया कप जिंकल्यानंतर बिग बींचा शोएब अख्तरला टोला
8
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
9
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
10
"आता प्रायश्चित्त घेण्याची वेळ, दसरा मेळावा रद्द करून..."; भाजपाची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
11
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
12
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
13
पंधरा दिवसांत ६०% जास्त पाऊस! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील चित्रच बदलले; आजही ६ जिल्ह्यांतऑरेंज अलर्ट
14
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
15
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
16
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
17
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
18
घोडबंदर मार्गावर रस्त्यांची कामं सुरू; मुंबईत जाताना ठाण्यात वाहतूककाेंडीची ‘शिक्षा’
19
थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का?
20
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?

मालेगावी महापौरपदाच्या हालचालींना वेग

By admin | Updated: May 29, 2017 00:06 IST

आझादनगर : महापौरपदासाठी काँग्रेस, राष्ट्रवादीकडून हालचालींना वेग दिला जात असला, तरी उद्या नगरसेवकांच्या नावांची राजपत्रात (गॅझेट) नोंद झाल्यानंतरच चित्र स्पष्ट होणार आहेत.

सय्यद रशीद । लोकमत न्यूज नेटवर्कआझादनगर : मालेगाव महानगरपालिकेच्या निकालानंतर महापौरपदासाठी काँग्रेस, राष्ट्रवादीकडून हालचालींना वेग दिला जात असला, तरी उद्या नगरसेवकांच्या नावांची राजपत्रात (गॅझेट) नोंद झाल्यानंतरच खऱ्या अर्थाने चित्र स्पष्ट होणार आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ पातळीवरील बोलणीनंतर राष्ट्रवादीच्या उच्च स्तरावरून याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार माजी आमदार मुफ्ती मोहंमद इस्माईल यांना देण्यात आल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. यामुळे सेनेला बरोबर घेत काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवण्याची यशस्वी खेळी राष्ट्रवादी काँग्रेसकडून खेळण्यात येणार आहे. मात्र सेना-भाजपा मिळणे अपेक्षित आहे. अन्यथा मोठा पेच निर्माण होऊन मोठ्या प्रमाणावर ‘घोडेबाजार’ होण्याची शक्यता आहे. मनपा निकालात सर्वात मोठा पक्ष म्हणून काँग्रेस समोर आला आहे. त्या खालोखाल राष्ट्रवादी-जनता दलाला २६ जागा मिळाल्या आहेत. संपूर्ण शहरातून एकमेव अपक्ष निवडून आलेल्या नगरसेवकाचाही राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा आहे. यामुळे दोन्ही पक्षांकडे जवळजवळ समान बलाबल असल्याने दोन्ही पक्षांकडून महापौरपदाच्या हालचालींना वेग आला आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांची वरिष्ठ पातळीवर बोलणी सुरू होती; मात्र काँग्रेसच्या गतवेळी मिळालेल्या अनुभवातून यंदा राष्ट्रवादीने सावध भूमिका घेत याबाबत निर्णय घेण्याचा सर्वाधिकार स्थानिक नेते मुफ्ती मोहंमद इस्माईल यांना दिल्याचे विश्वसनीयरीत्या समजले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसकडून सेना नेते राज्यमंत्री दादा भुसे यांच्याशी संपर्क साधून आहेत. सेना व राष्ट्रवादी मिळून ही संख्या ४० वर पोहोचली असून, बहुमतासाठी तीन नगरसेवकांची आवश्यकता असल्याने सत्तेची मदार एमआयएम व भाजपावर आहे; मात्र भाजपाचे स्थानिक पातळीवरील नेते हे कट्टर विरोधक आहेत, तर एमआयएमचा सेना व भाजपास सरळ पाठिंबा मिळणे शक्य नाही. किंबहुना मिळाले तरी ते विधानसभा निवडणुकीदरम्यान ‘गले की हड्डी’ बनू शकते. त्यामुळे राष्ट्रवादीसमोर एमआयएम किंवा भाजपाचा प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष पाठिंबा मिळविणे किंवा आपला सहविचारी पक्ष काँग्रेसशी हात मिळविणे याशिवाय पर्याय नसल्याची चिन्हे दिसत आहेत. काँग्रेस पक्षाकडूनही वरिष्ठांकरवी राष्ट्रवादीबरोबर घरोबा करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मात्र त्यास यश मिळत नसल्याचे पाहून येत्या एक-दोन दिवसातच काँग्रेसकडून राजकीय डावपेच खेळण्यास सुरुवात होणार असल्याचे कळते.  स्थानिक पातळीवरील एकमेकांशी झालेला ‘कट्टर’ विरोध पाहता दोन्ही पक्षांना कुणाबरोबर जायचे याचा विचार करावा लागणार आहे. कारण सध्या पक्षांच्या कार्यकर्त्यांचा मूडही लक्षात घेणे गरजेचे आहे. कारण दोन्ही पक्षांना येत्या विधानसभा निवडणुकीचा विचार करावा लागणार आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांसाठी महापौरपदाचा जादूई आकडा पार करण्यासाठी मोठी कसोटी लागणार आहे, नाही तर एका अग्निपरीक्षेतून पास व्हावे लागणार आहे.मालेगाव महापौरपदाच्या हालचाली गतिमान झाल्या असल्या तरी दोन्ही प्रमुख पक्षांसमोर मनपात आलेल्या छोट्या पक्षांतील स्थानिक पातळीवरील नेते ‘कट्टर’ विरोधक असल्याने ही दोन्ही पक्षांसाठी डोकेदुखी ठरणार आहे. किंबहुना राजकारणात कधीही काहीही होऊ शकते असे तत्त्व प्रत्यक्षात आले तरी राकॉँचे महापौर हाजी मोहंमद इब्राहीम, कॉँग्रेसचे गटनेते हाजी खालीद शेख व एमआयएमचे शहराध्यक्ष व माजी महापौर मालिक शेख या तिन्ही मातब्बरांना घरी बसवून शहरातील जनतेने सूचक इशारा तीनही पक्षांना दिला आहे. त्यामुळे सगळ्याच पक्षांना आगामी विधानसभा निवडणुकीत पुन्हा जनता जनार्दनाच्या दरबारात हाजीर व्हावे लागणार असल्याचे भान ठेवूनच महापौरपदासाठी इतर पक्षांशी हातमिळवणी करावी लागणार आहे. त्यामुळे सर्वच पक्षांच्या नेत्यांना अग्निपरीक्षेतून जावे लागणार आहे.