शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
2
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
3
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
4
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
5
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
6
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
7
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
8
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
9
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
10
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
11
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
12
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
13
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
14
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
15
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
16
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
17
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
18
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
19
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
20
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?

वाहनांसाठीची वेगमर्यादा ६० किलोमीटर

By admin | Updated: October 19, 2015 22:26 IST

मोटार वाहन नियमात सुधारणा : वेगनियंत्रकाची आवश्यकता

नाशिक : स्कूल बसेस, डंपर्स, टँकर्स, धोकादायक मालांची वाहतूक करणारी, तसेच १ आॅक्टोबर २०१५ नंतर उत्पादित करण्यात येणाऱ्या वाहनांना उत्पादकांकडून किंवा वितरकांकडून वेगनियंत्रक बसवून घेणे आवश्यक आहे़ ए.आय.एस. ०१८:२०१२ च्या मानकानुसार जास्तीत जास्त ६० कि.मी. प्रतितास वेग नियंत्रक बसवूनच वाहन उत्पादक, वाहन वितरकांनी वाहनधारकांना वाहने वितरित करावी, असे आवाहन परिवहन कार्यालयाने प्रसिद्धीपत्रकान्वये केले आहे़केंद्र शासनाने केंद्रीय मोटार वाहन नियम, १९८९ च्या नियम ११८ मध्ये सुधारणा केली असून, त्यामध्ये या नवीन नियमाचा समावेश केला आहे़ या नियमानुसार मोटार वाहन कायदा १९८८ च्या कलम ४१(४) नुसार केंद्र शासनाने अधिसूचित केलेल्या आणि १ आॅक्टोबर २०१५ नंतर उत्पादित होणाऱ्या परिवहन वाहनांना उत्पादकांकडून उत्पादनाच्या वेळेस किंवा वितरकाकडून वितरणाच्या वेळेस वेळोवेळी सुधारणा केल्यानुसार ए.आय.एस. ०१८:२०१२ च्या मानकाची पूर्तता करणारा जास्तीत जास्त ८० कि.मी. प्रतितास वेग निर्धारित केलेला वेगनियंत्रक बसविणे आवश्यक आहे.या नियमानुसार दुचाकी, तीनचाकी, क्वाड्री सायकल, अग्निशामक वाहने, रुग्णवाहिका, पोलीस विभागाची वाहने यांना वेगनियंत्रक बसविण्याची आवश्यकता नाही. तसेच प्रवासी व त्यांचे सामान वाहून नेण्यासाठी उपयोगात आणली जाणारी चारचाकी वाहने ज्यांची आसनक्षमता चालकासहीत आठपेक्षा जास्त नसेल आणि त्याचे एकूण स्थूल वजन ३५०० कि.ग्रॅ.पेक्षा जास्त नसेल, तसेच नियम १२६ मध्ये विहित केलेल्या तपासणी संस्थेने सत्यापित व प्रमाणित केलेल्या ज्याचा वेग ८०कि.मी. प्रतितासापेक्षा अधिक नसेल अशा वाहनांना वेगनियंत्रक बसविण्याची आवश्यकता नाही़ (प्रतिनिधी)