शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
2
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
3
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
4
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
5
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
6
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
7
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
8
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
9
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
10
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
11
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
12
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
13
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
14
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
15
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
16
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
17
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
18
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
19
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

मंत्रालय परिसरातील रहिवाशांच्या दारात भाजीपाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2020 00:21 IST

नांदूरशिंगोटे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पणन महामंडळाचा मुंबईतील विधानभवनजवळील शेतकरी आठवडे बाजार बंद केल्यानंतर शेतकरी कंपन्यांकडून थेट घरपोहोच भाजीपाला विक्र ी सेवा दिली जात आहे.

नांदूरशिंगोटे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पणन महामंडळाचा मुंबईतील विधानभवनजवळील शेतकरी आठवडे बाजार बंद केल्यानंतर शेतकरी कंपन्यांकडून थेट घरपोहोच भाजीपाला विक्र ी सेवा दिली जात आहे. आठवडे बाजाराची आयोजक असलेल्या सिन्नर तालुक्यातील दोडी बुद्रुकच्या शेतमाल अ‍ॅग्रो प्रोड्युसर कंपनीने विविध प्रकारच्या भाजीपाल्याचे १० किलो पॅकिंग घरपोहोच देण्याची सेवा राबवली. ४० दिवसांत सुमारे ५० टन माल एक हजारावर कुटुंबांना पोहोच करण्यात आला आहे. विशेष म्हणजे अव्वाच्या सव्वा दर न आकारता बाजारभावही नियमितप्रमाणेच आकारणी केला आहे.पणन महामंडळाने राज्यभरात शेतकरी आठवडे बाजार सुरू केले आहेत. त्यासाठी नोंदणीकृत शेतकरी गट व कंपन्यांना प्रोत्साहन देण्यात आले. आता हे आठवडे बाजार बंद आहेत. अशा स्थितीत मंत्रालय परिसरातील सोसायट्यांच्या आवारात शेतकरी वाहन उभे करून पॅकिंग केलेला भाजीपाला विक्र ी केला जात आहे. कंपनीचे अध्यक्ष गणपत केदार, मधुकर कांगणे, संतोष उगले, सुखदेव आव्हाड यासाठी मेहनत घेत आहेत. परिसरातील शेतकऱ्यांकडून भाजीपाला घेऊन स्वच्छ भाजीपाल्याची पॅकिंग केली जाते. त्याची चढ्या दराने विक्र ी न करता नियमित दर कंपनीकडून आकारला जातो.कंपनीच्या या उपक्रमाला रहिवाशांचाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. सामाजिक अंतराचे बंधन राखून, स्वच्छतेचे नियम पाळून भाजीपाला विक्र ी केला जातो. कोबी, फ्लॉवर, मिरची, टोमॅटो, बटाटे, कांदा, लसूण आदी प्रकारचा भाजीपाला शेतात असूनही लॉकडाउनमुळे विक्र ीत अडथळे येत आहेत. व्यापारी कवडीमोल दरात त्याची खरेदी करून चढ्या दराने विक्र ी करत असल्याचे चित्र आहे. अशा स्थितीत कंपनीने शेतकऱ्यांना चांगला दर तर दिलाच, शिवाय त्याची विक्र ी किरकोळ नफा मिळवून सुरू ठेवली आहे.

टॅग्स :Nashikनाशिक