शहरं
Join us  
Trending Stories
1
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
2
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
3
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकट; KL राहुलनं एक कॅच सोडला
4
१७,००० कोटींचा घोटाळा! अनिल अंबानींच्या डोकेदुखीत वाढ, ED आता 'या' लोकांची चौकशी करणार
5
Post Office ची ५० वर्ष जुनी सेवा होणार बंद, तुमच्यावर काय परिणाम होणार?
6
नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील
7
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
8
लॉटरी लागली! टाटांच्या 'या' शेअरचे होणार १० तुकडे, १०० शेअर्सचे थेट १००० होणार, रेकॉर्ड डेट कधी?
9
मैत्रिणीचा संसार मोडला, नंतर तिच्याच नवऱ्याशी केलं लग्न; आता ३ वर्षांतच अभिनेत्रीवर घटस्फोट घेण्याची वेळ
10
Nagpur: नागपुरात मद्यधुंद अवस्थेत कार चालवणाऱ्या जवानानं ३० जणांना उडवलं, व्हिडीओ व्हायरल!
11
बदल्याची आग! आईने वडिलांना फसवून दुसरं लग्न केलं, संतापलेल्या मुलाने तिला कारने चिरडलं
12
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
13
कैदी नंबर १५,५२८, प्रज्वल रेवण्णाचा तुरुंगातील दिनक्रम आला समोर, दररोज करावं लागेल एवढं काम   
14
Putrada Ekadashi 2025: पुत्रदा एकादशीला 'हे' नियम पाळले तरच होतो संतानसुखाचा लाभ!
15
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
16
४० व्या वर्षीही करू शकता गुंतवणुकीचा श्रीगणेशा; रिटायरमेंटच्या वेळी होऊ शकता कोट्यधीश, महिन्याला किती कराल गुंतवणूक
17
'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
18
Mumbai: बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मेहुणीची घरीच प्रसूती; भाऊजींसह बहिणीलाही अटक
19
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल

जिल्ह्यात भाजीपाल्याचे दर भिडले गगनाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2020 01:04 IST

मालेगाव : तालुक्यासह कसमादे परिसरात काही भागात झालेला जोरदार पाऊस आणि काही भागात असलेल्या रोगट हवामानामुळे भाजीपाल्याचे उत्पादन घटले आहे. बाजारात मागणी तसा पुरवठा होत नसल्याने कांदा, पत्ता कोबी वगळता इतर भाजीपाल्याचे भाव सध्या गगनाला भिडले आहेत.

मालेगाव : (शफीक शेख) तालुक्यासह कसमादे परिसरात काही भागात झालेला जोरदार पाऊस आणि काही भागात असलेल्या रोगट हवामानामुळे भाजीपाल्याचे उत्पादन घटले आहे. बाजारात मागणी तसा पुरवठा होत नसल्याने कांदा, पत्ता कोबी वगळता इतर भाजीपाल्याचे भाव सध्या गगनाला भिडले आहेत.कसमादे परिसरात यंदा जूनच्या दुसऱ्या सप्ताहात चांगला पाऊस झाल्याने झाल्याने शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पिकांसह भाजीपाल्याचीही मोठ्या प्रमाणात लागवड केली. उत्पादन चांगले निघत असल्याने जून महिन्यात बाजार समित्यांमध्ये भाजीपाल्याची आवक मोठ्या प्रमाणात होत होती. त्यामुळे दर स्थिर होते. गेल्या काही दिवसांपासून रोगट हवामान तसेच काही भागात वारंवार होणाºया पावसामुळे भाजीपाल्याची वाढ खुंटून पिवळा पडला. त्यामुळे आधीच्या तुलनेत भाजीपाल्यांची आवक कमी झाल्याने दर ३५ ते ५० टक्क्यांनी वाढले आहेत. सध्या बाजारात टोमॅटो आणि बटाटे यांचा मोठा तुटवडा आहे. टोमॅटा आणि बटाटे यांचा मोठा तुटवडा जाणवत आहे. टोमॅटो ३५ ते ४० रुपये तर शिमला मिरची ४५ ते ५० रुपये प्रति किलोने विकला जात आहे. आडत व्यापाºयांना भाजीपाला लिलावातून कमिशन मात्र चांगले मिळत आहे. या दरवाढीचा फटका सर्वसामान्य ग्राहकांनाही बसला आहे.शिमला मिरचीला सफरचंदाचा भावलॉकडाऊन नंतर भाजी बाजारात सोशल डिस्टनस् ठेवून ग्राहकांची गर्दी होत असून शिमला मिरचीला सफरचंदाचा भाव आला आहे. साधारणपणे ३० रुपये पर्यंत असणारे शिमला मिरचीच्या दरात ४० टक्के पर्यंत वाढ झाल्याचे बाजारात पहायला मिळाले.तरीही कांद्याला कुणी विचारेनागेल्या दोेन महिन्यापूर्वी कांद्याचे भाव गगनाला भिडले होते. सुमारे १५ ते २० रुपये किलो दराने मिळणारा कांदा आता दहा रुपये किलो दराने मिळू लागला आहे. त्यामुळे आता कांद्याला कुणी विचारत नसल्याचे दिसून आले. कांद्याची पूर्वी आवक मोठ्या प्रमाणात होत होती. त्यामुळे दर स्थिर होते. काही भागात झालेल्या अतिपावसामुळे साठवलेला कांदा सडू लागल्याने शेतकºयांनी बााजारात आणल्याने आवक वाढली .लसूणही ठरतोेय वरचढगेल्या दोन महिन्यांपूर्वी सुमारे ८० ते ९० रयपये किलो दराने विकला जाणारा लसूण आता तब्बल दुप्पट दराने मिळू लागला आहे. त्यामुळे बाजारात इतर भाज्यांच्या तुलनेतल लसूण वरचढ ठरत असून १४० ते १६० रुपये किलो दरान मिळत आहे.वांग्याच्या भावातही वाढगेल्या दोन महिन्यांपूर्वी केवळ १० ते २० रुपये किलो दराने मिळणारी वांगी आता दुप्पट दराने मिळू लागली आहेत. शहरातील भाजीबाजारात आज वांगी सुमारे ३० ते ४० रुपये किलो दराने मिळत आहेत. त्यामुळे ग्राहकांना भाजीपाला खरेदी करताना आथिर्क फटका बसत आहे. गावरानी वांगी मोठ्या प्रमाणात विकायलायेत आहेत.कोरोनामुळे लॉकडाऊनमुळे शहरात कळवण, सटाणा, देवळा आणि कळवण प्रिसरातून येणारा भाजीपाला काही प्रमाणात येणे कमी झाले होते. त्यामुळष भाजीपाल्याच्या दरात विक्रमी वाढ झाली होती. आता काही भाज्यांचे दर कमी झाले आहेत. - संजीव त्रिमुखे, भाजीविक्रेता,मालेगाव कॅम्पमालेगावात राज्यातील बाहेरून येणाºया येणाºया फळांची कोरोनामुळे आवक कमी झाली. फळ व्यापाºयांनी साठवून ठेवलेला माल बाजारात काढता आला नाही. त्यामुळे त्यांचे नुकसान झाले. आताा साठवणूक केलेला माल संपला आहे. यामुळे फळांचे भाव वाढले आहेत. - दिनेश श्रीखंडे , ग्राहक

टॅग्स :Nashikनाशिक