शहरं
Join us  
Trending Stories
1
संपूर्ण यादीच आली, सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे सदस्य ठरले, प्रत्येक टीममध्ये किती अन् कोण नेते?
2
पाकची नवी चाल! भारताच्या ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ला ‘शांतीदूता’ने उत्तर; जगाला सांगणार काय?
3
गिलख्रिस्टच्या IPL संघात विराटला स्थान नाही, Mumbai Indiansचे ५ जण, कर्णधार कोण?
4
आयडियाची कल्पना झाली फेल! बेपत्ता झालेला गुरुग्रामचा आयटी मॅनेजर पकडला गेला अन् समोर आलं खरं कारण
5
अटकेत पाकिस्तानी स्पाय? ज्योती मल्होत्राची कमाई किती? कोरोनात नोकरी गेली अन्... पाकिस्तानही फिरून आली...
6
Hyundai ने आखली मोठी योजना! भारतात लॉन्च करणार 20 पेट्रोल-डिझेल अन् 6 EV कार
7
तुम्हीही एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड वापरता? मग फायद्यासोबत हे तोटे माहिती आहे का?
8
कोण आहे पाकिस्तानी अधिकारी, ज्याच्या जाळ्यात अडकली ज्योती?; भारताने देशाबाहेर काढले होते
9
"विराट कोहलीला क्रिकेटमधील योगदानासाठी 'भारतरत्न' द्या"; स्टार माजी क्रिकेटपटूने केली मागणी
10
हैदराबादमधील गुलजार हाऊसजवळ भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू; अनेक जण गंभीर जखमी
11
Video: "असा धडा शिकवणार, की..."; सैन्यानं जारी केला 'ऑपरेशन सिंदूर'चा आणखी एक व्हिडिओ
12
केरळात मान्सून वाऱ्याच्या वेगाने दाखल होणारा, ढग भरभरून पाऊस देणार
13
करण जोहरच्या 'तख्त' सिनेमाचं पुढे काय झालं? पहिल्यांदाच प्रतिक्रिया देत म्हणाला, "तो सिनेमा..."
14
ज्योती मल्होत्रा पाकिस्तानी ISI अधिकाऱ्यासोबत बालीलाही गेलेली; वडील कारपेंटर, मुलीची लक्झरी लाईफ, नेमके करायची तरी काय...
15
टेरिफ वॉरची खुमखुमी अन् अमेरिकेचा तिळपापड! मूडीजने क्रेडिट रेटिंग घटविताच...
16
२५ लाख दे, नाहीतर मरून जा; पत्नीने दिली धमकी! शिक्षक पतीने उचलले दुर्दैवी पाऊल
17
सुसाइड नोटमध्ये मराठीत सही कशी?; डॉ. वळसंगकर आत्महत्या प्रकरणी वेगळाच संशय
18
"तेव्हा विराट कोहलीने मला लाथ मारली होती अन् म्हणाला होता..."; इशांत शर्माने सगळंच सांगून टाकलं
19
इस्रोचे १०१ वे मिशन अयशस्वी; तांत्रिक अडचणीमुळे रॉकेट तिसऱ्या टप्प्यावरच अडकले
20
भारत-पाकिस्तानमधील युद्धविरामाचा आज अखेरचा दिवस? पुढे काय होणार? भारतीय सेनेनं सांगूनच टाकलं!

जिल्ह्यात भाजीपाल्याचे दर भिडले गगनाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2020 01:04 IST

मालेगाव : तालुक्यासह कसमादे परिसरात काही भागात झालेला जोरदार पाऊस आणि काही भागात असलेल्या रोगट हवामानामुळे भाजीपाल्याचे उत्पादन घटले आहे. बाजारात मागणी तसा पुरवठा होत नसल्याने कांदा, पत्ता कोबी वगळता इतर भाजीपाल्याचे भाव सध्या गगनाला भिडले आहेत.

मालेगाव : (शफीक शेख) तालुक्यासह कसमादे परिसरात काही भागात झालेला जोरदार पाऊस आणि काही भागात असलेल्या रोगट हवामानामुळे भाजीपाल्याचे उत्पादन घटले आहे. बाजारात मागणी तसा पुरवठा होत नसल्याने कांदा, पत्ता कोबी वगळता इतर भाजीपाल्याचे भाव सध्या गगनाला भिडले आहेत.कसमादे परिसरात यंदा जूनच्या दुसऱ्या सप्ताहात चांगला पाऊस झाल्याने झाल्याने शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पिकांसह भाजीपाल्याचीही मोठ्या प्रमाणात लागवड केली. उत्पादन चांगले निघत असल्याने जून महिन्यात बाजार समित्यांमध्ये भाजीपाल्याची आवक मोठ्या प्रमाणात होत होती. त्यामुळे दर स्थिर होते. गेल्या काही दिवसांपासून रोगट हवामान तसेच काही भागात वारंवार होणाºया पावसामुळे भाजीपाल्याची वाढ खुंटून पिवळा पडला. त्यामुळे आधीच्या तुलनेत भाजीपाल्यांची आवक कमी झाल्याने दर ३५ ते ५० टक्क्यांनी वाढले आहेत. सध्या बाजारात टोमॅटो आणि बटाटे यांचा मोठा तुटवडा आहे. टोमॅटा आणि बटाटे यांचा मोठा तुटवडा जाणवत आहे. टोमॅटो ३५ ते ४० रुपये तर शिमला मिरची ४५ ते ५० रुपये प्रति किलोने विकला जात आहे. आडत व्यापाºयांना भाजीपाला लिलावातून कमिशन मात्र चांगले मिळत आहे. या दरवाढीचा फटका सर्वसामान्य ग्राहकांनाही बसला आहे.शिमला मिरचीला सफरचंदाचा भावलॉकडाऊन नंतर भाजी बाजारात सोशल डिस्टनस् ठेवून ग्राहकांची गर्दी होत असून शिमला मिरचीला सफरचंदाचा भाव आला आहे. साधारणपणे ३० रुपये पर्यंत असणारे शिमला मिरचीच्या दरात ४० टक्के पर्यंत वाढ झाल्याचे बाजारात पहायला मिळाले.तरीही कांद्याला कुणी विचारेनागेल्या दोेन महिन्यापूर्वी कांद्याचे भाव गगनाला भिडले होते. सुमारे १५ ते २० रुपये किलो दराने मिळणारा कांदा आता दहा रुपये किलो दराने मिळू लागला आहे. त्यामुळे आता कांद्याला कुणी विचारत नसल्याचे दिसून आले. कांद्याची पूर्वी आवक मोठ्या प्रमाणात होत होती. त्यामुळे दर स्थिर होते. काही भागात झालेल्या अतिपावसामुळे साठवलेला कांदा सडू लागल्याने शेतकºयांनी बााजारात आणल्याने आवक वाढली .लसूणही ठरतोेय वरचढगेल्या दोन महिन्यांपूर्वी सुमारे ८० ते ९० रयपये किलो दराने विकला जाणारा लसूण आता तब्बल दुप्पट दराने मिळू लागला आहे. त्यामुळे बाजारात इतर भाज्यांच्या तुलनेतल लसूण वरचढ ठरत असून १४० ते १६० रुपये किलो दरान मिळत आहे.वांग्याच्या भावातही वाढगेल्या दोन महिन्यांपूर्वी केवळ १० ते २० रुपये किलो दराने मिळणारी वांगी आता दुप्पट दराने मिळू लागली आहेत. शहरातील भाजीबाजारात आज वांगी सुमारे ३० ते ४० रुपये किलो दराने मिळत आहेत. त्यामुळे ग्राहकांना भाजीपाला खरेदी करताना आथिर्क फटका बसत आहे. गावरानी वांगी मोठ्या प्रमाणात विकायलायेत आहेत.कोरोनामुळे लॉकडाऊनमुळे शहरात कळवण, सटाणा, देवळा आणि कळवण प्रिसरातून येणारा भाजीपाला काही प्रमाणात येणे कमी झाले होते. त्यामुळष भाजीपाल्याच्या दरात विक्रमी वाढ झाली होती. आता काही भाज्यांचे दर कमी झाले आहेत. - संजीव त्रिमुखे, भाजीविक्रेता,मालेगाव कॅम्पमालेगावात राज्यातील बाहेरून येणाºया येणाºया फळांची कोरोनामुळे आवक कमी झाली. फळ व्यापाºयांनी साठवून ठेवलेला माल बाजारात काढता आला नाही. त्यामुळे त्यांचे नुकसान झाले. आताा साठवणूक केलेला माल संपला आहे. यामुळे फळांचे भाव वाढले आहेत. - दिनेश श्रीखंडे , ग्राहक

टॅग्स :Nashikनाशिक