शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
3
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
4
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
5
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
6
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
7
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
8
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
9
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
10
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
11
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
12
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
13
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
14
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
15
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
16
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
17
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
18
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
19
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
20
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...

भाजीपाला कवडीमोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2018 01:00 IST

सायखेडा : पाण्याची तीव्र टंचाई असतानाही शेतात पिकविलेला भाजीपाला शेतकऱ्यांना कवडीमोल भावाने विकावा लागत असल्याने वाढत्या खर्चाने शेतकºयांचे कंबरडे मोडले आहे. वाहतूक आणि मजुरी यासाठी ३०० रुपये प्रति क्विंटलसाठी खर्च केलेले गाजर २०० रु. प्रतिक्विंटल गेल्याने शेतकºयाला खिशातून खर्च करावा लागत आहे.

ठळक मुद्देगाजर २०० रुपये क्ंिवटल भांडवल वसूल होत नसल्याने शेतकरी हवालदिल

 

 

सायखेडा : पाण्याची तीव्र टंचाई असतानाही शेतात पिकविलेला भाजीपाला शेतकऱ्यांना कवडीमोल भावाने विकावा लागत असल्याने वाढत्या खर्चाने शेतकºयांचे कंबरडे मोडले आहे. वाहतूक आणि मजुरी यासाठी ३०० रुपये प्रति क्विंटलसाठी खर्च केलेले गाजर२०० रु. प्रतिक्विंटल गेल्याने शेतकºयाला खिशातून खर्च करावा लागत आहे.फेब्रुवारी महिन्यात विहिरी तळ गाठतात, पाण्याची समस्या निर्माण होते. पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होते. अशा वेळी आपला उदरनिर्वाह चालावा, कुटुंबाचे गुजराण चालावे, मुलांचा खर्च कुठूनतरी उपलब्ध करावा यासाठी अनेक शेतकरी पाच ते दहा गुंठे भाजीपाला शेतात करत असतात. भरउन्हात बाजारभाव मिळून चार पैसे मिळतील अशी अपेक्षा असते. मुबलक उत्पादन मिळाले नाही तरी किमान कुटुंबाचा खर्च चालवा, असे शेतकºयांना वाटत असते.आज पारंपरिक पद्धतीने शेती न करता अनेक तरुण शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतमाल पिकवतात. त्यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागतो. अशा भावात भांडवलदेखील वसूल होत नसल्याने भर उन्हाळ्यात भाजीपाल्याने शेतकºयांचे कंबरडे मोडले आहे.खर्चाचा नाही मेळ अन् खिशाला बसते झळ...शेतमाल आज कवडीमोल भावात विक्र ी होत असल्याने ऐन उन्हाळ्यात पिकासाठी केलेला खर्च वसूल होत नाही. अनेक शेतकºयांनी तर तोडणीसाठी आलेला शेतमाल शेतात सोडून दिला आहे. शिंगवे येथील शेतकºयांचे नाशिक बाजार समितीत गाजर २ प्रतिकिलो दराने विक्र ी झाले. गाजर शेतातून काढून बाजार समितीच्या आवारात आणण्यासाठी क्विंटलसाठी ३०० रु. खर्च येतो शेतकºयांना १०० रु. खिशातून द्यावे लागले तर मिरची १० रु . प्रतिकिलो विक्र ी झाल्याने खर्च वसूल होत नाही, असा कोणताच शेतमाल नाही की ज्याला चांगला भाव मिळत आहे सर्व भाजीपाला कवडीमोल भावात विकावा लागत आहे.शेतात नेमकं काय पिकवावं याचा सल्ला सरकारने द्यावा. वर्षभरात जे जे पीक केले ते कवडीमोल भावात विकावे लागले. शेतीचे उत्पन्न दुप्पट करणे दूरच राहिले. शेतकºयांना कर्ज बाजारी करून ठेवले आहे, सरकारची अनास्था, नियोजनाचा अभाव यामुळे ही वेळ आली आहे.- गोरख खालकर,माजी सरपंच, भेंडाळीउन्हाचे ४० डिग्री तपमान आणि पाण्याची टंचाई अशा परिस्थितीत पिकविलेला शेतमाल आज कवडीमोल भावात विक्र ी होत असल्याने खर्चदेखील वसूल होत नाही. तोडणी आणि वाहतुकीचा खर्च वसूल होत नाही तर भांडवल दूरच आहे. आज शेतीवर उपजीविका होऊ शकत नाही तर शेतकºयांची प्रगती दूर आहे.- दीपक डेर्ले, शेतकरी शिंगवे