शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोटातील कारचा मालक सलमान पोलिसांच्या ताब्यात; गाडी दुसऱ्याला विकल्याचा दावा! पोलिसांची चौकशी सुरू
2
लाल किल्ल्याजवळ कारचा भीषण स्फोट, ८ ठार; 'प्रत्येक अँगलने तपास करा', गृहमंत्री अमित शाह यांचे तातडीचे आदेश!
3
दिल्लीतील ‘ब्लास्ट’, मागील पाच वर्षांतील केरळनंतरचा ठरला सर्वात मोठा स्फोट
4
लाल किल्याजवळील स्फोटाने देश हादरला; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमित शाह यांना फोन, पोस्ट करत म्हणाले-
5
Red Fort Blast Video: अनेकांच्या उडाल्या चिंधड्या! स्फोटानंतरची दृश्ये बघून होईल थरकाप, नेमकी कुठे घडली घटना?
6
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल
7
Red Fort Blast:  कार हळूहळू सिग्नलजवळ येऊन थांबली अन् झाला स्फोट; पोलीस आयुक्तांनी सांगितली घटना
8
लाल किल्ल्याजवळील स्फोटानंतर महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये हाय अलर्ट! तपास यंत्रणा सतर्क
9
Delhi Red Fort Blast: मोठी बातमी! दिल्लीत लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोट, 8 जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
कुणाचा हात तुटून पडला, कुणाचा कोथळा बाहेर आला; प्रत्यक्षदर्शीने सांगितली दिल्ली स्फोटाची हादरवून टाकणारी घटना
11
'त्या' जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवार, शीतल तेजवानींना पोलिसांकडून क्लीन चिट
12
भयानक कोसळणार ...! मी १९७१ पासून सोने खरेदी करतोय, पण...; रॉबर्ट कियोसाकी यांच्या दाव्याने खळबळ 
13
दहशतवाद्यांच्या टोळीत महिला डॉक्टरही सामील, थेट पाकिस्तानशी कनेक्शन; कारमध्ये घेऊन फिरत होती एके ४७!
14
जडेजाला संघाबाहेर काढण्यात धोनी सगळ्यात पुढे असेल! माजी क्रिकेटरनं त्यामागचं कारणही सांगून टाकलं
15
भारताच्या शेजारी देशांत भरतो 'नवरीचा बाजार', खरेदी करण्यासाठी चीनमधून येतात लोक! काय आहे प्रकार?
16
राष्ट्रवादीने हटवले तरी रुपाली ठोंबरे पाटील 'प्रवक्त्या'च; पोस्ट करत म्हणाल्या, 'अजित पवारांना भेटून...'
17
ताजमहालसमोर साखरपुडा...! दोनवेळा ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकप जिंकविणारी भारताची सून होणार; कोण आहे ती...
18
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...
19
"मी तुझ्या बापाला मारलं, मृतदेह सुटकेसमध्ये..."; बायकोने नवऱ्याला संपवलं, लेकीला केला फोन
20
Honeymoon Destinations : गुलाबी थंडीत रोमँटिक हनिमून प्लॅन करताय? भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट!

भाजीपाला कवडीमोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2018 01:00 IST

सायखेडा : पाण्याची तीव्र टंचाई असतानाही शेतात पिकविलेला भाजीपाला शेतकऱ्यांना कवडीमोल भावाने विकावा लागत असल्याने वाढत्या खर्चाने शेतकºयांचे कंबरडे मोडले आहे. वाहतूक आणि मजुरी यासाठी ३०० रुपये प्रति क्विंटलसाठी खर्च केलेले गाजर २०० रु. प्रतिक्विंटल गेल्याने शेतकºयाला खिशातून खर्च करावा लागत आहे.

ठळक मुद्देगाजर २०० रुपये क्ंिवटल भांडवल वसूल होत नसल्याने शेतकरी हवालदिल

 

 

सायखेडा : पाण्याची तीव्र टंचाई असतानाही शेतात पिकविलेला भाजीपाला शेतकऱ्यांना कवडीमोल भावाने विकावा लागत असल्याने वाढत्या खर्चाने शेतकºयांचे कंबरडे मोडले आहे. वाहतूक आणि मजुरी यासाठी ३०० रुपये प्रति क्विंटलसाठी खर्च केलेले गाजर२०० रु. प्रतिक्विंटल गेल्याने शेतकºयाला खिशातून खर्च करावा लागत आहे.फेब्रुवारी महिन्यात विहिरी तळ गाठतात, पाण्याची समस्या निर्माण होते. पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होते. अशा वेळी आपला उदरनिर्वाह चालावा, कुटुंबाचे गुजराण चालावे, मुलांचा खर्च कुठूनतरी उपलब्ध करावा यासाठी अनेक शेतकरी पाच ते दहा गुंठे भाजीपाला शेतात करत असतात. भरउन्हात बाजारभाव मिळून चार पैसे मिळतील अशी अपेक्षा असते. मुबलक उत्पादन मिळाले नाही तरी किमान कुटुंबाचा खर्च चालवा, असे शेतकºयांना वाटत असते.आज पारंपरिक पद्धतीने शेती न करता अनेक तरुण शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतमाल पिकवतात. त्यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागतो. अशा भावात भांडवलदेखील वसूल होत नसल्याने भर उन्हाळ्यात भाजीपाल्याने शेतकºयांचे कंबरडे मोडले आहे.खर्चाचा नाही मेळ अन् खिशाला बसते झळ...शेतमाल आज कवडीमोल भावात विक्र ी होत असल्याने ऐन उन्हाळ्यात पिकासाठी केलेला खर्च वसूल होत नाही. अनेक शेतकºयांनी तर तोडणीसाठी आलेला शेतमाल शेतात सोडून दिला आहे. शिंगवे येथील शेतकºयांचे नाशिक बाजार समितीत गाजर २ प्रतिकिलो दराने विक्र ी झाले. गाजर शेतातून काढून बाजार समितीच्या आवारात आणण्यासाठी क्विंटलसाठी ३०० रु. खर्च येतो शेतकºयांना १०० रु. खिशातून द्यावे लागले तर मिरची १० रु . प्रतिकिलो विक्र ी झाल्याने खर्च वसूल होत नाही, असा कोणताच शेतमाल नाही की ज्याला चांगला भाव मिळत आहे सर्व भाजीपाला कवडीमोल भावात विकावा लागत आहे.शेतात नेमकं काय पिकवावं याचा सल्ला सरकारने द्यावा. वर्षभरात जे जे पीक केले ते कवडीमोल भावात विकावे लागले. शेतीचे उत्पन्न दुप्पट करणे दूरच राहिले. शेतकºयांना कर्ज बाजारी करून ठेवले आहे, सरकारची अनास्था, नियोजनाचा अभाव यामुळे ही वेळ आली आहे.- गोरख खालकर,माजी सरपंच, भेंडाळीउन्हाचे ४० डिग्री तपमान आणि पाण्याची टंचाई अशा परिस्थितीत पिकविलेला शेतमाल आज कवडीमोल भावात विक्र ी होत असल्याने खर्चदेखील वसूल होत नाही. तोडणी आणि वाहतुकीचा खर्च वसूल होत नाही तर भांडवल दूरच आहे. आज शेतीवर उपजीविका होऊ शकत नाही तर शेतकºयांची प्रगती दूर आहे.- दीपक डेर्ले, शेतकरी शिंगवे