शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
3
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
4
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
5
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
6
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
7
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
8
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
9
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
10
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
11
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
12
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
13
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
14
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
15
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
16
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
17
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
18
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
19
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
20
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
Daily Top 2Weekly Top 5

शंकराचार्य पदाचा दावा सांगणारे वासुदेवानंद खोटारडे

By admin | Updated: September 22, 2015 23:03 IST

स्वरूपानंद सरस्वती यांचा आरोप

त्र्यंबकेश्वर : वारसाहक्काप्रमाणे आपण ज्योतिर्मठाचे शंकराचार्य असून, आपले म्हणणे पटवून देण्यासाठी सुप्रीम कोर्टापर्यंत धाव घेणाऱ्या वासुदेवानंद स्वामी यांचा दावा कोर्टाने फेटाळला असून, शंकराचार्य पदाचे सिंहासन, छत्र, चावर न वापरण्याचे आदेशही दिले आहेत. देशभरात सुरू असलेल्या खोट्या व स्वयंघोषित शंकराचार्यांचा सुळसुळाट समाजासाठी घातक असल्याचे प्रतिपादन शारदापीठाचे शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वती यांनी आयोजित पत्रकार परिषदेत केले.केशवस्मृती निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत ते पुढे म्हणाले की, सनातन धर्माचे रक्षण व प्रसार करण्यासाठी गंगेचे आणि हिंदुधर्माचे रक्षण सातत्याने होत राहावे या हेतूने आद्यगुरू शंकराचार्यांनी चार पीठांची निर्मिती केली होती. आजही केवळ चारच शंकराचार्य हे खरे शंकराचार्य असून, बाकीचे शंकराचार्य खोटे व स्वयंघोषित आहेत, असेही त्यांनी सांगितले.स्वत:ला शंकराचार्य म्हणवणाऱ्या नरेंद्रानंद यांच्याविषयी ते म्हणाले की, शंकराचार्यांनी काशीमध्ये कुठलाही मठ बनविलेला नव्हता. त्यामुळे ते कोणत्या आधारावर स्वत:ला काशीपीठाचे शंकराचार्य म्हणवता, याचे उत्तर त्यांनी द्यावे. हे शंकराचार्य धर्माच्या नियमाचे उल्लंघन करून गंगा नदी ओलांडून त्र्यंबकराजाच्या मंदिरात दर्शनासाठी जातात. चतुर्मास संपेपर्यंत गंगानदी ओलांडू नये, असा नियम असल्याने आपणही त्र्यंबकमध्ये आल्यापासून एकदाही त्र्यंबकेश्वर मंदिरात गेलो नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. (प्रतिनिधी)