शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
3
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
4
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
5
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
6
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
7
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
8
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
9
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
10
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
11
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
12
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
13
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
14
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
15
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
16
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
17
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
18
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
19
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
20
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली

७७ हजार कुटुंबांना वनवासी कल्याण आश्रमाची मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:12 IST

नाशिक : जनजाती समाजाला स्वावलंबी स्वाभिमानी आणि संघटित करण्याचे कार्य वनवासी कल्याण आश्रमाच्या माध्यमातून संपूर्ण देशभरात होत आहे. संपूर्ण ...

नाशिक : जनजाती समाजाला स्वावलंबी स्वाभिमानी आणि संघटित करण्याचे कार्य वनवासी कल्याण आश्रमाच्या माध्यमातून संपूर्ण देशभरात होत आहे. संपूर्ण भारतभरातील २०८ जिल्ह्यातील ७७ हजारांपेक्षा अधिक कुटुंबांनी कल्याण आश्रमाच्या विविध सेवा योजनांचा लाभ घेतला असून, १७० जनजातीपर्यंत आणि २३ अतिमागास जनजातींपर्यंत कल्याण आश्रमाचा सतत संपर्क असल्याचे कल्याण आश्रमाचे राष्ट्रीय संघटन मंत्री अतुल जोग यांनी सांगितले.

समर्पित कार्यकर्ता व त्याच्यातील सातत्य हेच अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रमाच्या विस्ताराचे गमक असल्याचे प्रतिपादन कल्याण आश्रमाचे राष्ट्रीय संघटन मंत्री अतुल जोग यांनी केले. नाशिकमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी संस्थेचे कार्य विशद केले. अखिल भारतीय पातळीवर कल्याण आश्रमाचे तब्बल ४५१० शैक्षणिक प्रकल्प सुरू असून १,३८,५७० लाभार्थी कल्याण आश्रमाच्या विविध सेवाकार्यांचा लाभ घेत आहेत. त्यात खेलकूद केंद्रे, सांस्कृतिक केंद्रे, स्वमदत गट ग्राम विकास प्रकल्प, आरोग्य शिबिरे, ग्रामीण आरोग्यरक्षक योजना यासारख्या विविध कार्यांचा समावेश आहे. कोरोना काळातही कल्याण आश्रमाने आपले दायित्व अत्यंत चोखपणे बजावून दुर्गम व अतिदुर्गम भागात धान्य शिधा तसेच बी-बियाणे व खते यांचे वितरण केलेले आहे. जनजातीय समाजाच्या विद्यार्थ्यांबद्दल बोलताना ते म्हणाले की, केवळ पुस्तकी ज्ञानच नव्हे तर क्रीडा क्षेत्रातही जनजाती समाजाने असामान्य कर्तृत्व दाखवलेले आहे. त्यांच्यातील सुप्त गुणांचा शोध घेत, त्यांचा विकास करण्याचे महत्त्वाचे कार्य कल्याण आश्रम पार पाडीत आहे. शहरी व ग्रामीण क्षेत्रातील हजारो समर्पित कार्यकर्ते हे आपापल्या क्षेत्रात पाय रोवून भक्कमपणे उभे राहिलेले आहेत. त्यांच्याच बळावर वनवासी क्षेत्राच्या प्रत्येक कोपऱ्यात हे कार्य पोहोचू शकेल व प्रत्येक समस्येला तोंड देऊ शकेल असे देशव्यापी संघटन उभारण्यात कल्याण आश्रम यशस्वी ठरलेले असल्याचे आश्रमाचे महाराष्ट्र प्रांत सचिव शरद शेळके उपस्थित होते.