शहरं
Join us  
Trending Stories
1
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
3
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
4
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती
5
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
6
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
7
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
8
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
9
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
10
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने शरणागती पत्कारल्यानंतर भारताने युद्धविरामाला सहमती दर्शवली- फडणवीस
11
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
12
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
13
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
14
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
15
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
16
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
17
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
18
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
19
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
20
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार

७७ हजार कुटुंबांना वनवासी कल्याण आश्रमाची मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:12 IST

नाशिक : जनजाती समाजाला स्वावलंबी स्वाभिमानी आणि संघटित करण्याचे कार्य वनवासी कल्याण आश्रमाच्या माध्यमातून संपूर्ण देशभरात होत आहे. संपूर्ण ...

नाशिक : जनजाती समाजाला स्वावलंबी स्वाभिमानी आणि संघटित करण्याचे कार्य वनवासी कल्याण आश्रमाच्या माध्यमातून संपूर्ण देशभरात होत आहे. संपूर्ण भारतभरातील २०८ जिल्ह्यातील ७७ हजारांपेक्षा अधिक कुटुंबांनी कल्याण आश्रमाच्या विविध सेवा योजनांचा लाभ घेतला असून, १७० जनजातीपर्यंत आणि २३ अतिमागास जनजातींपर्यंत कल्याण आश्रमाचा सतत संपर्क असल्याचे कल्याण आश्रमाचे राष्ट्रीय संघटन मंत्री अतुल जोग यांनी सांगितले.

समर्पित कार्यकर्ता व त्याच्यातील सातत्य हेच अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रमाच्या विस्ताराचे गमक असल्याचे प्रतिपादन कल्याण आश्रमाचे राष्ट्रीय संघटन मंत्री अतुल जोग यांनी केले. नाशिकमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी संस्थेचे कार्य विशद केले. अखिल भारतीय पातळीवर कल्याण आश्रमाचे तब्बल ४५१० शैक्षणिक प्रकल्प सुरू असून १,३८,५७० लाभार्थी कल्याण आश्रमाच्या विविध सेवाकार्यांचा लाभ घेत आहेत. त्यात खेलकूद केंद्रे, सांस्कृतिक केंद्रे, स्वमदत गट ग्राम विकास प्रकल्प, आरोग्य शिबिरे, ग्रामीण आरोग्यरक्षक योजना यासारख्या विविध कार्यांचा समावेश आहे. कोरोना काळातही कल्याण आश्रमाने आपले दायित्व अत्यंत चोखपणे बजावून दुर्गम व अतिदुर्गम भागात धान्य शिधा तसेच बी-बियाणे व खते यांचे वितरण केलेले आहे. जनजातीय समाजाच्या विद्यार्थ्यांबद्दल बोलताना ते म्हणाले की, केवळ पुस्तकी ज्ञानच नव्हे तर क्रीडा क्षेत्रातही जनजाती समाजाने असामान्य कर्तृत्व दाखवलेले आहे. त्यांच्यातील सुप्त गुणांचा शोध घेत, त्यांचा विकास करण्याचे महत्त्वाचे कार्य कल्याण आश्रम पार पाडीत आहे. शहरी व ग्रामीण क्षेत्रातील हजारो समर्पित कार्यकर्ते हे आपापल्या क्षेत्रात पाय रोवून भक्कमपणे उभे राहिलेले आहेत. त्यांच्याच बळावर वनवासी क्षेत्राच्या प्रत्येक कोपऱ्यात हे कार्य पोहोचू शकेल व प्रत्येक समस्येला तोंड देऊ शकेल असे देशव्यापी संघटन उभारण्यात कल्याण आश्रम यशस्वी ठरलेले असल्याचे आश्रमाचे महाराष्ट्र प्रांत सचिव शरद शेळके उपस्थित होते.