शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

वाहतूक कोंडीमुळे मंत्री, आमदारांचे ‘वंदे भारत’; नाशिक- मुंबई रोडची दुरवस्था

By संकेत शुक्ला | Updated: July 7, 2024 21:29 IST

रेल्वेने प्रवास करून नियोजन बैठकीला हजेरी

संकेत शुक्ल, नाशिक: रस्त्यावर पडलेले खड्डे... कसारा घाटात कोसळलेली दरड आणि महामार्गावर कायम होणाऱ्या वाहतूक कोंडीचा फटका बसल्यामुळे पालकमंत्री दादा भुसे यांच्यासह आमदारांना वंदे भारत रेल्वेने प्रवास करीत जिल्हाधिकारी कार्यालय गाठावे लागले. वाहतूककोंडीमुळे जनता त्रस्त झालेली असताना त्याचा फटका लोकप्रतिनिधींनाही बसल्याने त्यावर जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या नियोजन समितीच्या बैठकीत सदस्यांनी नाराजीचा सूर आळवला.

त्यावर तोडगा काढण्यासाठी मंत्रालयात सोमवारी (दि.८) बैठक आयोजीत करण्यात आल्याची माहिती पालकमंत्री दादा भुसे यांनी दिली. लोकसभा निवडणूक तसेच विधानपरिषद निवडणुकीच्या आचारसंहितेत अडकलेली जिल्हा नियोजन समितीची बैठक पालकमंत्री दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी (दि. ७) पार पडली. यावेळी उपस्थित असलेल्या जवळपास सर्वच आमदारांनी मुंबईला जात असताना येणाऱ्या समस्यांचा पाढा वाचला. आ. कोकाटे यांनी याप्रश्नी संबंधित विभागांना धारेवर धरीत महामार्गावर लावण्यात येणाऱ्या मोठमोठ्या ट्रेलरमुळे वाहतुकीची कोंडी होत असून त्या ठिकाणी पार्किंगला परवानगीच कशी मिळते असा प्रश्न उपस्थित केला.

नाशिक-मुंबई महामार्गावरील खड्डे तसेच ठिकठिकाणी संथगतीने सुरू असलेल्या कामांवरून लाेकप्रतिनिधींनी आक्रमक भूमिका घेतली. महामार्गावरून प्रवासासाठी तासनतास लागत असल्याने वाहने मुंबईत सोडून रेल्वेने आलो आहोत. सोमवारी (दि. ८) सकाळी १० वाजता मुंबईत बैठक असून रेल्वेनेही जाणे शक्य होणार नसल्याची व्यथाच लाेकप्रतिनिधींनी व्यक्त केली. प्रवाशांच्या व्यथा लक्षात घेत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना बैठकीत का बोलविले नाही, असा जाबदेखील लोकप्रतिनिधींनी विचारला.

यावर पालकमंत्री भुसे यांनी ऑक्टोबर अखेरपर्यंत भिंवडी बायपासचे काम पूर्ण केले जाईल. तेथे १२ लेनचा रस्ता असून पोलिसांच्या मदतीला १०० अतिरिक्त कर्मचारी तैैनात केल्याची माहिती भुसे यांनी दिली. यासंदर्भात यंत्रणेला सुचना देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगीतले.

नाशिक-मुंबई महामार्गाच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी सोमवारी (दि.८) मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठक बोलविली आहे. या बैठकीची माहिती मंत्रालय स्तरावर आधी मिळाली असती तर संबंधित अधिकाऱ्यांना त्याबाबत सूचना देण्यात आली असती, ठाणे जिल्हाधिकारी यांनीही यासंदर्भात बैठक बोलावली असून मंत्रालयात उद्या होणाऱ्या बैठकीत मार्ग काढला जाईल.- दादा भुसे, पालकमंत्री

टॅग्स :Vande Bharat Expressवंदे भारत एक्सप्रेस