शहरं
Join us  
Trending Stories
1
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
2
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
3
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
4
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
5
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
6
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
7
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
8
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
9
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
10
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
11
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
12
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
13
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?
14
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
15
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
16
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
17
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
18
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
19
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
20
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?

वाहतूक कोंडीमुळे मंत्री, आमदारांचे ‘वंदे भारत’; नाशिक- मुंबई रोडची दुरवस्था

By संकेत शुक्ला | Updated: July 7, 2024 21:29 IST

रेल्वेने प्रवास करून नियोजन बैठकीला हजेरी

संकेत शुक्ल, नाशिक: रस्त्यावर पडलेले खड्डे... कसारा घाटात कोसळलेली दरड आणि महामार्गावर कायम होणाऱ्या वाहतूक कोंडीचा फटका बसल्यामुळे पालकमंत्री दादा भुसे यांच्यासह आमदारांना वंदे भारत रेल्वेने प्रवास करीत जिल्हाधिकारी कार्यालय गाठावे लागले. वाहतूककोंडीमुळे जनता त्रस्त झालेली असताना त्याचा फटका लोकप्रतिनिधींनाही बसल्याने त्यावर जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या नियोजन समितीच्या बैठकीत सदस्यांनी नाराजीचा सूर आळवला.

त्यावर तोडगा काढण्यासाठी मंत्रालयात सोमवारी (दि.८) बैठक आयोजीत करण्यात आल्याची माहिती पालकमंत्री दादा भुसे यांनी दिली. लोकसभा निवडणूक तसेच विधानपरिषद निवडणुकीच्या आचारसंहितेत अडकलेली जिल्हा नियोजन समितीची बैठक पालकमंत्री दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी (दि. ७) पार पडली. यावेळी उपस्थित असलेल्या जवळपास सर्वच आमदारांनी मुंबईला जात असताना येणाऱ्या समस्यांचा पाढा वाचला. आ. कोकाटे यांनी याप्रश्नी संबंधित विभागांना धारेवर धरीत महामार्गावर लावण्यात येणाऱ्या मोठमोठ्या ट्रेलरमुळे वाहतुकीची कोंडी होत असून त्या ठिकाणी पार्किंगला परवानगीच कशी मिळते असा प्रश्न उपस्थित केला.

नाशिक-मुंबई महामार्गावरील खड्डे तसेच ठिकठिकाणी संथगतीने सुरू असलेल्या कामांवरून लाेकप्रतिनिधींनी आक्रमक भूमिका घेतली. महामार्गावरून प्रवासासाठी तासनतास लागत असल्याने वाहने मुंबईत सोडून रेल्वेने आलो आहोत. सोमवारी (दि. ८) सकाळी १० वाजता मुंबईत बैठक असून रेल्वेनेही जाणे शक्य होणार नसल्याची व्यथाच लाेकप्रतिनिधींनी व्यक्त केली. प्रवाशांच्या व्यथा लक्षात घेत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना बैठकीत का बोलविले नाही, असा जाबदेखील लोकप्रतिनिधींनी विचारला.

यावर पालकमंत्री भुसे यांनी ऑक्टोबर अखेरपर्यंत भिंवडी बायपासचे काम पूर्ण केले जाईल. तेथे १२ लेनचा रस्ता असून पोलिसांच्या मदतीला १०० अतिरिक्त कर्मचारी तैैनात केल्याची माहिती भुसे यांनी दिली. यासंदर्भात यंत्रणेला सुचना देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगीतले.

नाशिक-मुंबई महामार्गाच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी सोमवारी (दि.८) मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठक बोलविली आहे. या बैठकीची माहिती मंत्रालय स्तरावर आधी मिळाली असती तर संबंधित अधिकाऱ्यांना त्याबाबत सूचना देण्यात आली असती, ठाणे जिल्हाधिकारी यांनीही यासंदर्भात बैठक बोलावली असून मंत्रालयात उद्या होणाऱ्या बैठकीत मार्ग काढला जाईल.- दादा भुसे, पालकमंत्री

टॅग्स :Vande Bharat Expressवंदे भारत एक्सप्रेस