शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
2
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
3
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
4
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
5
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
6
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
7
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
8
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
9
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
10
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
11
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
12
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
13
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
14
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
15
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी कर्णधार सूर्याने टीम इंडियाला दिला असा सल्ला, म्हणाला फोन बंद करा आणि...  
16
Scuba Diving : १०, २० की ३० मीटर? पाण्यात नेमके किती खोलवर जातात स्कूबा डायव्हर्स?
17
Navratri 2025: नवरात्रीत का घ्यावा सात्त्विक आहार? त्यामुळे शरीराला कोणते लाभ होतात?
18
VIDEO: माकडाने अचानक महिलेच्या डोक्यावरून हिसकावला गॉगल.. पुढे जे झालं ते पाहून व्हाल थक्क
19
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
20
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!

लोकप्रतिनिधींना गावबंदी व आगामी निवडणुकांवर बहिष्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2018 16:47 IST

उमराणे : चणकापुर झाडी एरंडगांव उजवा कालव्याचा प्रश्न प्रत्येक निवडणुकीत वापरला जातो. या प्रलंबित प्रश्नाची सोडवणुकीसाठी लोकप्रतिनिधी प्रयत्न करीत नाहीत. यापुढील निवडणुकांवर बिहष्कार टाकण्याचा व गांवबंदीचा निर्णय तिसगांव (ता. देवळा) येथील ग्रामस्थांनी घेतला आहे.

ठळक मुद्देतिसगाव ग्रामस्थांचा ठराव : चणकापुर झाडी एरंडगाव कालवा प्रकरण

उमराणे : चणकापुर झाडी एरंडगांव उजवा कालव्याचा प्रश्न प्रत्येक निवडणुकीत वापरला जातो. या प्रलंबित प्रश्नाची सोडवणुकीसाठी लोकप्रतिनिधी प्रयत्न करीत नाहीत. यापुढील निवडणुकांवर बिहष्कार टाकण्याचा व गांवबंदीचा निर्णय तिसगांव (ता. देवळा) येथील ग्रामस्थांनी घेतला आहे.हनुमान मंदिरात झाडी एरंडगांव कालवा संदर्भात ग्रामपंचायत, सोसायटीचे पदाधिकारी, ग्रामस्थांची बैठक झाली. पंचेचाळीस वर्षांपासून पूर्णत्वाच्या प्रतीक्षेत असलेला चणकापूर झाडी एरंडगाव कालवा काम कधी पूर्ण होईल व चणकापूर धरणाचे पाणी झाडी एरंडगाव धरणात कधी पडेल असा संतप्त सवाल देवळा तालुक्याच्या पूर्व भागातील जनता कायम करत असते. हा कालवा या भागातील जनतेसाठी एक दिवास्वप्न बनला आहे. चणकापूर ते झाडी एरंडगाव उजवा कालवा गेल्या अनेक वर्षांपासून टप्प्याटप्प्याने निवडणुकींच्या माध्यमातून पुढे सरकत आला आहे. लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समतिी किंबहुना साध्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीतही कालवा पूर्णत्वाचे स्वप्न राजकीय मंडळींनी दाखिवले आहे. पाण्याच्या अपेक्षेवर या भागातील जनता निवडणुकांत जो उमेदवार जास्त प्रभावीपणे कालवा पूर्णत्वाचा प्रश्न जनतेसमोर मांडेल त्याला आजपर्यंतच्या निवडणुकांत निवडून दिले आहे. परिणामी हा कालवा जणू राजकीय मंडळींना निवडणुकीचे भांडवल म्हणून बनला आहे. खडतर प्रवासातून मार्गक्र मण करणार्या पुनद प्रकल्पांतर्गत चणकापूर ते झाडी एरंडगाव या ?? कि.मी. अंतराच्या कालव्याचा इतिहासात बघता जिल्ह्यातील कळवण, देवळा, मालेगाव आदी दुष्काळी भागातील पाणीप्रश्न सोडविण्यासाठी सर्वप्रथम या उजव्या कालव्याला मंजुरी मिळाली होती. कालव्याचे काम पूर्ण होऊन पाणी मिळावे यासाठी उमराणे, चिंचवे, सांगवी, कुंभार्डे, गिरणारे, झाडी, तिसगाव, वर्हाळे, सावकारवाडी, एरंडगाव आदी गावांतील जनतेकडून शासनाकडे अनेकवेळा मागणी केली. परंतु शासनाने याची फारशी दखल घेतली नाही. दहीवड ते झाडीपर्यंतचे अपूर्णावस्थेतील काम लवकर पूर्ण केले तरच खर्या अर्थाने अवर्षण प्रवर्षणग्रस्त भाग म्हणून ओळखल्या जाणार्या देवळा तालुक्याच्या पूर्व भागातील जनतेला चणकापूर उजव्या कालव्याच्या पाण्याची चव चाखायला मिळेल. या प्रश्नाचे राजकीय भांडवल करत निवडणुका लढविल्या जात आहेत. दुष्काळी भागातील जनतेला पाणी देण्यासाठी लोकप्रतिनिधी फारसे लक्ष देत नाहीत असा विचार बैठकीत मांडण्यात आला. या झाडी एरंडगांव उजवा कालवा कामाच्या पुर्ततेसाठी अखेर ग्रामस्थांनी आगामी काळातील लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समतिी, ग्रामपंचायत निवडणुकींवर बिहष्कार टाकण्याचा व लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी यांना गावबंदी करण्याचा निर्णय घेतला आहे. बैठकीस सरपंच दत्तु आहेर, बाजार समतिीचे उपसभापती महेंद्र पाटील, माजी सरपंच देवा वाघ, बाजार समतिी संचालक बाळासाहेब आहेर यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, सोसायटीचे पदाधिकारी, संचालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.