शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
2
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
3
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
4
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
5
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
6
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
7
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...
8
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."
9
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
10
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
11
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
12
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!
13
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
14
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
15
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
16
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
17
बिहारनंतर आता या राज्यातही होणार मतदार याद्यांचं पुनरीक्षण, निवडणूक आयोगाने दिले आदेश   
18
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास
19
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
20
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल

लोकप्रतिनिधींना गावबंदी व आगामी निवडणुकांवर बहिष्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2018 16:47 IST

उमराणे : चणकापुर झाडी एरंडगांव उजवा कालव्याचा प्रश्न प्रत्येक निवडणुकीत वापरला जातो. या प्रलंबित प्रश्नाची सोडवणुकीसाठी लोकप्रतिनिधी प्रयत्न करीत नाहीत. यापुढील निवडणुकांवर बिहष्कार टाकण्याचा व गांवबंदीचा निर्णय तिसगांव (ता. देवळा) येथील ग्रामस्थांनी घेतला आहे.

ठळक मुद्देतिसगाव ग्रामस्थांचा ठराव : चणकापुर झाडी एरंडगाव कालवा प्रकरण

उमराणे : चणकापुर झाडी एरंडगांव उजवा कालव्याचा प्रश्न प्रत्येक निवडणुकीत वापरला जातो. या प्रलंबित प्रश्नाची सोडवणुकीसाठी लोकप्रतिनिधी प्रयत्न करीत नाहीत. यापुढील निवडणुकांवर बिहष्कार टाकण्याचा व गांवबंदीचा निर्णय तिसगांव (ता. देवळा) येथील ग्रामस्थांनी घेतला आहे.हनुमान मंदिरात झाडी एरंडगांव कालवा संदर्भात ग्रामपंचायत, सोसायटीचे पदाधिकारी, ग्रामस्थांची बैठक झाली. पंचेचाळीस वर्षांपासून पूर्णत्वाच्या प्रतीक्षेत असलेला चणकापूर झाडी एरंडगाव कालवा काम कधी पूर्ण होईल व चणकापूर धरणाचे पाणी झाडी एरंडगाव धरणात कधी पडेल असा संतप्त सवाल देवळा तालुक्याच्या पूर्व भागातील जनता कायम करत असते. हा कालवा या भागातील जनतेसाठी एक दिवास्वप्न बनला आहे. चणकापूर ते झाडी एरंडगाव उजवा कालवा गेल्या अनेक वर्षांपासून टप्प्याटप्प्याने निवडणुकींच्या माध्यमातून पुढे सरकत आला आहे. लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समतिी किंबहुना साध्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीतही कालवा पूर्णत्वाचे स्वप्न राजकीय मंडळींनी दाखिवले आहे. पाण्याच्या अपेक्षेवर या भागातील जनता निवडणुकांत जो उमेदवार जास्त प्रभावीपणे कालवा पूर्णत्वाचा प्रश्न जनतेसमोर मांडेल त्याला आजपर्यंतच्या निवडणुकांत निवडून दिले आहे. परिणामी हा कालवा जणू राजकीय मंडळींना निवडणुकीचे भांडवल म्हणून बनला आहे. खडतर प्रवासातून मार्गक्र मण करणार्या पुनद प्रकल्पांतर्गत चणकापूर ते झाडी एरंडगाव या ?? कि.मी. अंतराच्या कालव्याचा इतिहासात बघता जिल्ह्यातील कळवण, देवळा, मालेगाव आदी दुष्काळी भागातील पाणीप्रश्न सोडविण्यासाठी सर्वप्रथम या उजव्या कालव्याला मंजुरी मिळाली होती. कालव्याचे काम पूर्ण होऊन पाणी मिळावे यासाठी उमराणे, चिंचवे, सांगवी, कुंभार्डे, गिरणारे, झाडी, तिसगाव, वर्हाळे, सावकारवाडी, एरंडगाव आदी गावांतील जनतेकडून शासनाकडे अनेकवेळा मागणी केली. परंतु शासनाने याची फारशी दखल घेतली नाही. दहीवड ते झाडीपर्यंतचे अपूर्णावस्थेतील काम लवकर पूर्ण केले तरच खर्या अर्थाने अवर्षण प्रवर्षणग्रस्त भाग म्हणून ओळखल्या जाणार्या देवळा तालुक्याच्या पूर्व भागातील जनतेला चणकापूर उजव्या कालव्याच्या पाण्याची चव चाखायला मिळेल. या प्रश्नाचे राजकीय भांडवल करत निवडणुका लढविल्या जात आहेत. दुष्काळी भागातील जनतेला पाणी देण्यासाठी लोकप्रतिनिधी फारसे लक्ष देत नाहीत असा विचार बैठकीत मांडण्यात आला. या झाडी एरंडगांव उजवा कालवा कामाच्या पुर्ततेसाठी अखेर ग्रामस्थांनी आगामी काळातील लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समतिी, ग्रामपंचायत निवडणुकींवर बिहष्कार टाकण्याचा व लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी यांना गावबंदी करण्याचा निर्णय घेतला आहे. बैठकीस सरपंच दत्तु आहेर, बाजार समतिीचे उपसभापती महेंद्र पाटील, माजी सरपंच देवा वाघ, बाजार समतिी संचालक बाळासाहेब आहेर यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, सोसायटीचे पदाधिकारी, संचालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.