शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

वंचित बहुजन आघाडीतर्फे येवला तहसीलवर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2019 19:05 IST

येवला : जगातील अनेक लोकशाही देशांनी इव्हीएम मशीन नाकारले असतांना सर्वश्रेष्ठ संविधानामुळे समृद्ध असलेल्या भारत देशात वंचित बहुजन समाजाचे प्रतिनिधित्व नाकारणाऱ्या प्रस्थापित सरकारने इव्हीएम मशीनचा स्वीकार केला आहे,असा आरोप करीत आगामी सार्वत्रिक निवडणुका या बॅलेट पेपरवर घेण्यात यावीया मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीतर्फे भारतीय रिपब्लिकन पक्षाचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब अहिरे यांच्या नेतृत्वाखाली येवला तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.यावेळी इव्हीएम हटाव, देश बचाव घंटानाद आंदोलन वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या आदेशाने करण्यात आले.

राज्यातील सर्व ४८ मतदारसंघामध्ये एकूण झालेले मतदान आणि प्रत्यक्ष मोजणी केलेले मतदान यामध्ये तफावत आढळून येत आहे. २२ मतदारसंघामध्ये मतदान करणाऱ्यांची संख्या मोजण्यात आलेल्या मतांपेक्षा कमी आहे.उर्वरित २६ मतदार संघामध्ये मतदान करणा-यांची संख्या मोजण्यात आलेल्या मतांपेक्षा जास्त आहे.निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावरील माहितीच्या आकडेवारीमध्ये तफावत आढळून आली आहे.तहसीलप्रांगणात बोलताना भाऊसाहेब अहिरे यांनी सांगितले की ,प्रत्यक्ष झालेले मतदान आणि मोजण्यात आलेल्या मतांच्या संख्येमध्ये तफावत येण्याचे नेमके कारण काय ? याचे निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण दयावे. आगामी निवडणुका या बॅलेट पेपरवर घेण्यात यावी.यावेळी शहराध्यक्ष संदिप जोंधळे,विलास देहाडे, भानुदास पठारे,सविता धिवर,रेखाताई साबळे,भगवान रसाळ,गौतम घोडेराव,हमजा भाई,दयानंद जाधव,अविनाश धिवर ,समाधान धिवर,अशोक घोडेराव,शेरु भाई मोमीन, पंचम साळवे, प्रभाकर गायकवाड, संजय गरु ड, सिद्धार्थ निकम, ज्योती जगताप, नसीम शहा, शेहनज अजगर शहा,आशाबाई गुंजाळ,जयप्रकाश वाघ, पोपट वाघ आदींसह वंचित बहुजन आघाडी,भारिप बहुजन महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते.सदर घंटानाद आंदोलनास काँग्रेसचे शहराध्यक्ष नानासाहेब शिंदे, लालसेनाचे प्रदेशाध्यक्ष कॉ. जितेंद्र गायकवाड,भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब जाधव,रिपब्लिकन सेनेचे दिपक लाठे, छावा लभान क्र ांतीवीर सेनेचे प्रदेशाध्यक्ष मयराम नवले,एम आय एमचे कार्यकर्ते जमील पटेल,शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष श्रावण देवरे यांनी व्यक्त केला.

टॅग्स :Politicsराजकारण