शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने भारताची भीती घेतली! पीओकेमधील हॉटेल्स अन् गेस्ट हाऊसमध्ये सैन्य; मदरसे बंद
2
पाकिस्तानने अटारी, वाघा बॉर्डरचे गेट उघडले; धास्ती एवढी की पाकिस्तानींनाही घेत नव्हते...
3
श्रीराम दर्शनाची ओढ लागली, ३०० वर्षे जुनी परंपरा मोडली; हनुमानगढीचे महंत मंदिराबाहेर पडले!
4
बजाज चेतकला एप्रिल फूल बनविले; टीव्हीएस पहिल्यांदाच नंबर १, विक्रीत ओला कुठे...
5
पाकिस्तानी हवाई क्षेत्र बंद; एअर इंडियाल 5000 कोटी रुपयांचा फटका बसण्याचा अंदाज...
6
दारूच्या व्यसनाने आई आणि चुलतीचा खून; बीड जिल्हा दोन हत्येच्या घटनांनी हादरला
7
पंकजा मुंडेंना कॉल अन् पाठवला अश्लील मेसेज, पुण्यातील तरुणाला पोलिसांनी केली अटक
8
CEOs चा १ तासाचा पगार सामान्य कर्मचाऱ्याच्या वर्षाच्या पगाराइतका, एका रिपोर्टमध्ये झाले अनेक आश्चर्यकारक खुलासे
9
अन्न पुन्हा गरम करणं आरोग्यासाठी ठरतंय घातक; 'या' ५ गोष्टी टाळाल तरच ठणठणीत राहाल
10
 संतापजनक! मासिक पाळीत स्वयंपाक करणं महिलेच्या जीवावर बेतलं,नणंद आणि सासूने खून केल्याचा आरोप, दोन मुलं अनाथ
11
नवी मुंबईत ठाकरे गटाला खिंडार! माजी नगरसेवकांचे उद्धवसेनेला जय महाराष्ट्र, शिंदेसेनेत प्रवेश
12
"मॅडम येत आहेत, त्यांना..."; पोलीस असल्याचं सांगून दुकानात घुसले अन् २ लाखांचे दागिने चोरले
13
ISI कडून मिळाले आदेश, बेताब खोऱ्यात लपवली शस्त्रे; NIA च्या अहवालात धक्कादायक खुलासा
14
संजय राऊतांनी PM मोदींच्या नेतृत्वक्षमतेवर घेतली शंका; म्हणाले, “शाह यांचा राजीनामा का घेत नाही”
15
काश्मीरात सर्च ऑपरेशन सुरूच, आतापर्यत ३००० जण ताब्यात; जंगलात लपलेत पहलगाम हल्ल्याचे दहशतवादी
16
चिनी कर्मचाऱ्यांना पगारही मिळत नाहीये, ट्रम्प टॅरिफमुळे कारखाने होताहेत बंद; कामगार उतरले रस्त्यावर
17
हॉटेलमधील 'तो' पदार्थ खाणं पडलं महागात! निक्की तांबोळीला ICU मध्ये केलं दाखल, आता कशी आहे अभिनेत्रीची तब्येत?
18
"हा, आम्ही दहशतवादी पोसले पण आता..."; संरक्षण मंत्र्यानंतर बिलावल भुट्टोनेही दिली कबुली
19
Nashik Hit and Run: भावासमोरच जयश्रीने सोडला जीव, नाशिकमध्ये पिकअपने तीन वाहनांना उडवले
20
Ganga Saptami 2025: गंगा सप्तमीला 'हे' उपाय केले असता घरात येईल सुख समृद्धी!

कोरोनाचे दुष्टचक्र रोखण्यासाठी लसीकरण हाच पर्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:11 IST

नाशिक : कोरोना महामारीचे दुष्टचक्र तोडायचे असले तर प्रत्येकाचे लसीकरण होणे गरजेचे आहे. भूतानमध्ये जवळपास ९३ टक्के नागरिकांचे लसीकरण ...

नाशिक : कोरोना महामारीचे दुष्टचक्र तोडायचे असले तर प्रत्येकाचे लसीकरण होणे गरजेचे आहे. भूतानमध्ये जवळपास ९३ टक्के नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाल्याने भूतानमध्ये कोरोनाचा उद्रेक थांबला आहे. कोरोनाच्या संभाव्या तिसऱ्या लाटेशी यशस्वी लढा देऊन कोरोनामुक्त व्हायचे असेल तर प्रत्येकाचे लसीकरण होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन डॉ. धनंजय केळकर यांनी केले.

सार्वजनिक वाचनालयाद्वारे आयोजित ‘शब्दजागर’ या ऑनलाइन व्याख्यानमालेत ‘कोरोनाच्या चक्रव्यूहाचा भेद’ या विषयावर त्यांनी रविवारी (दि.३) पुष्प गुंफले. पुणे येथील मास्टर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे प्रमुख, जलनेतीकार डॉ. केळकर बोलत होते. यावेळी बोलताना डॉ. केळकर म्हणाले की, मी कोरोना आजारावर उपचार करणारा कोणी स्पेशालिस्ट डॉक्टर नाही. मात्र, आम्ही मास्टर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातून कोरोना शत्रूशी योग्य पद्धतीने लढा देत अनेक रुग्णांना कोरोनामुक्त केले आहे. ६५ ते ७० हजार रुग्ण कोरोनावरील उपचार घेत आहेत. कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी बाधित रुग्ण इतरांच्या संपर्कात येता कामा नये यासाठी गृहविलगीकरण हा महत्त्वाचा भाग दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने पुढे आणल्याचे डॉ. केळकरांनी आवर्जून नमूद केले. यावेळी डॉ. केळकर म्हणाले की, देश कोरोनामुक्त झालेला पाहायचा असेल तर त्यासाठी प्रत्येकाने लसीकरण करून घेणे महत्त्वाचे आहे. कोरोनाचे हे दुष्टचक्र केवळ लसीकरणानेच खंडित होण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्याशिवाय कोरोना चक्रव्यूहाचा भेद यासंदर्भात त्यांनी सखोल मार्गदर्शन केले. यावेळी प्रास्ताविक सावानाचे बालविभाग प्रमुख गिरीश नातू यांनी केले तर प्रमुख पाहुण्यांचा परिचय नाट्यगृह सचिव ॲड. अभिजित बगदे यांनी करून दिला, तर आभार अर्थसचिव उदयकुमार मुंगी यांनी मानले.

इन्फो

एक हजार बालकांवर यशस्वी उपचार

कोरोनाच्या वाढत्या उद्रेकामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले असून आता लहान बालकेदेखील या दुष्टचक्रात अडकत चालली आहेत. तिसरी लाट ही बालकांसाठी चितांजनक असल्याचे त्यांनी सांगितले. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात जवळपास १००० हजार बालकांवर यशस्वी उपचार करून त्यांना मृत्यूच्या दाढेतून सुखरूप बाहेर काढले आहे. बालकांवरील उपचारासाठी त्यांनी चेस्ट सीटी स्कॅन ही पद्धती वापरून योग्य उपचार केले आहेत.

इन्फो

पंचसूत्रीचा वापर गरजेचा

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव ही चिंतेची बाब आहे. मात्र, आपण प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोर पणे पालन केले, तर कोरोनामुक्त भारताचे स्वप्न साकार होण्यास वेळ लागणार नाही. सूर्यप्रकाश, मोकळी हवा, व्हिटॅमीन-डी, जलनेती, व्यायाम या पंचसूत्रीची आपल्या दैनंदिन जीवनात अंमलबजावणी केल्यास कोरोनामुक्तीचा दिवस दूर नसल्याचे डॉ. केळकरांनी सांगितले.