शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
3
SBI चा ग्राहकाना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
4
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
5
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
6
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
7
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
8
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
9
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
10
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
11
Dahi Handi 2025: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात न धुण्याच कारण काय?
12
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
13
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
14
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
15
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
16
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
17
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
18
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
19
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
20
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार

कोरोनाचे दुष्टचक्र रोखण्यासाठी लसीकरण हाच पर्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:11 IST

नाशिक : कोरोना महामारीचे दुष्टचक्र तोडायचे असले तर प्रत्येकाचे लसीकरण होणे गरजेचे आहे. भूतानमध्ये जवळपास ९३ टक्के नागरिकांचे लसीकरण ...

नाशिक : कोरोना महामारीचे दुष्टचक्र तोडायचे असले तर प्रत्येकाचे लसीकरण होणे गरजेचे आहे. भूतानमध्ये जवळपास ९३ टक्के नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाल्याने भूतानमध्ये कोरोनाचा उद्रेक थांबला आहे. कोरोनाच्या संभाव्या तिसऱ्या लाटेशी यशस्वी लढा देऊन कोरोनामुक्त व्हायचे असेल तर प्रत्येकाचे लसीकरण होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन डॉ. धनंजय केळकर यांनी केले.

सार्वजनिक वाचनालयाद्वारे आयोजित ‘शब्दजागर’ या ऑनलाइन व्याख्यानमालेत ‘कोरोनाच्या चक्रव्यूहाचा भेद’ या विषयावर त्यांनी रविवारी (दि.३) पुष्प गुंफले. पुणे येथील मास्टर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे प्रमुख, जलनेतीकार डॉ. केळकर बोलत होते. यावेळी बोलताना डॉ. केळकर म्हणाले की, मी कोरोना आजारावर उपचार करणारा कोणी स्पेशालिस्ट डॉक्टर नाही. मात्र, आम्ही मास्टर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातून कोरोना शत्रूशी योग्य पद्धतीने लढा देत अनेक रुग्णांना कोरोनामुक्त केले आहे. ६५ ते ७० हजार रुग्ण कोरोनावरील उपचार घेत आहेत. कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी बाधित रुग्ण इतरांच्या संपर्कात येता कामा नये यासाठी गृहविलगीकरण हा महत्त्वाचा भाग दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने पुढे आणल्याचे डॉ. केळकरांनी आवर्जून नमूद केले. यावेळी डॉ. केळकर म्हणाले की, देश कोरोनामुक्त झालेला पाहायचा असेल तर त्यासाठी प्रत्येकाने लसीकरण करून घेणे महत्त्वाचे आहे. कोरोनाचे हे दुष्टचक्र केवळ लसीकरणानेच खंडित होण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्याशिवाय कोरोना चक्रव्यूहाचा भेद यासंदर्भात त्यांनी सखोल मार्गदर्शन केले. यावेळी प्रास्ताविक सावानाचे बालविभाग प्रमुख गिरीश नातू यांनी केले तर प्रमुख पाहुण्यांचा परिचय नाट्यगृह सचिव ॲड. अभिजित बगदे यांनी करून दिला, तर आभार अर्थसचिव उदयकुमार मुंगी यांनी मानले.

इन्फो

एक हजार बालकांवर यशस्वी उपचार

कोरोनाच्या वाढत्या उद्रेकामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले असून आता लहान बालकेदेखील या दुष्टचक्रात अडकत चालली आहेत. तिसरी लाट ही बालकांसाठी चितांजनक असल्याचे त्यांनी सांगितले. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात जवळपास १००० हजार बालकांवर यशस्वी उपचार करून त्यांना मृत्यूच्या दाढेतून सुखरूप बाहेर काढले आहे. बालकांवरील उपचारासाठी त्यांनी चेस्ट सीटी स्कॅन ही पद्धती वापरून योग्य उपचार केले आहेत.

इन्फो

पंचसूत्रीचा वापर गरजेचा

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव ही चिंतेची बाब आहे. मात्र, आपण प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोर पणे पालन केले, तर कोरोनामुक्त भारताचे स्वप्न साकार होण्यास वेळ लागणार नाही. सूर्यप्रकाश, मोकळी हवा, व्हिटॅमीन-डी, जलनेती, व्यायाम या पंचसूत्रीची आपल्या दैनंदिन जीवनात अंमलबजावणी केल्यास कोरोनामुक्तीचा दिवस दूर नसल्याचे डॉ. केळकरांनी सांगितले.