शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
2
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
3
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
4
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
5
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
6
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
7
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
8
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
9
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
10
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
11
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
12
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
13
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
14
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
15
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
16
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
17
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
18
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
19
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
20
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत

लस घेतल्याने धोका संपुष्टात नव्हे केवळ कमी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:15 IST

नाशिक : कोरोना लसीचा पहिला किंवा दुसरा डोस घेऊन झाल्यानंतर अनेक नागरिक आपण कोरोनापासून फुलप्रुफ झाल्याच्या आविर्भावात घराजवळच्या परिसरात ...

नाशिक : कोरोना लसीचा पहिला किंवा दुसरा डोस घेऊन झाल्यानंतर अनेक नागरिक आपण कोरोनापासून फुलप्रुफ झाल्याच्या आविर्भावात घराजवळच्या परिसरात विनामास्क हिंडत असल्याचे दिसून येते. मात्र, याबाबत कोरोनाची एकच लस नव्हे, तर दोन्ही लस घेतल्यानंतरही कोरोनाचा धोका पूर्णपणे संपुष्टात येत नाही, हे लक्षात घेण्याची गरज असल्याचे मत ज्येष्ठ डॉक्टर्सनी व्यक्त केले आहे.

सामान्य ज्येष्ठ नागरिकांच्या किंवा आजारी नागरिकांच्या लसीकरणाला अद्याप एक महिनादेखील पूर्ण झालेला नाही. तरीदेखील काही नागरिक पहिल्या लसनंतरच आता कोरोनाचा धोका नाही, अशा भरवशावर विनामास्क फिरणे, गप्पाटप्पा मारत बसणे यासारखे प्रकार करु लागले आहेत. त्यामुळे एक लस घेतलेले अनेक नागरिकदेखील कोरोनाग्रस्त झाल्याच्या घटना घडल्या आहेत. तर काही ठिकाणी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या दोन लस घेऊन झाल्यानंतर आरोग्य केंद्रात कार्यरत असताना बाधा झाल्याने कोरोनाग्रस्त झाले आहेत. त्यामागे दोन लस घेतल्यानंतरदेखील महिनाभराचा कालावधी पूर्ण होईपर्यंत संबंधित व्यक्तीच्या शरीरात प्रतिपिंडे निर्माण होत नाहीत, हे शास्त्रीय कारण असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. तसेच दोन लसीनंतर महिना उलटल्यानंतरही कोणतीही दक्षता न घेता राहिल्यास कोरोना होणारच नाही, असेही नसल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे. मात्र, दोन लसींनंतर कोरोना झाला तरी त्याची तीव्रता मात्र कमी असल्याने कोरोना लसीचे दोन डोस आवश्यकच असल्याचेही मत वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी नोंदवले आहे.

कोट

नागरिकांनी किंवा आरोग्य कर्मचाऱ्यांसह कुणीही लस घेतल्यानंतर कोविड प्रोटोकॉल पाळणे बंधनकारकच आहे. कोरोना लसीचे दोन डोस घेतल्यानंतर केवळ आपली प्रतिकारशक्ती वाढते, हे प्रत्येकाने लक्षात घेणे आवश्यक आहे,

डॉ. अजीता साळुंखे, मनपा आरोग्य अधिकारी

-------

कोट

लसीेचे दोन डोस झाले तरी प्रत्येक नागरिकात अँटीबॉडीज तयार होण्याचे प्रमाण कमी अधिक असते. त्यामुळे दोन लसीनंतरही कोरोना होण्याची शक्यता नामशेष होत नाही. मात्र, दोन लसींनंतर कोरोना झालाच तरी तो जीवघेणा नसतो, हे लक्षात घेऊन प्रत्येकाने लस घ्यावी.

डॉ. समीर चंद्रात्रे, आयएमए

--------

कोरोनाच्या दोन लसींनंतर एक महिना उलटून गेल्यानंतरही कोरोना होणारच नाही, याची खात्री देता येत नाही. मात्र, झाला तरी त्याची तीव्रता कमी असते. त्यामुळे लसीकरणाचे दोन डोस अत्यावश्यक आहेत.

डॉ. कपिल आहेर, जिल्हा आरोग्य अधिकारी