शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

लस घेतल्याने धोका संपुष्टात नव्हे केवळ कमी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:15 IST

नाशिक : कोरोना लसीचा पहिला किंवा दुसरा डोस घेऊन झाल्यानंतर अनेक नागरिक आपण कोरोनापासून फुलप्रुफ झाल्याच्या आविर्भावात घराजवळच्या परिसरात ...

नाशिक : कोरोना लसीचा पहिला किंवा दुसरा डोस घेऊन झाल्यानंतर अनेक नागरिक आपण कोरोनापासून फुलप्रुफ झाल्याच्या आविर्भावात घराजवळच्या परिसरात विनामास्क हिंडत असल्याचे दिसून येते. मात्र, याबाबत कोरोनाची एकच लस नव्हे, तर दोन्ही लस घेतल्यानंतरही कोरोनाचा धोका पूर्णपणे संपुष्टात येत नाही, हे लक्षात घेण्याची गरज असल्याचे मत ज्येष्ठ डॉक्टर्सनी व्यक्त केले आहे.

सामान्य ज्येष्ठ नागरिकांच्या किंवा आजारी नागरिकांच्या लसीकरणाला अद्याप एक महिनादेखील पूर्ण झालेला नाही. तरीदेखील काही नागरिक पहिल्या लसनंतरच आता कोरोनाचा धोका नाही, अशा भरवशावर विनामास्क फिरणे, गप्पाटप्पा मारत बसणे यासारखे प्रकार करु लागले आहेत. त्यामुळे एक लस घेतलेले अनेक नागरिकदेखील कोरोनाग्रस्त झाल्याच्या घटना घडल्या आहेत. तर काही ठिकाणी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या दोन लस घेऊन झाल्यानंतर आरोग्य केंद्रात कार्यरत असताना बाधा झाल्याने कोरोनाग्रस्त झाले आहेत. त्यामागे दोन लस घेतल्यानंतरदेखील महिनाभराचा कालावधी पूर्ण होईपर्यंत संबंधित व्यक्तीच्या शरीरात प्रतिपिंडे निर्माण होत नाहीत, हे शास्त्रीय कारण असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. तसेच दोन लसीनंतर महिना उलटल्यानंतरही कोणतीही दक्षता न घेता राहिल्यास कोरोना होणारच नाही, असेही नसल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे. मात्र, दोन लसींनंतर कोरोना झाला तरी त्याची तीव्रता मात्र कमी असल्याने कोरोना लसीचे दोन डोस आवश्यकच असल्याचेही मत वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी नोंदवले आहे.

कोट

नागरिकांनी किंवा आरोग्य कर्मचाऱ्यांसह कुणीही लस घेतल्यानंतर कोविड प्रोटोकॉल पाळणे बंधनकारकच आहे. कोरोना लसीचे दोन डोस घेतल्यानंतर केवळ आपली प्रतिकारशक्ती वाढते, हे प्रत्येकाने लक्षात घेणे आवश्यक आहे,

डॉ. अजीता साळुंखे, मनपा आरोग्य अधिकारी

-------

कोट

लसीेचे दोन डोस झाले तरी प्रत्येक नागरिकात अँटीबॉडीज तयार होण्याचे प्रमाण कमी अधिक असते. त्यामुळे दोन लसीनंतरही कोरोना होण्याची शक्यता नामशेष होत नाही. मात्र, दोन लसींनंतर कोरोना झालाच तरी तो जीवघेणा नसतो, हे लक्षात घेऊन प्रत्येकाने लस घ्यावी.

डॉ. समीर चंद्रात्रे, आयएमए

--------

कोरोनाच्या दोन लसींनंतर एक महिना उलटून गेल्यानंतरही कोरोना होणारच नाही, याची खात्री देता येत नाही. मात्र, झाला तरी त्याची तीव्रता कमी असते. त्यामुळे लसीकरणाचे दोन डोस अत्यावश्यक आहेत.

डॉ. कपिल आहेर, जिल्हा आरोग्य अधिकारी