बागलाण, दिंडोरी, इगतपुरी, कळवण, पेठ, सुरगाणा, त्र्यंबकेश्वर या आदिवासीबहुल तालुक्यांमध्ये एक लाख ३४ हजार १०५ नागरिकांचे लसीकरण झाले आहे.
आदिवासी तालुक्यांमध्ये नागरिक लस घेण्यासाठी अनुत्सुक असतील अशा तालुक्यांमध्ये जिल्हा परिषदेमार्फत जनजागृती करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, यासंदर्भात जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर व मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी नुकतीच सुरगाणा तालुक्यास भेट दिली. यावेळी लसीकरणाबाबत नागरिकांमध्ये असलेले गैरसमज जाणून घेत त्यांच्या शंकांचे निरसन करीत आदिवासी तालुक्यांमध्ये लसीकरणाबाबत समाजमाध्यमांद्वारे व्यापक प्रमाणात जनजागृती मोहीम राबविणार असल्याचे सांगितले.
-----
नाशिक जिल्ह्यातील आदिवासी तालुक्यांमध्ये नागरिक गैरसमजातून लस घेत नाहीत, असे प्रत्यक्ष भेटीत दिसून आले. दुसऱ्या लाटेत जिल्ह्यातील आदिवासी भागातदेखील कोरोनाचा शिरकाव झाल्यामुळे आदिवासी भागातील नागरिकांनी स्वत:ची काळजी घेत कोरोना प्रतिबंधक लस घ्यावी, असे मी आवाहन करतो.
-बाळासाहेब क्षीरसागर, अध्यक्ष
----
_उपलब्धतेअभावी लसीकरण मोहिमेचा वेग जरी मंदावला असला तरी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत उपलब्धतेनुसार लस ही दिली जात आहे. आदिवासी भागात लस घेण्याबाबत अनेक गैरसमज आहेत, त्यासाठी जनजागृती मोहीम राबविण्यात येईल.
-लीना बनसोड, मुख्य कार्यकारी अधिकारी