शहरं
Join us  
Trending Stories
1
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
2
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
3
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
4
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
5
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
6
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
7
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
8
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
9
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
10
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
11
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
12
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
13
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
14
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
15
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
16
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
17
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
18
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
19
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
20
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...

द्राक्षबागा वाचविण्यासाठी नैसर्गिक घटकांचा वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2019 01:03 IST

परतीच्या पावसाचा फटका बसलेल्या द्राक्षांचा दर्जा टिकविण्यासाठी उत्पादकांनी नामी शक्कल लढवित शेंगदाणा, गुळासह सोयाबीनसारख्या नैसर्गिक घटकांच्या वापराचा प्रयोग सुरू झाला आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांची शक्कल : शेंगदाणा, गूळ, चणा डाळीच्या पिठासह सोयाबीनमुळे आकारमान वाढणार

वणी : परतीच्या पावसाचा फटका बसलेल्या द्राक्षांचा दर्जा टिकविण्यासाठी उत्पादकांनी नामी शक्कल लढवित शेंगदाणा, गुळासह सोयाबीनसारख्या नैसर्गिक घटकांच्या वापराचा प्रयोग सुरू झाला आहे.द्राक्षबागांवर द्राक्षांचे बहारदार द्राक्ष नजरेत भरू लागली असून, उत्तम, दर्जेदार व चविष्ट द्राक्षे नैसर्गिक पद्धतीने उत्पादित होऊन परिसराचा नावलौकिक कायम राहावा याकरिता उत्पादक प्रयत्नशील आहेत. काही कालावधी-पूर्वी अतिवृष्टी, प्रतिकूल वातावरणामुळे तालुक्यातील सुमारे पन्नास टक्के द्राक्षबागांना फटका बसला तर काही द्राक्षबागा भुईसपाट झाल्या. नुकसानीतून वाचलेल्या बागांना नवसंजीवनी देण्यासाठी महागड्या द्रवरूपी औषधांची फवारणी पावडर व इतर उपाययोजना उत्पादकांनी केल्या.द्राक्षबागांच्या मुळाशी एकरी एक क्विंटल शेंगदाणा ढेप, वीस किलो सोयाबीन पीठ, दहा किलो गूळ व आवश्यक असल्यास चणा डाळीचे पीठ असे सर्व घटक सहाशे लिटर पाण्यात एकत्रित करून द्रवस्वरूपात एकजीव झाल्यानंतर द्राक्षझाडांच्या मुळांना हे मिश्रण द्यावयाचे त्यासाठी विशिष्ट पद्धतीचा गाडा तयार करून त्याद्वारे ही प्रक्रिया पार पाडण्यात येते, अशी माहिती द्राक्ष उत्पादक जयवंत थोरात यांनी दिली. यामुळे द्राक्षाचे आकारमान वाढते, त्यातील गर वाढतो, साखरेची पातळी नैसर्गिक पद्धतीने वाढते व कडकपणा टिकून राहतो तसेच द्राक्षाचा रंग व चव यातही सकारात्मक बदल दिसून येतात, अशी माहिती प्रदीप जमधडे, अण्णा चव्हाणके यांनी दिली. सद्यस्थितीत सुमारे पन्नास टक्के द्राक्षबागा सुस्थितीत असून, उत्पादनात मोठी घट येणार आहे त्यामुळे दर्जेदार व चविष्ट द्राक्षांना चांगला दर मिळेल, असा उत्पादकांचा अंदाज आहे. त्यानुसार द्राक्षाचा दर्जा टिकविण्यासाठी नमूद प्रयोग बहुतांशी उत्पादक करीत आहेत. सध्या नैसर्गिक घटकांचा वापर करून शेती उत्पादनाकडे व्यावसायिक दृष्टिकोनातून पाहिले तर भवितव्यासाठी ही बाब सकारात्मक असून, उत्पादकांनी हे आव्हान स्वीकारून बदल करण्याची मानसिकता ठेवावी, असे आवाहन उत्पादक महेंद्र बोरा, प्रकाश कड, विलास कड, नामदेव घडवजे, सुनील बर्डे, माणिक गोलांडे यांनी केले आहे.

टॅग्स :agricultureशेती