शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: नगरपरिषदेत चुरशीची लढाई: ठाकरेंच्या शिवसेनेने खाते उघडले, काँग्रेसही आघाडीवर; पहा लेटेस्ट अपडेट
2
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
3
Nagar Parishad Election Result: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
4
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
5
नात्याला काळीमा! विमा पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
6
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
7
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
8
घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली...
9
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
10
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
11
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
12
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
13
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
14
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
15
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
16
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
17
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
18
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
19
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
20
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

द्राक्षबागा वाचविण्यासाठी नैसर्गिक घटकांचा वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2019 01:03 IST

परतीच्या पावसाचा फटका बसलेल्या द्राक्षांचा दर्जा टिकविण्यासाठी उत्पादकांनी नामी शक्कल लढवित शेंगदाणा, गुळासह सोयाबीनसारख्या नैसर्गिक घटकांच्या वापराचा प्रयोग सुरू झाला आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांची शक्कल : शेंगदाणा, गूळ, चणा डाळीच्या पिठासह सोयाबीनमुळे आकारमान वाढणार

वणी : परतीच्या पावसाचा फटका बसलेल्या द्राक्षांचा दर्जा टिकविण्यासाठी उत्पादकांनी नामी शक्कल लढवित शेंगदाणा, गुळासह सोयाबीनसारख्या नैसर्गिक घटकांच्या वापराचा प्रयोग सुरू झाला आहे.द्राक्षबागांवर द्राक्षांचे बहारदार द्राक्ष नजरेत भरू लागली असून, उत्तम, दर्जेदार व चविष्ट द्राक्षे नैसर्गिक पद्धतीने उत्पादित होऊन परिसराचा नावलौकिक कायम राहावा याकरिता उत्पादक प्रयत्नशील आहेत. काही कालावधी-पूर्वी अतिवृष्टी, प्रतिकूल वातावरणामुळे तालुक्यातील सुमारे पन्नास टक्के द्राक्षबागांना फटका बसला तर काही द्राक्षबागा भुईसपाट झाल्या. नुकसानीतून वाचलेल्या बागांना नवसंजीवनी देण्यासाठी महागड्या द्रवरूपी औषधांची फवारणी पावडर व इतर उपाययोजना उत्पादकांनी केल्या.द्राक्षबागांच्या मुळाशी एकरी एक क्विंटल शेंगदाणा ढेप, वीस किलो सोयाबीन पीठ, दहा किलो गूळ व आवश्यक असल्यास चणा डाळीचे पीठ असे सर्व घटक सहाशे लिटर पाण्यात एकत्रित करून द्रवस्वरूपात एकजीव झाल्यानंतर द्राक्षझाडांच्या मुळांना हे मिश्रण द्यावयाचे त्यासाठी विशिष्ट पद्धतीचा गाडा तयार करून त्याद्वारे ही प्रक्रिया पार पाडण्यात येते, अशी माहिती द्राक्ष उत्पादक जयवंत थोरात यांनी दिली. यामुळे द्राक्षाचे आकारमान वाढते, त्यातील गर वाढतो, साखरेची पातळी नैसर्गिक पद्धतीने वाढते व कडकपणा टिकून राहतो तसेच द्राक्षाचा रंग व चव यातही सकारात्मक बदल दिसून येतात, अशी माहिती प्रदीप जमधडे, अण्णा चव्हाणके यांनी दिली. सद्यस्थितीत सुमारे पन्नास टक्के द्राक्षबागा सुस्थितीत असून, उत्पादनात मोठी घट येणार आहे त्यामुळे दर्जेदार व चविष्ट द्राक्षांना चांगला दर मिळेल, असा उत्पादकांचा अंदाज आहे. त्यानुसार द्राक्षाचा दर्जा टिकविण्यासाठी नमूद प्रयोग बहुतांशी उत्पादक करीत आहेत. सध्या नैसर्गिक घटकांचा वापर करून शेती उत्पादनाकडे व्यावसायिक दृष्टिकोनातून पाहिले तर भवितव्यासाठी ही बाब सकारात्मक असून, उत्पादकांनी हे आव्हान स्वीकारून बदल करण्याची मानसिकता ठेवावी, असे आवाहन उत्पादक महेंद्र बोरा, प्रकाश कड, विलास कड, नामदेव घडवजे, सुनील बर्डे, माणिक गोलांडे यांनी केले आहे.

टॅग्स :agricultureशेती