शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
3
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
4
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
5
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
6
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
7
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
8
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
9
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
10
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
11
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
12
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
13
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
14
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
15
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
16
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
17
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
18
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
19
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
20
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा

उर्दूचा गोडवा : शायर, साहित्यिकांकडून ‘बज्म-ए-अरबाब-ए-सुखन’ची स्थापना

By admin | Updated: March 3, 2015 00:36 IST

विस्तारणार उर्दू साहित्याचे अवकाश

  नाशिककविश्रेष्ठ कुसुमाग्रजांचे गाव असा लौकिक असणाऱ्या नाशिकमध्ये आता उर्दू साहित्याचे अवकाश विस्तारणार आहे. शहरासह जिल्ह्यातील उर्दू कवी (शायर), साहित्यिकांनी एकत्र येऊन उर्दू साहित्याशी संबंधित अशा ‘बज्म-ए-अरबाब-ए-सुखन’ या संस्थेची मुहूर्तमेढ रोवली असून, आता नाशिककरांना उर्दू साहित्याचा गोडवा मुशायरासारख्या मैफलीतून अनुभवता येणार आहे.ऐतिहासिक, धार्मिक, सांस्कृतिक वारसा असलेले शहर म्हणून नाशिकची ओळख आहे. या शहराला साहित्य-सांस्कृतिक वारसा आहे. मराठी, हिंदी, इंग्रजी तसेच उर्दू भाषेवरही बहुसंख्य नाशिककर प्रेम करतात. मराठी, हिंदी भाषांच्या विकासासाठी तसेच या भाषांमधील दिग्गज साहित्यिकांचे साहित्य, विचार नागरिकांपर्यत पोहचावेत यासाठी मराठी-हिंदी काव्यसंमेलने, व्याख्याने आयोजित केले जातात. उर्दू मुशायरा, गझल मैफली अपवादानेच आयोजित केल्या जातात. या पार्श्वभूमीवर या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. संस्थेच्या माध्यमातून शहरात उर्दू कवी संमेलन (मुशायरा), गझलीच्या मैफली, उर्दू शायरीचा विकासाबाबत उर्दू शिकणाऱ्या तरुणांना मार्गदर्शन आदि उपक्रम राबविणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष शायर रईसा खुमार यांनी दिली आहे. एकूणच गुलशनाबादेत उर्दू साहित्याचे अवकाश विस्तारणार असून, या भाषेमधील गोडव्याचा आनंद नाशिककरांना वेळोवेळी लुटता येणार आहे. उर्दू साहित्य चळवळीची जोपासना तसेच उर्दू भाषेमधील अर्थपूर्ण शायरी नागरिकांना ऐकावयास मिळणार आहे. (वार्ताहर)