शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

उर्दूचा गोडवा : शायर, साहित्यिकांकडून ‘बज्म-ए-अरबाब-ए-सुखन’ची स्थापना

By admin | Updated: March 3, 2015 00:36 IST

विस्तारणार उर्दू साहित्याचे अवकाश

  नाशिककविश्रेष्ठ कुसुमाग्रजांचे गाव असा लौकिक असणाऱ्या नाशिकमध्ये आता उर्दू साहित्याचे अवकाश विस्तारणार आहे. शहरासह जिल्ह्यातील उर्दू कवी (शायर), साहित्यिकांनी एकत्र येऊन उर्दू साहित्याशी संबंधित अशा ‘बज्म-ए-अरबाब-ए-सुखन’ या संस्थेची मुहूर्तमेढ रोवली असून, आता नाशिककरांना उर्दू साहित्याचा गोडवा मुशायरासारख्या मैफलीतून अनुभवता येणार आहे.ऐतिहासिक, धार्मिक, सांस्कृतिक वारसा असलेले शहर म्हणून नाशिकची ओळख आहे. या शहराला साहित्य-सांस्कृतिक वारसा आहे. मराठी, हिंदी, इंग्रजी तसेच उर्दू भाषेवरही बहुसंख्य नाशिककर प्रेम करतात. मराठी, हिंदी भाषांच्या विकासासाठी तसेच या भाषांमधील दिग्गज साहित्यिकांचे साहित्य, विचार नागरिकांपर्यत पोहचावेत यासाठी मराठी-हिंदी काव्यसंमेलने, व्याख्याने आयोजित केले जातात. उर्दू मुशायरा, गझल मैफली अपवादानेच आयोजित केल्या जातात. या पार्श्वभूमीवर या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. संस्थेच्या माध्यमातून शहरात उर्दू कवी संमेलन (मुशायरा), गझलीच्या मैफली, उर्दू शायरीचा विकासाबाबत उर्दू शिकणाऱ्या तरुणांना मार्गदर्शन आदि उपक्रम राबविणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष शायर रईसा खुमार यांनी दिली आहे. एकूणच गुलशनाबादेत उर्दू साहित्याचे अवकाश विस्तारणार असून, या भाषेमधील गोडव्याचा आनंद नाशिककरांना वेळोवेळी लुटता येणार आहे. उर्दू साहित्य चळवळीची जोपासना तसेच उर्दू भाषेमधील अर्थपूर्ण शायरी नागरिकांना ऐकावयास मिळणार आहे. (वार्ताहर)