शहरं
Join us  
Trending Stories
1
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
2
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
3
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
4
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
5
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
6
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
7
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
8
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
9
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
10
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
11
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
12
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
13
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
14
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
15
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
16
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
17
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 
18
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
19
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
20
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 

जिल्ह्यातील ८६ गावांना अवकाळीचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:16 IST

नाशिक : जिल्ह्याला पुन्हा एकदा अवकाळी आणि गारपिटीचा फटका बसला असून जिल्ह्यातील ८६ गावांमधील शेतीक्षेत्राचे मोठ्या प्रमाणात नुकसान ...

नाशिक : जिल्ह्याला पुन्हा एकदा अवकाळी आणि गारपिटीचा फटका बसला असून जिल्ह्यातील ८६ गावांमधील शेतीक्षेत्राचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जिल्हा प्रशासनाने केलेल्या प्राथमिक पंचनाम्यानुसार ५ हजार ७०२ हेक्टरवरील पिके आडवी झाली आहेत. सर्वाधिक नुकसान निफाड, दिंडोरी, सटाणा व मालेगाव तालुक्यांमध्ये झाले आहे.

जिल्ह्यात गेल्या पाच महिन्यांत तीनदा शेतकऱ्यांना नुकसानीचा सामना करावा लागला. गेल्या आठवड्यापासून ढगाळ वातावरणामुळे द्राक्ष पिकांचा धोका वाढलेला असताना गारपीट आणि वादळी वाऱ्यामुळे नुकसानीत अधिकच भर पडली. नुकत्याच झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील ८६ गावांतील ५ हजार ७०२ हेक्टरवरील पिके व फळबागांचे नुकसान झाले. पशुधनाचेदेखील मोठे नुकसान झाले असून जिल्हा प्रशासनाने युद्धपातळीवर प्राथमिक पंचनामे पूर्ण करण्यात आले. या नुकसानीचा अहवाल शासनाकडे पाठविण्यात आला आहे.

बदलत्या ऋतुचक्रानुसार कोसळणाऱ्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान होत आहे. या पावसाचा फटका जिल्ह्यातील ८६ गावांमधील शेतकऱ्यांना बसला आहे. अवकाळीमुळे गहू, मका, बाजरी, ज्वारी, हरभर‍ा व भाजीपाल्याचे नुकसान झाले आहे. वार्षिक व बहुवार्षिक फळपिकांनाही तडाखा बसला आहे. पपई, आंबा, डाळिंब व द्राक्षबागांचे नुकसान झाल्याचे अहवालावरून समोर आले आहे. सर्वाधिक नुकसान झालेल्या तालुक्यांमध्ये निफाड, दिंडोरी, सटाणा व मालेगावचा समावेश आहे.

--इन्फो--

वीज पडून जीवितहानी

जिल्ह्यात निफाड तालुक्यात वीज पडून एकाचा मृत्यू झाला. पशुधनाचेदेखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मालेगावमध्ये बैल, सिन्नरमध्ये गाय तर देवळ्यात शेळी मृत्युमुखी पडली. अनेक ठिकाणी गोठ्यांचे पत्रे उडाल्याने मोठे नुकसान झाले आहे, तर घरपडझडीच्याही घटना घडल्या आहेत.