शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील ८६ गावांना अवकाळीचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:16 IST

नाशिक : जिल्ह्याला पुन्हा एकदा अवकाळी आणि गारपिटीचा फटका बसला असून जिल्ह्यातील ८६ गावांमधील शेतीक्षेत्राचे मोठ्या प्रमाणात नुकसान ...

नाशिक : जिल्ह्याला पुन्हा एकदा अवकाळी आणि गारपिटीचा फटका बसला असून जिल्ह्यातील ८६ गावांमधील शेतीक्षेत्राचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जिल्हा प्रशासनाने केलेल्या प्राथमिक पंचनाम्यानुसार ५ हजार ७०२ हेक्टरवरील पिके आडवी झाली आहेत. सर्वाधिक नुकसान निफाड, दिंडोरी, सटाणा व मालेगाव तालुक्यांमध्ये झाले आहे.

जिल्ह्यात गेल्या पाच महिन्यांत तीनदा शेतकऱ्यांना नुकसानीचा सामना करावा लागला. गेल्या आठवड्यापासून ढगाळ वातावरणामुळे द्राक्ष पिकांचा धोका वाढलेला असताना गारपीट आणि वादळी वाऱ्यामुळे नुकसानीत अधिकच भर पडली. नुकत्याच झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील ८६ गावांतील ५ हजार ७०२ हेक्टरवरील पिके व फळबागांचे नुकसान झाले. पशुधनाचेदेखील मोठे नुकसान झाले असून जिल्हा प्रशासनाने युद्धपातळीवर प्राथमिक पंचनामे पूर्ण करण्यात आले. या नुकसानीचा अहवाल शासनाकडे पाठविण्यात आला आहे.

बदलत्या ऋतुचक्रानुसार कोसळणाऱ्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान होत आहे. या पावसाचा फटका जिल्ह्यातील ८६ गावांमधील शेतकऱ्यांना बसला आहे. अवकाळीमुळे गहू, मका, बाजरी, ज्वारी, हरभर‍ा व भाजीपाल्याचे नुकसान झाले आहे. वार्षिक व बहुवार्षिक फळपिकांनाही तडाखा बसला आहे. पपई, आंबा, डाळिंब व द्राक्षबागांचे नुकसान झाल्याचे अहवालावरून समोर आले आहे. सर्वाधिक नुकसान झालेल्या तालुक्यांमध्ये निफाड, दिंडोरी, सटाणा व मालेगावचा समावेश आहे.

--इन्फो--

वीज पडून जीवितहानी

जिल्ह्यात निफाड तालुक्यात वीज पडून एकाचा मृत्यू झाला. पशुधनाचेदेखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मालेगावमध्ये बैल, सिन्नरमध्ये गाय तर देवळ्यात शेळी मृत्युमुखी पडली. अनेक ठिकाणी गोठ्यांचे पत्रे उडाल्याने मोठे नुकसान झाले आहे, तर घरपडझडीच्याही घटना घडल्या आहेत.