शहरं
Join us  
Trending Stories
1
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
2
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
3
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
4
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
5
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
6
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
7
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
8
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
9
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
10
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
11
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
12
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
13
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
14
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
15
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
16
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
17
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
18
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
19
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
20
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'

जिल्ह्यातील ८६ गावांना अवकाळीचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:16 IST

नाशिक : जिल्ह्याला पुन्हा एकदा अवकाळी आणि गारपिटीचा फटका बसला असून जिल्ह्यातील ८६ गावांमधील शेतीक्षेत्राचे मोठ्या प्रमाणात नुकसान ...

नाशिक : जिल्ह्याला पुन्हा एकदा अवकाळी आणि गारपिटीचा फटका बसला असून जिल्ह्यातील ८६ गावांमधील शेतीक्षेत्राचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जिल्हा प्रशासनाने केलेल्या प्राथमिक पंचनाम्यानुसार ५ हजार ७०२ हेक्टरवरील पिके आडवी झाली आहेत. सर्वाधिक नुकसान निफाड, दिंडोरी, सटाणा व मालेगाव तालुक्यांमध्ये झाले आहे.

जिल्ह्यात गेल्या पाच महिन्यांत तीनदा शेतकऱ्यांना नुकसानीचा सामना करावा लागला. गेल्या आठवड्यापासून ढगाळ वातावरणामुळे द्राक्ष पिकांचा धोका वाढलेला असताना गारपीट आणि वादळी वाऱ्यामुळे नुकसानीत अधिकच भर पडली. नुकत्याच झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील ८६ गावांतील ५ हजार ७०२ हेक्टरवरील पिके व फळबागांचे नुकसान झाले. पशुधनाचेदेखील मोठे नुकसान झाले असून जिल्हा प्रशासनाने युद्धपातळीवर प्राथमिक पंचनामे पूर्ण करण्यात आले. या नुकसानीचा अहवाल शासनाकडे पाठविण्यात आला आहे.

बदलत्या ऋतुचक्रानुसार कोसळणाऱ्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान होत आहे. या पावसाचा फटका जिल्ह्यातील ८६ गावांमधील शेतकऱ्यांना बसला आहे. अवकाळीमुळे गहू, मका, बाजरी, ज्वारी, हरभर‍ा व भाजीपाल्याचे नुकसान झाले आहे. वार्षिक व बहुवार्षिक फळपिकांनाही तडाखा बसला आहे. पपई, आंबा, डाळिंब व द्राक्षबागांचे नुकसान झाल्याचे अहवालावरून समोर आले आहे. सर्वाधिक नुकसान झालेल्या तालुक्यांमध्ये निफाड, दिंडोरी, सटाणा व मालेगावचा समावेश आहे.

--इन्फो--

वीज पडून जीवितहानी

जिल्ह्यात निफाड तालुक्यात वीज पडून एकाचा मृत्यू झाला. पशुधनाचेदेखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मालेगावमध्ये बैल, सिन्नरमध्ये गाय तर देवळ्यात शेळी मृत्युमुखी पडली. अनेक ठिकाणी गोठ्यांचे पत्रे उडाल्याने मोठे नुकसान झाले आहे, तर घरपडझडीच्याही घटना घडल्या आहेत.