शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

नाशकात रिमझिम सरींचा बेमोसमी वर्षाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 04:30 IST

अरबी समुद्रात उठणाऱ्या लहान-मोठ्या वादळांमुळे तयार झालेला कमी दाबाचा पट्टा आणि नैऋत्य व वायव्य मोसमी वाऱ्यांची परस्परविरुद्ध बदललेली दिशा ...

अरबी समुद्रात उठणाऱ्या लहान-मोठ्या वादळांमुळे तयार झालेला कमी दाबाचा पट्टा आणि नैऋत्य व वायव्य मोसमी वाऱ्यांची परस्परविरुद्ध बदललेली दिशा यामुळे वातावरणात कमालीचा बदल झालेला दिसून येत आहे. वाऱ्यांची दिशा बदलली असून, वातावरणात ढगांची निर्मिती अधिक होत आहे. परिणामी मागील दोन दिवसांपासून नाशिककरांना सूर्यदर्शनही घडलेले नाही. या वातावरण बदलामुळे बळीराजा धास्तावला आहे. कांदा, द्राक्ष बागायतदार चिंताग्रस्त झाला आहे. द्राक्ष बागायतदारांनी डावणी रोगाचा प्रादुर्भाव लक्षात घेता योग्य औषध फवारणी तसेच बागांमध्ये शेकोट्या पेटवून याेग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन हवामान केंद्राकडून करण्यात आले आहे.

शहरात हवामान बदलामुळे वातावरणात बाष्प व आर्द्रतेचे प्रमाण वाढले आहे. सकाळी हवेत ८१ तर संध्याकाळीसुद्धा ८० टक्क्यांपर्यंत वाढलेली दिसत आहे. यामुळे नाशिककरांना विचित्र हवामानाचा सामना करावा लागत आहे. वातावरण थंड झाल्यामुळे गोदाघाटावर तसेच शहरातील झोपडपट्टी भागांमध्ये शनिवारी संध्याकाळी शेकोट्या पेटल्याचे चित्र पहावयास मिळाले. नाशिककरांनी थंडीचा बचाव करण्यासाठी चक्क संध्याकाळी सहा वाजताच गोदाकाठालगत राहणाऱ्या फिरस्त्यांकडून शेकोटी पेटविली होती.

---इन्फो--

दोन दिवसांत आकाश निरभ्र होण्याची शक्यता

पुढील दोन दिवसांमध्ये वातावरण स्वच्छ होऊन आकाश निरभ्र होण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान केंद्रप्रमुख सुनील काळभोर यांनी वर्तविला आहे. दिवसाप्रमाणे रात्रीसुद्धा आकाशात ढग दाटून राहत असल्यामुळे किमान तापमानाचा पाराही घसरण्याऐवजी वाढत आहे तर दुसरीकडे कमाल तापमानाचा पारा घसरत असल्याने नाशिककरांना दिवसाही वातावरणात गारठा जाणवत आहे.