शहरं
Join us  
Trending Stories
1
NIA प्रमुख सदानंद दाते आता महाराष्ट्राचे नवे पोलिस महासंचालक, ३ जानेवारीला स्वीकारणार पदभार
2
नाशिक-सोलापूर-अक्कलकोट कॉरिडोरला केंद्राचा हिरवा कंदील; प्रवास वेळेत 17 तासांची बचत होणार
3
गुंतवणूकदारांची 'चांदी'! वर्षाच्या शेवटच्या दिवशी ४ लाख कोटींची कमाई; मेटल आणि रिलायन्स शेअर्समध्ये धूम
4
Municipal Election 2026: कल्याण, पनवेल, धुळ्यात भाजपाचा 'विजयारंभ'! सहा उमेदवार बनले बिनविरोध 'नगसेवक'
5
गुंतवणूक सोन्यात की शेअर बाजारात? ३ लाखांच्या सोन्यावर पुढील वर्षी किती नफा मिळेल? सोपं गणित
6
थर्टी फर्स्टचा जल्लोष पहाटेपर्यंत! हॉटेल आणि बार पहाटे ५ वाजेपर्यंत सुरू राहणार; राज्य सरकारचा मोठा निर्णय
7
नशीब असावं तर असं! राष्ट्रवादीतून भाजपात आल्या आणि २४ तासांत झाल्या नगरसेविका, धुळ्यात उज्वला भोसले बिनविरोध
8
कोट्यवधीची रोकड, सोने हिऱ्यांनी भरलेली बॅग अन् बरेच काही...; ED च्या हाती कुणाचं लागलं 'घबाड'?
9
'ऑपरेशन सिंदूर'वर लष्कर-ए-तैयबा प्रमुख हाफिज सईदचे मोठे वक्तव्य; म्हणाला- 'भारत पुढील 50 वर्षे...'
10
Happy New Year 2026 Wishes: नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Quotes, Messages, WhatsApp Status शेअर करत स्वागत करा नव्या वर्षाचं!
11
Nimesulide Banned: निमसुलाइड औषधावर सरकारनं घातली बंदी, किडनीसाठी अत्यंत धोकादायक!
12
मुंबई महापालिकेसाठी भाजपाची १३७ उमेदवारांची यादी जाहीर; किती अमराठी उमेदवारांना दिली संधी?
13
शिंदेसेनेचे स्वबळावर ७४ उमेदवार! महायुतीचे जागावाटप बारगळले; निवडणूक होणार चुरशीची
14
KDMC Election 2026: कल्याण डोंबिवलीत मतदानाआधीच तीन ठिकाणी फुललं कमळ, भाजपाचे ३ नगरसेवक बिनविरोध 
15
Solapur Municipal Corporation Election 2025 : सोलापूरात मोठी राजकीय खेळी! ठाकरेंच्या जिल्हाप्रमुखाने ऐनवेळेला भाजपाकडून भरला फॉर्म
16
धनंजय मुंडे यांना दिलासा! करुणा मुंडे यांची याचिका कोर्टाने फेटाळली, काय होतं प्रकरण?
17
भांडवलशाहीचा 'भीष्म पितामह' निवृत्त! दिवाळखोर कंपनीतून वॉरेन बफेंनी कसे उभारले अब्जावधींचे साम्राज्य?
18
अभिषेक बच्चनचं पत्नीसोबत 'न्यू इयर सेलिब्रेशन', चाहतीसोबत फोटो; ऐश्वर्याच्या सौंदर्यावर सगळेच फिदा
19
Stock Market Holiday 2026 List: NSE-BSE नं जारी केली २०२६ ची सुट्ट्यांची यादी; पाहा किती आहेत लाँग वीकेंड्स?
20
कानात ब्लूटूथ इयरफोन लावल्याने कॅन्सरचा मोठा धोका? एक्सपर्ट्सनी सांगितलं 'सत्य'
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकमधील प्लॅस्टिक विक्रेत्यांचा बेमुदत बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2018 00:54 IST

राज्य सरकारच्या पर्यावरण खात्याने तडकाफडकी प्लॅस्टिक बंदीचा निर्णय घेतल्याने नागरिकांची अडचण होणार असून, विक्रेत्यांवर कारवाईची टांगती तलवार ठेवल्याने अखेरीस या विक्रेत्यांनी नाशिक शहरात बेमुदत बंद पुकारला आहे.

नाशिक : राज्य सरकारच्या पर्यावरण खात्याने तडकाफडकी प्लॅस्टिक बंदीचा निर्णय घेतल्याने नागरिकांची अडचण होणार असून, विक्रेत्यांवर कारवाईची टांगती तलवार ठेवल्याने अखेरीस या विक्रेत्यांनी नाशिक शहरात बेमुदत बंद पुकारला आहे. प्लॅस्टिक विक्रेत्यांचे म्हणणे ऐकून घेण्याचे न्यायालयात आश्वासन देऊनही ते न ऐकता घेतलेल्या निर्णयामुळे आंदोलन सुरू करण्यात आले आहेत. राज्यातील विविध संघटनांनी उच्च न्यायालयात धाव घेतल्याने त्याकडेही आता नाशिकमधील विक्रेत्यांचे लक्ष लागून आहे. पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर प्लॅस्टिक उत्पादन आणि विक्रीला बंदी घातली आहेत. नाशिक शहरात असलेल्या दुकानदारांपैकी प्लॅस्टिकच्या पिशव्या, थर्माकोलच्या प्लेट््स, ग्लास विक्रेत्यांची मोठी संख्या आहे. तसेच प्लॅस्टिक उत्पादन करणारे उद्योगही आहेत.राज्य सरकारने अचानक घेतलेल्या निर्णयाची तीव्र प्रतिक्रिया उमटली असून, शनिवारी (दि. २४) यासंदर्भात बैठक घेण्यात आली. यावेळी राज्य सरकारच्या निर्णयाच्या विरोधातील लढ्याविषयी चर्चा करण्यात आली. पर्यावरण रक्षणाच्या नावाखाली प्लॅस्टिक बंदी घालण्यात आली असली तरी बाजारात त्याला पर्याय उपलब्ध करून देण्यात आला नसून अशावेळी ग्राहकांनी मागितलेल्या वस्तू कशात बांधून द्यायच्या यांसह विविध प्रकारच्या समस्या निर्माण झाल्या आहेत असे सांगण्यात आले. या बैठकीस चिराग शहा, हसमुख पारख, बाफना, प्रफुल्ल संचेती, अरविंद दशपुते यांच्यासह अनेक व्यापारी हजर होते. शासनाच्या निर्णयानुसार पाण्याच्या बाटलीसाठी एक रुपया त्याच विक्रेत्याला डिपॉझिट म्हणून द्यायचा आणि त्यानंतर हा एक रुपया परत घेण्यासाठी बाटली परत आणून द्यायची, असा हास्यास्पद प्रकार कायद्यात नमूद केला आहे. एक रुपयासाठी नागरिक परत जाणार नाहीच शिवाय विक्रेत्याला बॉटल्स जमा करण्याचे नवे काम करावे लागणार आहे.न्यायालयाची दिशाभूलसरकारने प्लॅस्टिक बंदीचा मसुदा जाहीर केल्यानंतर व्यापारी आणि उद्योजकांनी त्यास विरोध करण्यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यानुसार ६ मार्च रोजी सुनावणीच्या वेळी राज्य सरकारने प्लॅस्टिक विक्रेते आणि उद्योजक यांच्या सूचना आणि हरकती मागविण्यात येईल आणि त्यानंतर सुनावणी घेण्यात येईल असे प्रतिज्ञापत्र न्यायालयात सादर केले. मात्र, त्याची अंमलबजावणी केली नाही.

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदीRamdas Kadamरामदास कदम