शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
4
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
5
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
9
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
10
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
11
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
12
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
13
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
14
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
15
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
16
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
17
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
18
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
19
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
20
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

अज्ञात रोगाने पाच जनावरे दगावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2019 00:18 IST

कंधाणे : येथे बऱ्याच शेतोपयोगी पाळीव जनावरांना फऱ्यासदृश आजाराची लागण झाली असून, आतापर्यंत परिसरात या रोगाची लागण झालेल्या पाच जनावरांचा मृत्यू झाला आहे. या भागात जनावरांना लसीकरण चालू असून, बºयाच जनावरांना लसीकरण झाल्यावरही जनावरे दगावत असल्याने शेतकऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे.

ठळक मुद्दे दुष्काळ : लसीकरणानंतरही लागण झालेली जनावरे हाती लागत नसल्याने भीती

कंधाणे : येथे बऱ्याच शेतोपयोगी पाळीव जनावरांना फऱ्यासदृश आजाराची लागण झाली असून, आतापर्यंत परिसरात या रोगाची लागण झालेल्या पाच जनावरांचा मृत्यू झाला आहे. या भागात जनावरांना लसीकरण चालू असून, बºयाच जनावरांना लसीकरण झाल्यावरही जनावरे दगावत असल्याने शेतकऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे.या आजाराने ग्रस्त असलेल्या जनावरांना वेळेवर उपचार मिळत नसल्याची तक्रार केली जात आहे. आधीच दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या शेतकºयांसमोर हे नवीन संकट उभे राहिल्याने बळीराजा पशुपालकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. या भागातील शेतकरी वर्गाचा शेतीव्यवसायाला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय हे प्रमुख कमाईचे साधन असल्याने या भागात मोठ्या प्रमाणात दुधाळ जनावरे पाळली जात आहेत. बºयाच शेतकरीवर्गाचे सध्या दुष्काळात दुग्ध व्यवसाय अर्थार्जनाचे साधन बनले आहे.गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून या भागातील पाळीव जनावरांना सध्या ताप येऊन पायाच्या सांध्यातील (फºया) भाग खुजून लागण झालेले जनावर चारा, पाणी पिणे, चारा खाणे बंद करते व लगेच त्याचा मृत्यू होत असल्याची माहिती नुकसानग्रस्त बळीराजांकडून मिळत आहे. लागण झालेल्या काही जनावरांना लसीकरणसुद्धा केले, तरीही जनावरांचा मृत्यू झाला आहे तर काही शेतकºयांनी औषधोपचारास विलंब होत असल्याने जनावरांना मृत्यूला सामोरे जावे लागत असल्याची खंत व्यक्त केली आहे. मृत्यू पावलेल्या जनावरांमध्ये काही दुधाळ जनावरे व बैलांचा समावेश असून, या रोगामुळे नुकसानग्रस्त शेतकºयांना लाखों रुपयांचा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.दुष्काळात या आजारामुळे जिवापाड जपलेल्या जनावरांचा डोळ्यासमोर मृत्यू पाहण्याचा दुर्दैवी योग शेतकºयावर आला आहे. शेतमालाचे कोसळलेले बाजारभाव यात दुष्काळाच्या झळा यामुळे आधीच बळीराजा आर्थिक विवंचनेत सापडला आहे. पुढील काही महिन्यांत येऊन ठेपलेल्या पेरणीच्या हंगामाआधी बैलांचा मृत्यू झाल्याने पेरणी हंगाम करावयाचा कसा? या विवंचनेत नुकसानग्रस्त बळीराजा सापडला आहे. कंधाणेत फºयासदृश आजाराने पाच जनावरे दगावली असताना तालुक्यातील जबाबदार अधिकाºयांकडून कोणतीही दखल घेतली गेली नसल्याचे चित्र या भागात पहावयास मिळत आहे. या भागात जनावरे दगावत असताना स्थानिक एक कर्मचारी लसीकरणाची जवाबदारी पार पाडत आहे. येथे तात्पुरत्या स्वरूपात कर्मचारी संख्या वाढून लसीकरण मोहीम राबविणे गरजेचे असताना त्याकडे काणाडोळा केला जात असल्याची तक्रार शेतकºयांनी केली आहे. संबंधित विभागाने राहिलेल्या भागात त्वरित लसीकरण पूर्ण करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.गेल्या दोन दिवसांपासून फºयासदृश आजाराची लक्षणे बैलाला जाणवत होती. याबाबत संबंधित विभागातील पशुवैद्यकीय अधिकाºयांना कळविले होते. त्यानंतर आजारी बैलाला लसीकरण केले गेले; पण लसीकरणास विलंब झाल्यामुळे हजारो रुपये किमतीचा बैल डोळ्यादेखत दगावला. वेळीच लसीकरण झाले असते तर आज दुष्काळात जिवापाड जपलेला बैल जिवंत राहिला असता.- सागर बिरारी, शेतकरी कंधाणेअति उष्माघाताने जनावरांचा मृत्यू संभवू शकतो. तालुक्यात सध्या फºया रोगाचे लसीकरण चालू आहे. कर्मचारी संख्या कमी असल्यामुळे काही भागात लसीकरणास विलंब होत आहे.- डॉ. चंदनप्रकाश रूद्रवंशी, प्रभारी सहायक आयुक्त, सटाणा कंधाणे परिसरात लसीकरण चालू असून, पशुपालकांनी सकाळी लवकर लसीकरण करून घ्यावे, शक्यतो दुपारच्या आधी लसीकरणासाठी आलेल्या पशुवैद्यकीय अधिकाºयांकडून जनावरांना लसीकरण करून घ्यावे. उन्हापासून जनावरांचे संरक्षण करावे.- डॉ. जी.टी. बोरोले,पशुवैद्यकीय अधिकारी, कंधाणे