शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

अज्ञात रोगाने खंबाळे परिसरात आठवड्यात आठ गायी दगावल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2019 23:23 IST

खंबाळे : परिसरातील गायींना अज्ञात रोगाची लागण झाली असून, आठवडाभरात आठ गायी दगावल्याने पशुपालक धास्तावले आहे. दुष्काळात पशुधन सांभाळणे अवघड असताना अज्ञात रोगाची लागण झाल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत.

खंबाळे : परिसरातील गायींना अज्ञात रोगाची लागण झाली असून, आठवडाभरात आठ गायी दगावल्याने पशुपालक धास्तावले आहे. दुष्काळात पशुधन सांभाळणे अवघड असताना अज्ञात रोगाची लागण झाल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत.सिन्नर पंचायत समितीच्या पशुसंवर्धन विभागाने परिसरात जनावरांची तपासणी मोहीम सुरू केली आहे. बोटुलिझम हा जनावरांचा पॅरेलिसिससदृश आजार असावा, असे प्राथमिक निदान करण्यात आले आहे. आजारी जनावरांचे नमुने पडताळणीसाठी घेण्यात आले असून, पुण्याच्या प्रयोगशाळेत ते पाठविण्यात आले आहेत. जनावरांना अपचनाचा त्रास होणे, चारा कमी खाणे, विष्ठा व लघवी करण्यास त्रास होणे अशी प्राथमिक लक्षणे या आजारात दिसून येतात. हा आपल्या परिसरात दुर्मीळ आजार असल्याचे पशुधन विकास अधिकारी डॉ. मिलिंद भणगे यांनी सांगितले. दापूर परिसरातदेखील शेतकऱ्यांमध्ये घबराट पसरली असून, पशुसंवर्धन विभागाने या भागात तातडीने तपासणी मोहीम राबवावी, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून होत आहे. परिसरातील शेतकऱ्यांनी आजारी जनावरांबाबत तातडीने पंचायत समितीला सूचित करावे, दगावलेल्या जनावरांची परस्पर विल्हेवाट लावू नये, असे आवाहन डॉ. भणगे यांनी केले आहे.