शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar: पुणे जिल्ह्यात तीन महापालिका होणार; चाकण, हिंजवडी आणि..., अजित पवारांची मोठी घोषणा
2
मी सापाच्या तीन पिल्लांना जन्म दिला; महिलेच्या दाव्याने खळबळ, समजताच गर्दी जमू लागली...
3
सुप्रीम कोर्टाचा १ निर्णय अन् अलाहाबाद हायकोर्टचे १३ न्यायाधीश नाराज; मुख्य न्यायाधीशांना पत्र
4
डोनाल्ड ट्रम्प यांना सुधरेना...! ५० टक्के टॅरिफवर देखील काहीच प्रतिक्रिया नाही, आता चर्चा बंद केल्याची घोषणा...
5
Intel CEO Lip Bu Tan Networth: कोण आहेत लिप-बू टॅन, ज्यांच्या मागे हात धुवून पडलेत डोनाल्ड ट्रम्प, किती संपत्तीचे मालक?
6
सत्ताधारी, निवडणूक आयोगाने देशाला फसवले; संपूर्ण निवडणूक प्रणालीची झाली चोरी; राहुल गांधी यांचा आरोप
7
शेअर बाजारात सलग चौथ्या दिवशी घसरण; सेन्सेक्स १४५ आणि निफ्टी ५२ अंकांच्या घसरणीसह उघडले
8
चीनच्या सर्वांत मोठ्या धरणाने भारत सतर्क; ब्रह्मपुत्रा नदीशी संबंधित सर्व घडामोडींवर सरकारचे बारीक लक्ष
9
अत्याचाराच्या प्रकरणातून सोडवण्यासाठी अजितदादांच्या आमदाराला फोन; उपमुख्यमंत्री म्हणाले, 'तुमची जीभ कशी रेटते'
10
Trump Tariff On India: ट्रम्प यांचं टॅरिफ संधी ठरू शकते का? कॉर्पोरेट इंडिया म्हणतोय भारत बनू शकतो नवा 'पॉवरहाऊस'
11
अभिनेत्री हुमा कुरेशीच्या भावाची निर्घृणपणे हत्या; दिल्लीत दोघांना अटक, क्षुल्लक कारणावरुन झाला वाद
12
सिद्धिविनायकाच्या दर्शनाला लॅपटॉप, कॅमेरा साेबत नकाे
13
आजचे राशीभविष्य, ०८ ऑगस्ट २०२५: पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, सुख-सुबत्ता, कल्याणाचा दिवस
14
डबल जॉली, डबल ट्रबल! सौरभ शुक्लांनी दिलं 'जॉली एलएलबी ३'चं मोठं अपडेट, कधी रिलीज होणार?
15
ठकासारखे वागू नका, कायद्याच्या चौकटीत राहा; ईडीला सुप्रीम कोर्टाने पुन्हा एकदा फटकारले
16
नेपाळची सक्ती; किमान ३ मुलांना जन्म द्या!
17
रक्षाबंधन २०२५: राखी बांधताना तुमच्याकडून ‘ही’ चूक तर होत नाही ना? पाहा, योग्य पद्धत-नियम
18
निवडणूक प्रक्रियेत मोठा घोटाळा! 'या' पाच प्रकारे झाली ‘मतांची चोरी’, राहुल गांधींचा दावा; विचारले असे प्रश्न
19
रक्षाबंधन २०२५: गणपती, स्वामींना राखी नक्की बांधा; सदैव रक्षण-कृपा, कायम सोबत असतील स्वामी!
20
गजलक्ष्मी सौभाग्य योगात रक्षाबंधन: ५ मूलांक लकी, बंपर कमाई; प्रसन्न होईल लक्ष्मी, शुभच घडेल!

केंद्रीय मंत्रिपदाने बदलणार राजकीय समीकरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:11 IST

नाशिक : दोन कॅबिनेट मंत्रिपद व विधानसभेचे प्रभारी अध्यक्षपददेखील नाशिक जिल्ह्याच्या वाट्याला आल्याने पक्ष संघटनेच्या दृष्टीने महाविकास आघाडी मजबूत ...

नाशिक : दोन कॅबिनेट मंत्रिपद व विधानसभेचे प्रभारी अध्यक्षपददेखील नाशिक जिल्ह्याच्या वाट्याला आल्याने पक्ष संघटनेच्या दृष्टीने महाविकास आघाडी मजबूत होऊ पाहात असताना भाजपने नाशिक जिल्ह्यातील खासदार डॉ. भारती पवार यांचा थेट केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश करून महाविकास आघाडीवर कुरघोडी केल्याचे मानले जात आहे. पवार यांच्या मंत्रिपदाने राज्य मंत्रिमंडळात सहभागी मंत्र्यांना व पर्यायाने विकास आघाडीला शह बसण्यास मदत होणार आहे, तर उत्तर महाराष्ट्रात भाजपचे पक्ष संघटन वाढीस डॉ. पवार यांचे मंत्रिपदाचा उपयोग करून घेण्याची खेळी खेळण्यात आल्याचा अर्थ काढला जात आहे.

आगामी सहा ते आठ महिन्याच्या कालावधीत नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार असून, या निवडणुकीत राज्यातील सत्ताधारी पक्षांनी भाजपला रोखण्यासाठी आघाडी करण्याची घोषणा यापूर्वीच करून भाजपला एकटे पाडण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. त्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्रिमंडळाचा झालेला विस्तार व त्यात नाशिकच्या खासदार डॉ. भारती पवार यांचा करण्यात आलेला समावेश अनेक अर्थाने महत्त्वाचा मानला जात आहे. नाशिक जिल्ह्यात राज्यातील हेवीवेट नेते छगन भुजबळ यांच्याकडे तसेच सेनेचे दादा भुसे यांच्याकडे राज्यातील कॅबिनेट मंत्रिपदे आहेत. विधानसभेचे प्रभारी अध्यक्षपददेखील राष्ट्रवादीकडे असल्याने राष्ट्रवादी, शिवसेना व कॉँग्रेस या तिन्ही पक्षांची संघटनात्मकदृष्ट्या बांधणीसाठी सत्तेचा उपयोग करून घेतला जात आहे. अशा परिस्थितीत भाजपला त्याचा फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आगामी महापालिका, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका महाविकास आघाडीच्या दृष्टीने जितक्या महत्त्वाच्या आहेत, तितक्याच भाजपच्या दृष्टीनेही प्रतिष्ठेच्या असल्यामुळे केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्ताराकडे त्या दृष्टीने पाहिले जात आहे.

डॉ. भारती पवार यांच्या मंत्रिमंडळाच्या समावेशाने राज्यातील महाविकास आघाडीतील मंत्र्यांना एक प्रकारे शह दिल्याचे मानले जात असून, पवार ह्या देशाच्या मंत्री असल्या तरी, त्यांच्या माध्यमातून उत्तर महाराष्ट्रातील पक्षबांधणीला मोठा हातभार लागणार असल्याची खेळी भाजपने खेळली आहे. नाशिक विभागातील नाशिक, धुळे व नंदुरबार या तीन जिल्ह्यांत आदिवासी समाज मोठ्या प्रमाणावर असल्याने या समाजाचा भाजपकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलून कॉँग्रेसचा हा पारंपरिक मतदार भाजप आपल्याकडे खेचू पाहात आहे. त्याचा दूरगामी परिणाम राजकारणावर होणार असल्याची चर्चा होऊ लागली आहे.