शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
2
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
3
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
4
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
5
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
6
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
7
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
8
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
9
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
10
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
11
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
12
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
13
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
14
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
15
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
16
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
17
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
18
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
19
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
20
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  

प्रकाश आंबेडकरांशिवाय एकीकरण अशक्य : रामदास आठवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2018 01:24 IST

विखुरलेल्या रिपब्लिकन नेते आणि जनतेला एकत्र आणून रिपब्लिकन ऐक्य आवश्यक आहे. मात्र, भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या शिवाय ऐक्य शक्य नसल्याचा पुनरुच्चार रिपाइं नेते रामदास आठवले यांनी केला.

नाशिक : विखुरलेल्या रिपब्लिकन नेते आणि जनतेला एकत्र आणून रिपब्लिकन ऐक्य आवश्यक आहे. मात्र, भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या शिवाय ऐक्य शक्य नसल्याचा पुनरुच्चार रिपाइं नेते रामदास आठवले यांनी केला.  काळाराम मंदिर सत्याग्रह स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी आठवले नाशिकमध्ये आले होते, तेव्हा त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. आठवले म्हणाले, सध्याच्या परिस्थितीत रिपाइंचे ऐक्य होणे आवश्यक वाटत असेल तर ऐक्याची घोषणा करणाºयांना अगोदर ऐक्याचा अजेंडा राबविला पाहिजे. यासाठी प्रकाश आंबेडकर यांनी पुढाकार घेतला आणि जबाबदारी स्वीकारली तर आपण आपला पक्ष विलीन करून ऐक्यात सामील होऊ, असेही आठवले यांनी सांगितले.  समाजाच्या विकासासाठी ऐक्य होणार असेल तर आपण प्रसंगी आपले मंत्रिपद सोडून द्यायलादेखील मागेपुढे पाहणार नाही. इतर कोणत्याही पक्षांनी दलित अत्याचाराचे राजकारण करणे चुकीचे आहे. भारतीय जनता पार्टी हा पक्ष जातीयवादी नाही, तर जे या पक्षाला जातीयवादी म्हणतात तेच जातीयवादी असल्याचा आरोप आठवले यांनी केला. अनेक जातिधर्माचे नेते भाजपामध्ये मंत्री आणि नेते आहेत. त्यामुळे भाजपाला जातीयवादी पक्ष म्हणणे चुकीचे असल्याचे आठवले यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. कोरेगाव भीमा प्रकरणी न्यायालयाने तीन महिन्यांचा कालावधी चौकशीसाठी दिल्याने चौकशीनंतर दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी असल्याचेही ते म्हणाले. दलित-मराठा वाद जाणीवपूर्वक पेटविला जात असून, अशा प्रवृत्तींपासून दोन्ही समाजाने सावध राहिले पाहिजे . वास्तविक हे दोन्ही समाज शिवाजी महाराजांच्या काळापासून एकत्र आहेत. त्यांच्यात आता फूट पाडण्याचे राजकारण होत असल्याचा आरोप त्यांनी केला.राणेंनी आॅफर स्वीकारावीमाजी मुख्यमंत्री नारायण राणे हे राज्यातील मोठे नेते आहेत. भाजपाने त्यांना राज्यसभेची आॅफर दिली असेल तर त्यांनी केंद्रात आले पाहिजे. पक्ष वाढीसाठी त्यांनी भाजपाची आॅफर स्वीकारली पाहिजे, असा सल्ला आठवले यांनी राणे यांना दिला. राज्यात शिवसेनेने राणे यांच्या मंत्रिपदाला आक्षेप घेतल्यामुळे राणे यांच्यासाठी फडणवीस सेनेची नाराजी ओढावून घेणार नाहीत. त्यामुळेच राणे यांचा मंत्रिमंडळातील प्रवेश अनिश्चित आहे. राणे यांना मंत्रिपद मिळाले तर सेना सत्तेतून बाहेर पडेल आणि त्यांना राष्टÑवादी तसेच कॉँग्रेसने साथ दिली तर भाजपा सरकार पडू शकेल अशी शक्यता गृहीत धरून कदाचित राणे यांची मंत्रिपदावर वर्णी लागणे तूर्तास शक्य नसल्याचे आठवले यांनी सांगितले.

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवले