शहरं
Join us  
Trending Stories
1
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
2
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
3
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
4
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
5
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
6
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
7
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
8
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
9
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
10
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
11
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
12
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
13
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
14
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
15
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
16
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
17
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
18
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
19
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
20
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं

बेरोजगार शिक्षकांचा सोशल मीडियावर संताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2018 22:51 IST

माळवाडी : राज्य शासनाने २०१० नंतर राज्यात शिक्षक भरती केलेली नाही; पण त्या उलट आश्वासनांचे गाजर दाखवत सीईटी पात्र असतानाही डी.एड. अभ्यासक्र म पूर्ण करून घेऊन टीईटी अनिवार्य केली आणि आता अभियोग्यता चाचणी घेऊन शिक्षक भरती करू, असे आश्वासन दिले. पण या सर्व परीक्षा घेऊनही आठ वर्षात एकदाही शिक्षक भरती केली नाही. या निषेधार्थ बेरोजगार शिक्षक सोशल मीडियावर आपल्या संतप्त भावना व्यक्त करीत आहेत.

ठळक मुद्देशासनाचा निषेध : २०१० नंतर भरतीच केली नसल्याचा आरोप‘आयुष्य डी.एड.मुळे वाया जातंय, असे कळूनही शासनाला याचे गांभीर्य नाही’.

माळवाडी : राज्य शासनाने २०१० नंतर राज्यात शिक्षक भरती केलेली नाही; पण त्या उलट आश्वासनांचे गाजर दाखवत सीईटी पात्र असतानाही डी.एड. अभ्यासक्र म पूर्ण करून घेऊन टीईटी अनिवार्य केली आणि आता अभियोग्यता चाचणी घेऊन शिक्षक भरती करू, असे आश्वासन दिले. पण या सर्व परीक्षा घेऊनही आठ वर्षात एकदाही शिक्षक भरती केली नाही. या निषेधार्थ बेरोजगार शिक्षक सोशल मीडियावर आपल्या संतप्त भावना व्यक्त करीत आहेत.शासनाच्या विरोधात आमरण उपोषणाचीही तयारी करीत आहेत. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याकडून २४ हजार रिक्त जागा अशी बातमी मिळताच सोशल मीडियावर बेरोजगार शिक्षकांनी हॅशटॅग शिक्षकभरती नावाने आपल्या मागण्या व्यक्त करीत आहेत. याच बरोबर शिक्षकभरतीला विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, खासदार सुप्रिया सुळे यांनीही आपल्या भावना व्यक्त करून बेरोजगार शिक्षकांना पाठिंबा दिला आहे.बेरोजगार शिक्षकाने ट्विट करीत म्हटले की, गेल्या आठ वर्षांपासून शासनाकडून डी.एड. व बी.एड.धारकांवर आश्वासनांची खैरात केली जात आहे.यासह सुप्रिया सुळे यांनी डी.एड. बेरोजगारांच्या मागण्या समजून घेत ट्विट केले की, ‘चार वेळा घोषणा झाल्या, हा बेरोजगार तरुणांच्या भावनांशी खेळ आहे; आता सहा महिन्यांच्या आत भरती करण्याची नवी घोषणा झालीय, घोषणाबाजी बंद करून तातडीने शिक्षकभरती करावी यासाठी मी मुख्यमंत्र्यांना तातडीने पत्र लिहीत आहे’, असे ट्विरवरून कळविले. तसेच विखे पाटील यांनी अभियोग्यता चाचणी झालेली असताना २४ हजार शिक्षक भरतीसाठी सरकारला सहा महिन्यांचा वेळ कशाला हवा, असा थेट प्रश्न ट्विटरवर विचारला आहे.

‘आयुष्य डी.एड.मुळे वाया जातंय, असे कळूनही शासनाला याचे गांभीर्य नाही’.- अक्षय शेवाळे,बेरोजगार शिक्षक