शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
4
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
5
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
6
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
7
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
8
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
9
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
10
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
11
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
12
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
13
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
14
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
15
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
16
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
17
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
18
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
19
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा

बेरोजगार शिक्षकांचा सोशल मीडियावर संताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2018 22:51 IST

माळवाडी : राज्य शासनाने २०१० नंतर राज्यात शिक्षक भरती केलेली नाही; पण त्या उलट आश्वासनांचे गाजर दाखवत सीईटी पात्र असतानाही डी.एड. अभ्यासक्र म पूर्ण करून घेऊन टीईटी अनिवार्य केली आणि आता अभियोग्यता चाचणी घेऊन शिक्षक भरती करू, असे आश्वासन दिले. पण या सर्व परीक्षा घेऊनही आठ वर्षात एकदाही शिक्षक भरती केली नाही. या निषेधार्थ बेरोजगार शिक्षक सोशल मीडियावर आपल्या संतप्त भावना व्यक्त करीत आहेत.

ठळक मुद्देशासनाचा निषेध : २०१० नंतर भरतीच केली नसल्याचा आरोप‘आयुष्य डी.एड.मुळे वाया जातंय, असे कळूनही शासनाला याचे गांभीर्य नाही’.

माळवाडी : राज्य शासनाने २०१० नंतर राज्यात शिक्षक भरती केलेली नाही; पण त्या उलट आश्वासनांचे गाजर दाखवत सीईटी पात्र असतानाही डी.एड. अभ्यासक्र म पूर्ण करून घेऊन टीईटी अनिवार्य केली आणि आता अभियोग्यता चाचणी घेऊन शिक्षक भरती करू, असे आश्वासन दिले. पण या सर्व परीक्षा घेऊनही आठ वर्षात एकदाही शिक्षक भरती केली नाही. या निषेधार्थ बेरोजगार शिक्षक सोशल मीडियावर आपल्या संतप्त भावना व्यक्त करीत आहेत.शासनाच्या विरोधात आमरण उपोषणाचीही तयारी करीत आहेत. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याकडून २४ हजार रिक्त जागा अशी बातमी मिळताच सोशल मीडियावर बेरोजगार शिक्षकांनी हॅशटॅग शिक्षकभरती नावाने आपल्या मागण्या व्यक्त करीत आहेत. याच बरोबर शिक्षकभरतीला विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, खासदार सुप्रिया सुळे यांनीही आपल्या भावना व्यक्त करून बेरोजगार शिक्षकांना पाठिंबा दिला आहे.बेरोजगार शिक्षकाने ट्विट करीत म्हटले की, गेल्या आठ वर्षांपासून शासनाकडून डी.एड. व बी.एड.धारकांवर आश्वासनांची खैरात केली जात आहे.यासह सुप्रिया सुळे यांनी डी.एड. बेरोजगारांच्या मागण्या समजून घेत ट्विट केले की, ‘चार वेळा घोषणा झाल्या, हा बेरोजगार तरुणांच्या भावनांशी खेळ आहे; आता सहा महिन्यांच्या आत भरती करण्याची नवी घोषणा झालीय, घोषणाबाजी बंद करून तातडीने शिक्षकभरती करावी यासाठी मी मुख्यमंत्र्यांना तातडीने पत्र लिहीत आहे’, असे ट्विरवरून कळविले. तसेच विखे पाटील यांनी अभियोग्यता चाचणी झालेली असताना २४ हजार शिक्षक भरतीसाठी सरकारला सहा महिन्यांचा वेळ कशाला हवा, असा थेट प्रश्न ट्विटरवर विचारला आहे.

‘आयुष्य डी.एड.मुळे वाया जातंय, असे कळूनही शासनाला याचे गांभीर्य नाही’.- अक्षय शेवाळे,बेरोजगार शिक्षक