शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! शरद पवारांनी भाकरी फिरवली! जयंत पाटलांचा राजीनामा; या नेत्याकडे सोपवणार सूत्रे
2
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार
3
छत्तीसगडच्या सुकमामध्ये २३ नक्षलवाद्यांनी एकत्र आत्मसमर्पण केले, त्यांच्यावर १.१८ कोटी रुपयांचे होते बक्षीस
4
GST Meeting: मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता; एसीपासून टुथपेस्टपर्यंत होऊ शकतात स्वस्त
5
लग्नाच्या रात्रीच नवरी करणार होती कांड, पण नवरदेव निघाला भलताच हुशार! मित्रांना घरी बोलावलं अन्... 
6
Recipe : किसलेल्या दोडक्याची ‘अशी’ चमचमीत करा भाजी, चव जबरदस्त-दोडक्याचेच व्हाल फॅन!
7
दोन वर १ शेअर मिळणार फ्री, 'ही' कंपनी ग्रहकांना देणार भेट; याच महिन्यात जमा होणार, तुमच्याकडे आहे का?
8
Air India Plane Crash : इंजिन थांबले, पण प्रयत्न सुरूच होते...; दोन्ही वैमानिकांनी शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दिली
9
West Bengal Accident: जगन्नाथाच्या दर्शनासाठी जाताना भाविकांवर काळाचा घाला, वाटेतच ट्रकला धडक, कारमधील ४ जण ठार!
10
“१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याचा आनंद, अभिमान”: DCM अजित पवार
11
UNESCO 12 Forts: "जेव्हा आपण गौरवशाली मराठा साम्राज्याबद्दल बोलतो, तेव्हा..."; PM मोदींनी व्यक्त केला आनंद
12
काँग्रेसला धक्का! धंगेकर, थोपटेनंतर काँग्रेसचा आणखी एक माजी आमदार भाजपमध्ये करणार प्रवेश
13
Ahmedabad Plane Crash : विमानात नेमका कुठे असतो 'फ्यूअल स्विच'? कोण करू शकतं याला चालू-बंद?
14
जनसुरक्षा विधेयकाला उद्धवसेनेचा विरोध; भाजपाची टीका, नेते म्हणाले, “महाविकास आघाडी...”
15
राज ठाकरे मुख्यमंत्री झाले तर महाराष्ट्र कसा असेल?, तेजस्विनी पंडितने दिली प्रतिक्रिया
16
“एसटीने घडविले ९ लाख ७१ हजार भाविक-प्रवाशांना विठ्ठल दर्शन”; प्रताप सरनाईकांची माहिती
17
१२ किल्ल्यांचा युनेस्को यादीत समावेश, राज ठाकरे म्हणाले, "ही अतिशय आनंदाची बाब, त्यासोबतच..."
18
ना कोणता साईड बिझनेस, ना जास्त पगार.., ४५ व्या वर्षी रिटायरमेंट आणि ४.७ कोटींची नेटवर्थ, कसं झालं हे शक्य?
19
Viral Video: भाजप नेत्याला एका महिलेसोबत कारमध्ये नको त्या अवस्थेत पाहिलं, व्हिडीओ व्हायरल!
20
नेपाळ मार्गे भारताला हादरवण्याचा प्लॅन, जैश अन् लष्करची मोठी योजना उघड

‘किसान पत्रकार’ नावाने बेरोजगारांना गंडा; राज्यात अनेक घटना

By admin | Updated: March 4, 2017 01:20 IST

नाशिक : भारत सरकारच्या दूरसंचार केंद्राच्या नावाचा वापर करीत, सरकारच्याच किसान चॅनलसाठी ‘किसान पत्रकार’ म्हणून नेमणूक करण्यासाठी राज्यातील बेरोजगारांना गंडा घालण्याचा प्रकार उघडकीस आला

नाशिक : भारत सरकारच्या दूरसंचार केंद्राच्या नावाचा वापर करीत, सरकारच्याच किसान चॅनलसाठी ‘किसान पत्रकार’ म्हणून नेमणूक करण्यासाठी राज्यातील बेरोजगारांना गंडा घालण्याचा प्रकार उघडकीस आला असून, नियुक्तीच्या नावाखाली संबंधितांकडून हजारो रुपयांची मागणी केली जात आहे. विशेष म्हणजे उमेदवारांच्या घरी नियुक्तिपत्र पाठवून पैशांची मागणी होत असल्याने त्यावर विश्वास ठेवणाऱ्या बेरोजगारांना गंडविण्याचा नवीन फंडा भामट्यांनी अवलंबिला आहे. नाशिक शहरातील काही बेरोजगार तरुणांना ‘किसान पत्रकार’ म्हणून नियुक्तीचे पत्रे थेट घरी पोहोचल्याने त्याची खात्री करण्याचा काहींनी प्रयत्न केला असता, त्यातून हा प्रकार लक्षात आला आहे. डी. डी. किसान चॅनलच्या लेटरहेडवर २०१६ ते २०५६ अशा तीस वर्षासाठी किसान पत्रकार म्हणून सरकारी नोकरी देण्यात आल्याचे या पत्रात म्हटले आहे. वर्षाकाठी तीन लाख, ९० हजार व महिन्याला ३२ हजार ५०० रुपये असे वेतनही ठरविण्यात आले असून, या पत्रावर संचालक सीमा शर्मा यांची स्वाक्षरी आहे. या नियुक्तिपत्रासोबतच किसान चॅनल विषयी माहिती देताना संपूर्ण देशात २४९२ पदे भरण्यात येणार असून, महाराष्ट्रात २२० पदे आहेत. त्यासाठी दहावी अथवा बारावी उत्तीर्ण असण्याची अट घालण्यात आली आहे. ज्या उमेदवारांची पत्रकार म्हणून निवड करण्यात आली, त्यांना नियुक्तीचे पत्र मिळाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांनी १३ हजार ७५० रुपये अनामत रक्कम म्हणून जमा करणे बंधनकारक करण्यात आले असून, कोणत्याही परिस्थितीत डिमांड ड्राफ्ट अथवा धनादेशाने ही रक्कम घेतली जाणार नाही, तर फक्त बॅँक खात्यात रोख रक्कमच जमा करण्याची सक्ती केली आहे. नियुक्ती पत्र मिळाल्यानंतर दुसऱ्या दिवशी जे उमेदवार पैसे जमा करणार नाहीत, त्यांची नियुक्ती त्याच दिवशी रद्द केली जाणार असल्याचेही या पत्रात म्हटले आहे. अनामत रक्कम जमा करण्यासाठी ०७८३८९७४९०५ या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)