शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता प्रशासन कोर्टाच्या निर्णयाचे उचित पालन करेल..."; CM देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत
2
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
3
फक्त कारच नाहीत, १७५ वस्तू स्वस्त होणार, पण या वस्तू महागणार...
4
धक्कादायक! लिव्ह-इन पार्टनरची केली हत्या, सिग्नलवर गाडी थांबवली, पेट्रोल ओतून पेटवून दिले
5
‘मतचोरीचा अणुबॉम्ब टाकला, आता हायड्रोजन बॉम्ब येणार, त्यानंतर नरेंद्र मोदी...', राहुल गांधींचा निशाणा
6
याला म्हणतात स्टॉक...! झटक्यात ₹३७०० नं वधारला शेअर; एकाच दिवसात गुंतवणूकदारांना केलं मालामाल, आपल्याकडे आहे का?
7
टाटा-महिंद्रामुळे बाजारात पुन्हा तेजी! सेन्सेक्स-निफ्टीची मोठी उसळी; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
8
युरोपियन युनियनचे नेते बल्गेरियावरून जात होते, रशियाने विमानाचे रडारच जाम करून टाकले...
9
'पापा कहते हैं' फेम अभिनेत्रीने सोडली Googleची नोकरी; आता बनली पब्लिसिस ग्रुपची सीईओ
10
अंबानी कुटुंबाने घेतला मोठा निर्णय; वाढत्या तणावादरम्यान विशेष कार्यक्रम पुढे ढकलला !
11
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: मराठा आंदोलन: मुंबई हायकोर्टातील आजचे कामकाज संपले; उद्या दुपारी ३ वाजता पुन्हा सुनावणी
12
ड्रीम गर्ल हेमा मालिनी यांनी मुंबईत विकले २ फ्लॅट; 'एवढ्या' कोटींमध्ये झाला व्यवहार, बाजारभावापेक्षा दुप्पट नफा
13
हैदराबाद गॅझेट लागू करण्याबाबत मसुदा तयार, पण...; राधाकृष्ण विखे पाटील यांची महत्त्वाची माहिती
14
सेंट झेवियर्स कॉलेजच्या ‘मल्हार’ फेस्टिव्हलमध्ये तरुणाईचा कल्ला; 'या' टीमने मारली बाजी
15
गिलमुळे 'तळ्यात-मळ्यात' असलेल्या संजूचा 'फिफ्टी प्लस'चा चौकार! दावेदारी भक्कम केलीये खरी, पण...
16
AIने हे काय केलं, मुलाच्या हातून आईला संपवलं! नेमकं प्रकरण काय? जाणून बसेल धक्का
17
Maratha Morcha : मुख्यमंत्री साहेब, तुमच्या हातातली वेळ गेलेली नाही, महाराष्ट्र मुंबईत यायला निघण्याआधी निर्णय घ्या; मनोज जरांगेंचा इशारा
18
बिजुरिया बिजुरिया! सोनू निगमसोबत वरुण धवनचा जबरदस्त डान्स, अभिनेता म्हणाला...
19
वहिनीचा दीरावर जडला जीव; रात्री पतीला एका खोलीत कोंडून 'ती' दिराच्या खोलीत गेली अन्...
20
तुम्हीही तुमच्या पगारवाढीचा हिशोब लावताय? वेतनवाढ कशी ठरते? संपूर्ण गणित सोप्या भाषेत समजून घ्या

‘किसान पत्रकार’ नावाने बेरोजगारांना गंडा; राज्यात अनेक घटना

By admin | Updated: March 4, 2017 01:20 IST

नाशिक : भारत सरकारच्या दूरसंचार केंद्राच्या नावाचा वापर करीत, सरकारच्याच किसान चॅनलसाठी ‘किसान पत्रकार’ म्हणून नेमणूक करण्यासाठी राज्यातील बेरोजगारांना गंडा घालण्याचा प्रकार उघडकीस आला

नाशिक : भारत सरकारच्या दूरसंचार केंद्राच्या नावाचा वापर करीत, सरकारच्याच किसान चॅनलसाठी ‘किसान पत्रकार’ म्हणून नेमणूक करण्यासाठी राज्यातील बेरोजगारांना गंडा घालण्याचा प्रकार उघडकीस आला असून, नियुक्तीच्या नावाखाली संबंधितांकडून हजारो रुपयांची मागणी केली जात आहे. विशेष म्हणजे उमेदवारांच्या घरी नियुक्तिपत्र पाठवून पैशांची मागणी होत असल्याने त्यावर विश्वास ठेवणाऱ्या बेरोजगारांना गंडविण्याचा नवीन फंडा भामट्यांनी अवलंबिला आहे. नाशिक शहरातील काही बेरोजगार तरुणांना ‘किसान पत्रकार’ म्हणून नियुक्तीचे पत्रे थेट घरी पोहोचल्याने त्याची खात्री करण्याचा काहींनी प्रयत्न केला असता, त्यातून हा प्रकार लक्षात आला आहे. डी. डी. किसान चॅनलच्या लेटरहेडवर २०१६ ते २०५६ अशा तीस वर्षासाठी किसान पत्रकार म्हणून सरकारी नोकरी देण्यात आल्याचे या पत्रात म्हटले आहे. वर्षाकाठी तीन लाख, ९० हजार व महिन्याला ३२ हजार ५०० रुपये असे वेतनही ठरविण्यात आले असून, या पत्रावर संचालक सीमा शर्मा यांची स्वाक्षरी आहे. या नियुक्तिपत्रासोबतच किसान चॅनल विषयी माहिती देताना संपूर्ण देशात २४९२ पदे भरण्यात येणार असून, महाराष्ट्रात २२० पदे आहेत. त्यासाठी दहावी अथवा बारावी उत्तीर्ण असण्याची अट घालण्यात आली आहे. ज्या उमेदवारांची पत्रकार म्हणून निवड करण्यात आली, त्यांना नियुक्तीचे पत्र मिळाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांनी १३ हजार ७५० रुपये अनामत रक्कम म्हणून जमा करणे बंधनकारक करण्यात आले असून, कोणत्याही परिस्थितीत डिमांड ड्राफ्ट अथवा धनादेशाने ही रक्कम घेतली जाणार नाही, तर फक्त बॅँक खात्यात रोख रक्कमच जमा करण्याची सक्ती केली आहे. नियुक्ती पत्र मिळाल्यानंतर दुसऱ्या दिवशी जे उमेदवार पैसे जमा करणार नाहीत, त्यांची नियुक्ती त्याच दिवशी रद्द केली जाणार असल्याचेही या पत्रात म्हटले आहे. अनामत रक्कम जमा करण्यासाठी ०७८३८९७४९०५ या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)