शहरं
Join us  
Trending Stories
1
“युद्धाची गरजच भासणार नाही, एक दिवस POKतील जनता म्हणेल की आम्ही भारतवासी आहोत”: राजनाथ सिंह
2
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
3
नेपाळ, फ्रान्सनंतर आता फिलिपिन्समध्येही भडका! लोक रस्त्यावर; धुमश्चक्रीत ९५ पोलीस जखमी, २१६ जणांना अटक
4
५ कपन्यांमधील हिस्सा विकण्याच्या विचारात मोदी सरकार! लिस्ट मध्ये आहेत या सरकारी कंपन्यांची नावं
5
इस्रायल-अमेरिकेचं टेन्शन वाढलं; इराणने १० हजार किमीपर्यंत मारा करणाऱ्या ICB मिसाईलची केली चाचणी
6
अशी धुलाई कधीच पाहिली नव्हती...; अभिषेक शर्माच्या फटकेबाजीनंतर पाकिस्तानी पत्रकाराची कबुली
7
परदेशी उपग्रहाच्या हालचालींवर भारताची करडी नजर; ५० बॉडीगार्ड उपग्रहांची तयारी
8
'मला बायको हवीय, माझं लग्न लावून द्या,कारण…’, तरुणाने थेट पंचायत समितीला दिलं पत्र, त्यानंतर...
9
Navratri 2025: नवरात्रीत अनवाणी चालण्याची प्रथा कशी सुरू झाली? खरंच लाभ होतो का?
10
भारतीय सैन्याने पाडलेले...श्रीनगरमधील डल सरोवरात सापडले पाकिस्तानचे 'फुसकी' क्षेपणास्त्र
11
खळबळजनक! बंद फ्लॅटमध्ये ३ दिवसांपासून पडून होता आईचा मृतदेह, शेजारी बसलेला मुलगा
12
नवरात्री २०२५: विलक्षण, अद्भूत, आत्मबोधाचे अनोखे पर्व नवरात्र; पाहा, नवदुर्गांचे महात्म्य
13
प्रणित मोरेला पाहून काजोलने विचारलं, 'हा कोण?', सलमानचं उत्तर ऐकून झाली शॉक; म्हणाली...
14
हेल्थ घ्या किंवा टर्म इन्शुरन्स, आता शून्य GST; ₹३०,००० च्या प्रीमिअमवर वाचतील ५४०० रुपये
15
टी-२० मध्ये सुपरफास्ट ५० षटकार; भारताचा अभिषेक शर्मा यादीत अव्वल, सूर्यकुमार टॉप-५ मध्ये!
16
नवरात्रीच्या मुहूर्तावर सोने खरेदीवर भरघोस ऑफर्स; मेकिंग चार्जवर ५०% सूट आणि फ्री सोन्याचे नाणे
17
ऐकावं ते नवलच! 'या' शहरात हिल्स घालून फिरायला घ्यावी लागते सरकारची परवानगी
18
नवरात्री २०२५: ९ गोष्टी अजिबात करू नका, नवदुर्गांची वक्रदृष्टी-अवकृपा संभव; चूक घडलीच तर...
19
भारतीय IT कंपन्यांवर नवं संकट! ट्रम्प यांच्या एका निर्णयामुळे दरवर्षी होणार कोट्यवधींचा खर्च, नोकऱ्यांवर गदा?
20
डीमार्टने जीएसटी दर कमी केले नाहीत? पहिल्याच दिवशी ८,८५७ रुपयांचे बिल, किती लावला GST?

उड्डाणपुलाखालील परिस्थिती ‘जैसे-थे’

By admin | Updated: September 9, 2016 01:16 IST

यंत्रणेची डोळेझाक : असुरक्षित संसार ‘हायवे’वरच

नाशिक : मुंबई नाका ते वडाळानाकादरम्यान महामार्गावर गजरा विक्रेत्यांची आठ ते दहा कुटुंबांचा संसार दुभाजकावरच कायम असून, याकडे यंत्रणेची डोळेझाक होत आहे. हायवेवरील असुरक्षित संसाराचा मुद्दा प्रकाशझोतात येऊनदेखील त्याबाबत महापालिका, पोलीस, महामार्ग प्राधिकरण अशा सर्वच जबाबदार यंत्रणेने डोळेझाक करणे पसंत केले आहे.शहरामधील विविध सिग्नलवर गजरे विक णारी लहान मुले, महिला, युवक यांचा रात्री व दिवसाही मुक्काम असतो तो मुंबईनाका परिसरातील उड्डाणपुलाखाली थेट महामार्गाच्या दुभाजकावरच. यामुळे या गजरा विक्रेत्यांच्या कुटुंबाची सुरक्षा धोक्यात आली आहे. विक्रेत्यांनी घरावर होणारा खर्च किंवा शहर व परिसरात झोपड्या टाकण्याची निर्माण होणाऱ्या अडचणींमुळे निवाऱ्याचा ‘शॉर्टकट’ हायवेवर शोधला आहे. झोक्यात झोपणाऱ्या लहान बाळांपासून ते वृद्धांपर्यंत या विक्रेत्यांच्या कुटुंबात सदस्य आहेत; मात्र त्याचे कु ठलेही गांभीर्य विक्रेत्यांना नाही. दुभाजकावरच या विक्रेत्यांचा दिवस उगवतो आणि रात्रही सरते. महामार्गावरून भरधावपणे जाणाऱ्या वाहनांच्या आवाजात ही मंडळी बिनधास्तपणे ‘निद्रिस्त’ असते. रस्त्यालगतच्या पदपथांवर झोपणारे किंवा दुभाजकांवर झोपलेल्या भिखारींचा अपघातात मृत्यू झाल्याच्या घटना मुंबई, पुण्यासारख्या शहरांमध्ये यापूर्वी घडल्या आहेत. त्या घटनांची पुनरावृत्ती या ठिकाणीही घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण दिवसा-रात्री वाहनचालक भरधावपणे महामार्गावरून वाहने नेतात. महामार्गाच्या दुभाजकांवर झोपणे हे धोकेदायक आहे. रात्रीच्या वेळी हा धोका कित्येकपटीने वाढतो; मात्र याची कुठलीही जाणीव या गजराविक्रेत्यांना नाही किंबहुना असूनही नसल्यासारखे हे लोक भासवत आहे. दुर्दैवाने काही अप्रिय घटना घडल्यास महापालिका, पोलीस, महामार्ग प्राधिकरण अशा सर्वच सरकारी शासकीय प्रशासनाच्या भूमिकेविषयी संतप्त प्रतिक्रिया उमटतील यात शंका नाही. (प्रतिनिधी)