मनमाड : नागापूर ग्रामपंचायतीमध्ये निर्मल भारत अभियानाअंतर्गत कामात साडेचार लाख रुपयांचा अपहार झाल्याची फिर्याद शनिवारी मनमाड शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली असून, सरपंंच व ग्रामसेवकासह तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.नांदगाव पंचायत समितीचे विस्तार अधिकारी संजय धर्मा महाले निर्मल भारतच्या कामात अपहारनागापूर : तिघांविरोधात गुन्हा दाखलयांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीमध्ये म्हटले आहे की, दि. २६ फेब्रुवारी २०१४ ते ९ आॅक्टोबर २०१४ या कालावधीत नागापूर ग्रामपंचायतीकडून निर्मल भारत अभियानाअंतर्गत घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन कामाचे ठेके देण्यात आले होते. या कामांचे मूल्यांकन न करता नऊ लाख २८ हजार रुपयांचा चेक ठेकेदाराला अदा करण्यात आला. प्रत्यक्षात या कामाचे मूल्यांकन पाच लाख २३ हजार २१४ रुपयांचे झाल्याने उर्वरित चार लाख ४६ हजार ७८६ रुपयांचा पदाचा दुरोपयोग करून संगनमताने अपहार केला असल्याने ग्रामपंचायतीची व शासनाची फसवणूक केली म्हणून संशयित आरोपी रवींद्र भास्कर सोनवणे, आशा अशोक शिलावट (सरपंच), एस. एम. व्यवहारे (ग्रामसेवक) यांच्या विरोधात गुहा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक धिरेंद्रसिंग बिलावल हे करत आहे.दरम्यान, नागापूर ग्रा.पं.च्या या अपहाराबाबत माजी आमदार संजय पवार यांनी शासनाकडे तक्रार केली असल्याचे समजते.(वार्ताहर)
निर्मल भारतच्या कामात अपहार
By admin | Updated: August 8, 2015 23:06 IST