शहरं
Join us  
Trending Stories
1
"भाजपाशी अनैतिक संबंध तोडावेत, जसं 'वर्षा'वर हक्कानं जाता, तसं 'मातोश्री'वर यावं" 
2
मराठा आरक्षण सुनावणी होणार जलद; हायकोर्टात विशेष पूर्णपीठ स्थापन; SCच्या आदेशानंतर पाऊल
3
अफगाणिस्तानला भारताचा मदतीचा हात! अटारी मार्गे केली विशेष मदत; पाकिस्तानला दाखवून दिले
4
आजचे राशीभविष्य १७ मे २०२५ : नोकरदारांना नोकरीत लाभ होईल, जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस
5
भारताला हवेत हाफिज सईद, मसूद अझहर, दाऊद इब्राहिम; मोस्ट वाँटेडची यादी पाकला सोपवणार
6
‘सेलेबी’ला काम नको; आयबीचा होता इशारा, सुरक्षेविषयी नवीन प्रश्न निर्माण होण्याची भीती
7
भारत आता पाकिस्तानवर ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ करणार; ‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती जगात पोहोचवणार
8
आगळीक करू नका, ‘ऑपरेशन सिंदूर’ हा फक्त ट्रेलर, गरज पडल्यास पूर्ण ‘पिक्चर’ दाखवू: राजनाथ सिंह
9
अफगाणिस्तानातून पाकची जलकोंडी होण्याची शक्यता; शाहतूत धरणास भारताचे आर्थिक, तांत्रिक सहकार्य
10
‘८६४७’ म्हणजे थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा संदेश? जेम्स कॉमी यांच्या पोस्टमुळे खळबळ
11
मध्य प्रदेशच्या मंत्र्यानंतर आता उपमुख्यमंत्र्यांचेही विधान चर्चेत; काँग्रेसची भाजपावर टीका
12
पाक समर्थक तुर्की, अझरबैजानशी  कोणताही व्यापार, पर्यटन नाही; भारतीय व्यापाऱ्यांचा बहिष्कार
13
“तणावाच्या पार्श्वभूमीवर तुर्की, अझरबैजानसोबत करार करू नका”; याआधीचे करार रद्द करायचा निर्णय
14
मुंबईत तळ ठोकून असणाऱ्या २५० बांगलादेशींना घरचा रस्ता; २ दिवसांत पोलिसांची मोठी धडक कारवाई
15
राजकीय नेत्यांना चढला महापालिका निवडणुकीचा ज्वर! स्थानिक प्रश्नांकडे लक्ष, भेटीगाठी सुरू
16
...आता सहपोलिस आयुक्त गुप्तवार्ता; आयपीएस डॉ. आरती सिंह यांच्याकडे जबाबदारी
17
तिन्ही मार्गावर मुंबईत उद्या ‘मेगा ब्लॉक डे’; पश्चिम, मध्य, हार्बरवरील वेळापत्रक कसे असेल?
18
मुंबई सेंट्रल स्थानकावर पहिले डिजिटल लाउंज; केवळ प्रवासी नाही तर नागरिकांनाही लाभ मिळणार
19
दारूच्या नशेत बेभान कंटेनर चालकाने वाहनांसह २० नागरिकांना उडविले; बीडमधील थरार, महिला ठार
20
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर

तडीपारांच्या वास्तव्यामुळे शहरात अस्वस्थता

By admin | Updated: January 10, 2016 23:59 IST

मुक्त संचार : विशेष शाखा, गुन्हे शोध पथक व कोम्बिंग आॅपरेशनबाबत प्रश्नचिन्ह

नाशिक : पोलीस ठाण्यांतील विविध गंभीर गुन्ह्यांत पोलीसदफ्तरी फरार असलेल्या, तसेच शहरातून तडीपार करण्यात आलेल्या गुन्हेगारांचा शहरातच मुक्त संचार असल्याचे सराईत गुन्हेगार अर्जुन आव्हाड व निखिल गवळे यांच्या खुनावरून समोर आले आहे़ शहरातच असलेल्या या तडीपारांची खबर पोलिसांना मिळत नसल्याने खबऱ्यांचे नेटवर्क, पोलीस ठाण्यातील स्थानिक गुन्हे शाखा, तसेच पोलीस आयुक्तालयात राबविण्यात येणाऱ्या कोम्बिंग आॅपरेशनबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. सातपूरच्या विश्वासनगरमधील अ‍ॅडव्होकेट मेधा जगताप यांचा २१ फेब्रुवारी २०१३ रोजी धारदार हत्याराने वार करून खून केल्याची घटना घडली होती़ या खूनप्रकरणी अर्जुन महेश आव्हाड ऊर्फ वाट्या, चेतन अंबादास सावकार व जितेंद्र राजेंद्र कुलथे यांच्यावर सातपूर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल आहे़ पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार आव्हाड यास ६ मार्च २०१४ ला तर सावकार व कुलथे या दोघांना ७ एप्रिल २०१४ मध्ये तडीपार केले होते; मात्र यानंतरही हे तिघे सातपूर परिसरात राहात होते़ आरोपींचा मालमत्ता तसेच शरीराविरुद्धच्या गुन्ह्यांमध्ये सातत्याने सहभाग आढळल्यास त्यांना पोलीस आयुक्तांच्या आदेशान्वये तडीपार करण्यात येते़ परिमंडळ दोनमध्ये करण्यात आलेल्या ३३ तडीपारांमध्ये अर्जुन आव्हाडचाही समावेश होता़ तर निखिल गवळे शहर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका गुन्ह्यात फरार होता़ ३१ डिसेंबरपासून हे दोघेही बेपत्ता असूनही त्यांच्या कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार केली नाही़ याचे कारण म्हणजे ते तडीपार असले तरी राजरोसपणे फिरत होते़ नाशिक शहरातून तडीपार करण्यात आलेल्या गुन्हेगारांना अहमदनगर, धुळे, ठाणे जिल्ह्याच्या हद्दीत नेऊन सोडले जाते़ मात्र पोलिसांची नजर चुकवून वा अन्य मार्गांनी ते शहरात दाखल होऊन अवघ्या काही तासांत गुन्हा करून जिल्ह्यांच्या सीमेवर असलेल्या भागात पलायनही करतात़ या तडीपारांना शहरापासून रोखण्यासाठी प्रभावी उपाय करणे गरजेचे आहे़ त्यातच शहरात परिमंडळ दोन, परिमंडळ एकमध्ये कोम्बिंग आॅपरेशन राबविले जाते़ मात्र त्यामध्ये अपवादानेच एखादा तडीपार आढळून येतो़ नाशिक शहरात प्रत्येक पोलीस ठाणे स्तरावर विशेष शाखा आहे़ पोलीस ठाणे हद्दीतील महत्त्वाच्या घडामोडी, गुन्हेगांर यांच्याबाबत गुप्त माहिती मिळवून ती पोलीस आयुक्तालयास देण्याचे काम त्यांच्याकडे असते़ तसेच गुन्हे शोध पथक, गुन्हे शाखेचे तीन युनिटही शहरात कार्यरत आहेत़ पोलिसांची इतकी मोठी यंत्रणा असतानाही तडीपार राजरोसपणे फिरतात, याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे़ (प्रतिनिधी)