शहरं
Join us  
Trending Stories
1
मेक्सिकोमध्ये GenZचे जोरदार आंदोलन, तरूण रस्त्यावर का उतरले? इतका तीव्र संताप कशासाठी?
2
Shubman Gill Hospitalised : शुभमन गिलला रुग्णालयात दाखल करण्याची वेळ; BCCI नं दिली मोठी अपडेट
3
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेेंबर २०२५: आर्थिक लाभ होतील, मित्र व स्नेह्यांची भेट आनंददायी राहील.
4
पाकिस्तानची सौदी अरेबियानंतर आता आणखी एका मुस्लिम देशाशी हातमिळवणी? नवा 'प्लॅन' काय?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना घवघवीत यश, मनसोक्त जगण्याचा काळ; नोकरीत प्रगती, इच्छापूर्ती!
6
'प्रेम? ही तर ओव्हररेटेड भावना', धनुषच्या उत्तराने सर्वच चकित; क्रिती म्हणाली, 'मला नाही वाटत...'
7
'वाराणसी' एस एस राजामौलींच्या सिनेमाचं टायटल घोषित, महेश बाबूचा व्हिडीओ टीझर आऊट
8
Bihar CM: मुख्यमंत्री कोण? एनडीएमध्ये चर्चा सुरूच; बिहारच्या नेतृत्वाबाबत गूढ कायम!
9
Kalyan: रेल्वेतून पडून जखमी; डॉक्टरांनी घरी पाठवले, काही तासांत मृत्यू!
10
ड्रायव्हिंग टेस्ट फक्त नावापुरती! मुंबई RTO मध्ये स्टिअरिंगवर हात ठेवताच मिळतंय लायसन्स
11
JJ Hospital: जेजे रुग्णालयाची कॅन्सर रुग्णांसाठी ११ एकर जागेची मागणी!
12
Mumbai: मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळा येथे बांधकाम सुरू असताना माती कोसळली; २ ठार, ३ जखमी
13
Court: राजकारण्यांवरील खटल्यांचा निपटारा करा! महाराष्ट्र, गोव्यातील ४७८ प्रकरणांवर हायकोर्टाचे आदेश
14
Congress: ठाकरेंना मोठा धक्का! काँग्रेसची 'एकला चलो'ची घोषणा; मुंबई महानगरपालिका स्वबळावर लढणार
15
Akasa Air: नवी मुंबई विमानतळामुळे प्रवाशांना दिलासा; ख्रिसमसपासून दिल्ली, गोवासह ४ शहरांसाठी थेट सेवा
16
Vasai: बालदिनीच क्रूर शिक्षा! शाळेत उशिरा आली म्हणून १०० उठाबशा, विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू
17
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
18
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
19
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
20
एका वर्षात तिसरी वेळ! भारताच्या शेजारी देशात सापडली तब्बल १००० टन सोन्याची खाण, कोणता आहे देश?
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2018 00:59 IST

नाशिक : भारतीय जनता पार्टी हा पक्ष नेहमीच कार्यकर्त्यांच्या बाजूने उभा राहत आला आहे, यात शंका नाही; मात्र मागील काही महिन्यांपासून भाजपाचा कार्यकर्ता कोठेतरी अस्वस्थ झालेला जाणवत असल्याची खंत राज्याच्या ग्रामविकास व महिला बालकल्याण विकासमंत्री पंकजा मुंडे यांनी बोलताना व्यक्त केली. त्यांचे मनोबल कमी झाले असून, पदाधिकारी व पक्षश्रेष्ठींकडून कार्यकर्त्यांचे मनोबल वाढविण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे असून, मी पक्षाच्या कोअर समितीची सदस्य म्हणून याबाबत पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासनही मुंडे यांनी यावेळी दिले.

ठळक मुद्देपंकजा मुंडे यांची खंतमनोधैर्य उंचविण्यासाठी प्रयत्न होण्याची गरजपालकमंत्री गिरीश महाजन यांच्या शब्दाला फडणवीस यांच्याकडे अधिक वजनही

नाशिक : भारतीय जनता पार्टी हा पक्ष नेहमीच कार्यकर्त्यांच्या बाजूने उभा राहत आला आहे, यात शंका नाही; मात्र मागील काही महिन्यांपासून भाजपाचा कार्यकर्ता कोठेतरी अस्वस्थ झालेला जाणवत असल्याची खंत राज्याच्या ग्रामविकास व महिला बालकल्याण विकासमंत्री पंकजा मुंडे यांनी बोलताना व्यक्त केली. त्यांचे मनोबल कमी झाले असून, पदाधिकारी व पक्षश्रेष्ठींकडून कार्यकर्त्यांचे मनोबल वाढविण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे असून, मी पक्षाच्या कोअर समितीची सदस्य म्हणून याबाबत पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासनही मुंडे यांनी यावेळी दिले.भाजपाच्या पक्ष कार्यालयातील पदाधिकारी-कार्यकर्ता मेळाव्यात त्या बोलत होत्या. याप्रसंगी व्यासपीठावर महापौर रंजना भानसी, आमदार व शहराध्यक्ष बाळासाहेब सानप, डॉ. राहुल अहेर, उपमहापौर प्रथमेश गिते, प्रदेशचिटणीस लक्ष्मण सावजी, स्थायी समितीच्या सभापती हिमगौरी आडके, सुनील बागुल उपस्थित होते.यावेळी मुंडे म्हणाल्या, ‘अच्छे दिन’ येणार असा पक्षाने निवडणूकपूर्व नारा दिला आणि राज्याच्या व देशातील जनतेला अच्छे दिन आले आहे आणि पुढील दीड-दोन वर्षांत यापेक्षाही अधिक अच्छे दिन आल्याचा अनुभव जनतेला येणार आहे. त्यामुळे पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राज्य-केंद्र सरकारद्वारे विविध योजनांतर्गत राबविण्यात आलेली विकासकामे जनतेपर्यंत पोहचविण्याचा सातत्याने प्रयत्न करावा. भाजपाचा कार्यकर्ता सुसंस्कृत व एक दर्जा असलेला कार्यकर्ता आहे, त्यामुळे त्या कार्यकर्त्याकडून तशाच पद्धतीचे वर्तन पक्षाला अपेक्षित असून, कार्यकर्त्यांनी संयम बाळगून पक्षाच्या प्रचार-प्रसारावर भर द्यावा, असे मुंडे यांनी यावेळी आवाहन केले.महाजन यांच्या शब्दाला वजननाशिक शहराला अधिक अच्छे दिन येणार आहे. कारण या शहराला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: दत्तक घेतले आहे. तसेच जिल्ह्याला लाभलेले पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या शब्दाला फडणवीस यांच्याकडे अधिक वजनही आहे. त्यामुळे माझी फारशी गरज लागणार नाही, कारण एकापेक्षा एक दिग्गज या शहराकडे उपलब्ध असल्याचेही मुंडे यावेळी म्हणाल्या. महाजन यांनी टाकलेला नाशिकच्या हिताचा शब्द मुख्यमंत्र्यांकडे खाली जाणार नाही असा ‘विश्वास’ही त्यांनी यावेळी व्यक्त केला.