शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
4
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
5
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
6
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
7
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
8
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
9
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
10
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
11
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
12
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
13
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
14
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
15
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
16
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
17
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
18
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
19
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
20
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त

अनुकंपा तत्त्वावरील भरतीबाबत अनिश्चितता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2019 23:35 IST

जिल्ह्यातील अनुकंपाधारक उमेदवारांच्या भरतीबाबत प्रशासकीय पातळीवरील उदासीनता वारंवार समोर येऊनही अनुकंपा भरतीबाबतची अधिकृत आकडेवारी अद्यापही समोर आलेली नाही. अनुकंपाधारकांना आवश्यकतेनुसार त्या-त्या विभागातून नियुक्ती दिली जात असल्याचा दावा केला जात आहे, तर किती अनुकंपाधारकांना नोकरीत सामावून घेण्यात आले याची ठोस माहिती मात्र उपलब्ध होत नाही.

ठळक मुद्देप्रतीक्षा कायम : याद्यांच्या माहितीबाबत संभ्रम

नाशिक : जिल्ह्यातील अनुकंपाधारक उमेदवारांच्या भरतीबाबत प्रशासकीय पातळीवरील उदासीनता वारंवार समोर येऊनही अनुकंपा भरतीबाबतची अधिकृत आकडेवारी अद्यापही समोर आलेली नाही. अनुकंपाधारकांना आवश्यकतेनुसार त्या-त्या विभागातून नियुक्ती दिली जात असल्याचा दावा केला जात आहे, तर किती अनुकंपाधारकांना नोकरीत सामावून घेण्यात आले याची ठोस माहिती मात्र उपलब्ध होत नाही.जिल्हा परिषदेत अनुकंपावर ६२ कर्मचाऱ्यांची तत्काळ नियुक्ती करण्यात आल्यामुळे इतर विभागातील अनुकंपाधारकांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. जिल्हा परिषदेप्रमाणेच महसूल आणि सामाईक यादीतील अनुकंपाधारकांना कधी नियुक्ती दिली जाणार याविषयीची विचारणा अनुकंपाधारक करीत आहेत. मात्र त्यांना अपेक्षित माहिती मिळत नसल्याने भरतीचे निकष काय आणि प्राधान्यक्रम कसा ठरविणार याविषयी अनुकंपाधारकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. जिल्हा परिषदेची व्याप्ती आणि कार्यक्षेत्र मोठे असल्यामुळे तेथील अनुकंपाधारकांना आकडा मोठा वाटतो. अन्य विभागांमध्येदेखील अनुकंपाधारकांना सामावून घेतले जात असल्याचे उत्तरे अनुकंपाधारकांना मिळत आहेत.मिळालेल्या माहितीनुसार गेल्या काही वर्षांत भरतीच झालेली नाही. अनेक कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांच्यादेखील जागा रिक्त आहेत. एका टेबलावरील अधिकाºयास अनेक जबाबदाºया पार पाडाव्या लागतात. कर्मचारी संख्या अपुरी असल्यामुळे कर्मचाऱ्यांवर ताण येत असल्याचे आणि कामाला विलंब होत असल्याचे शासकीय अधिकºयांकडूनच सांगितले जात असतानाही अनुकंपाधारकांची भरती नेमकी किती टक्के आणि कोणत्या निकषावर होते? असा प्रश्न निर्माण झाला आहे.जिल्ह्णात ‘क’ वर्गातील ४८९, तर ‘ड’ वर्गातील ३०७ इतके अनुकंपाधारक नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत. निवडणूक कामासाठी अनुकंपाधारक उमेदवारांची मदत घेण्याबाबतचे निवेदनदेखील अनुकंपाधारकांना दिले होते. मात्र तेथेही त्यांना संधी देण्यात आलेली नाही. महसूलसह अन्य विभागांतदेखील अनेक जागा रिक्त असतानाही अनुकंपाधारकांना सामावून घेण्याबाबत अपेक्षित कार्यवाही होत नसल्याने प्रतीक्षा यादी लांबली असल्याची तक्रार अनुकंपाधारक करीत असताना अनुकंपाधारकांना सामावून घेतले जात असल्याचे अधिकारी सांगत आहेत.यादी खुली करण्याची मागणीज्या ज्या विभागात अनुकंपाधारक आहेत त्यांची यादी प्राधान्यक्रमानुसार लावण्यात यावी, त्याचप्रमाणे गेल्या पाच वर्षांत किती अनुकंपाधारकांना नोकरीत सामावून घेण्यात आले, सामाईक यादीतील उमेदवार किती याची देखील माहिती प्रत्येक कार्यालयाच्या दर्शनीभागावर लावण्यात यावी अशी मागणी अनुकंपाधारकांकडून केली जात आहे.

टॅग्स :NashikनाशिकGovernmentसरकार