शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

पिंगळे यांच्या विरुद्ध अविश्वास

By admin | Updated: June 24, 2017 01:01 IST

नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती देवीदास पिंगळे यांच्यावर गैरव्यवहार व मनमानी कारभाराचा ठपका ठेवत बाजार समितीच्या अठरा पैकी तेरा सदस्यांनी अविश्वास व्यक्त केला

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती देवीदास पिंगळे यांच्यावर गैरव्यवहार व मनमानी कारभाराचा ठपका ठेवत बाजार समितीच्या अठरा पैकी तेरा सदस्यांनी अविश्वास व्यक्त केला असून, त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन अविश्वास ठराव सादर केला आहे. विशेष म्हणजे २०१५ मध्ये पिंगळे यांच्या गटातून निवडून आलेल्या संचालकांनीच त्यांच्याविरोधात बंड पुकारल्यामुळे राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत. गेल्या आठवड्यापासून पिंगळे यांच्या विरोधात विरोधकांनी जमवाजमव सुरू केली होती. गुरुवारीच जिल्हाधिकाऱ्यांकडे अविश्वास दाखल करण्याची तयारी पूर्ण झाली होती. तथापि, पिंगळे यांनी स्वत:हून सभापतिपदाचा राजीनामा देण्याची तयारी दर्शविल्याने ही मोहीम थांबली होती. शुक्रवारी मात्र तेराही संचालकांनी आपल्या समर्थकांसह जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन अविश्वास ठराव दाखल केला व महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी विक्री अधिनियमानुसार बाजार समितीची विशेष सभा बोलविण्याची विनंती केली आहे. अविश्वास ठराव दाखल करण्यामागे या संचालकांची कारणे दिली असून, त्यात म्हटले आहे की, सभापती पिंगळे यांनी सुरुवातीपासूनच बाजार समितीत मनमानी कारभार चालविला असून, कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता निधीचे सुमारे ५३ लाख रुपये त्यांनी परस्पर हडप केल्याच्या कारणावरून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे तसेच न्यायालयाने त्यांना बाजार समितीच्या कारभारात हस्तक्षेप करण्यापासून रोखल्यामुळे बाजार समितीची तसेच संचालकांची बदनामी झाली आहे. समितीच्या सभेमध्ये चर्चा न झालेल्या विषयांचे ठराव घुसविण्याचे तसेच विषय पत्रिकेत नसलेल्या विषयांना मान्यता देण्याचे प्रकारही त्यांच्याकडून घडले आहेत.  या ठरावावर शिवाजी चुंभळे, तुकाराम पेखळे, संपत सकाळे, युवराज कोठुळे, विमलबाई जुंद्रे, विश्वास नागरे, संजय तुंगार, रवींद्र भोये, श्यामराव गावित, भाऊसाहेब खांडबहाले, जगदिश अपसुंदे, संदीप पाटील, चंद्रकांत निकम या तेरा संचालकांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी सदरचा ठराव दाखल करून घेतला असून, त्यांच्या समक्ष पुन्हा सर्व संचालकांना स्वाक्षऱ्या करण्यास भाग पाडले.४४ कोटींचे नुकसानबाजार समितीच्या पैशातून शेतकरी हिताचे निर्णय न घेता स्वत:ची जाहिरातबाजी पिंगळे यांनी केली असून, राज्य सहकारी बॅँकेच्या सामोपचार परतफेडी योजनेत पैसे न भरल्याने पिंगळे यांनी बाजार समितीचे ४४ कोटींचे नुकसान केल्याचेही या पत्रात म्हटले आहे. या सर्व घटनांमुळे सभापती पिंगळे यांच्यावर विश्वास राहिला नसल्याने त्यांच्याविरुद्ध अविश्वास ठराव व्यक्त करण्यासाठी विशेष सभा बोलविण्यात यावी, अशी विनंतीही करण्यात आली आहे.