शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
2
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
3
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
4
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
5
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
6
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
7
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
8
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
9
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
10
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
11
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
12
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
13
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
14
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
15
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
16
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
17
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
18
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
19
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
20
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला

पिंगळे यांच्या विरुद्ध अविश्वास

By admin | Updated: June 24, 2017 01:01 IST

नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती देवीदास पिंगळे यांच्यावर गैरव्यवहार व मनमानी कारभाराचा ठपका ठेवत बाजार समितीच्या अठरा पैकी तेरा सदस्यांनी अविश्वास व्यक्त केला

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती देवीदास पिंगळे यांच्यावर गैरव्यवहार व मनमानी कारभाराचा ठपका ठेवत बाजार समितीच्या अठरा पैकी तेरा सदस्यांनी अविश्वास व्यक्त केला असून, त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन अविश्वास ठराव सादर केला आहे. विशेष म्हणजे २०१५ मध्ये पिंगळे यांच्या गटातून निवडून आलेल्या संचालकांनीच त्यांच्याविरोधात बंड पुकारल्यामुळे राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत. गेल्या आठवड्यापासून पिंगळे यांच्या विरोधात विरोधकांनी जमवाजमव सुरू केली होती. गुरुवारीच जिल्हाधिकाऱ्यांकडे अविश्वास दाखल करण्याची तयारी पूर्ण झाली होती. तथापि, पिंगळे यांनी स्वत:हून सभापतिपदाचा राजीनामा देण्याची तयारी दर्शविल्याने ही मोहीम थांबली होती. शुक्रवारी मात्र तेराही संचालकांनी आपल्या समर्थकांसह जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन अविश्वास ठराव दाखल केला व महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी विक्री अधिनियमानुसार बाजार समितीची विशेष सभा बोलविण्याची विनंती केली आहे. अविश्वास ठराव दाखल करण्यामागे या संचालकांची कारणे दिली असून, त्यात म्हटले आहे की, सभापती पिंगळे यांनी सुरुवातीपासूनच बाजार समितीत मनमानी कारभार चालविला असून, कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता निधीचे सुमारे ५३ लाख रुपये त्यांनी परस्पर हडप केल्याच्या कारणावरून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे तसेच न्यायालयाने त्यांना बाजार समितीच्या कारभारात हस्तक्षेप करण्यापासून रोखल्यामुळे बाजार समितीची तसेच संचालकांची बदनामी झाली आहे. समितीच्या सभेमध्ये चर्चा न झालेल्या विषयांचे ठराव घुसविण्याचे तसेच विषय पत्रिकेत नसलेल्या विषयांना मान्यता देण्याचे प्रकारही त्यांच्याकडून घडले आहेत.  या ठरावावर शिवाजी चुंभळे, तुकाराम पेखळे, संपत सकाळे, युवराज कोठुळे, विमलबाई जुंद्रे, विश्वास नागरे, संजय तुंगार, रवींद्र भोये, श्यामराव गावित, भाऊसाहेब खांडबहाले, जगदिश अपसुंदे, संदीप पाटील, चंद्रकांत निकम या तेरा संचालकांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी सदरचा ठराव दाखल करून घेतला असून, त्यांच्या समक्ष पुन्हा सर्व संचालकांना स्वाक्षऱ्या करण्यास भाग पाडले.४४ कोटींचे नुकसानबाजार समितीच्या पैशातून शेतकरी हिताचे निर्णय न घेता स्वत:ची जाहिरातबाजी पिंगळे यांनी केली असून, राज्य सहकारी बॅँकेच्या सामोपचार परतफेडी योजनेत पैसे न भरल्याने पिंगळे यांनी बाजार समितीचे ४४ कोटींचे नुकसान केल्याचेही या पत्रात म्हटले आहे. या सर्व घटनांमुळे सभापती पिंगळे यांच्यावर विश्वास राहिला नसल्याने त्यांच्याविरुद्ध अविश्वास ठराव व्यक्त करण्यासाठी विशेष सभा बोलविण्यात यावी, अशी विनंतीही करण्यात आली आहे.