शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
3
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
4
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
5
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
6
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
7
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
8
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
9
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
10
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
11
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
12
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
13
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
14
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
15
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
16
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
17
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
18
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
19
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
20
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?

बसथांब्यावर खासगी मोटारींचा अनधिकृत थांबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2017 00:13 IST

नवविकसित भागातील वाढत्या समस्यांची झळ सामान्य नागरिकांना लागत आहे. वडाळा-पाथर्डी रस्त्यावरील सार्थकनगर बसथांब्यासमोरच पालकवर्ग आणि विद्यार्थी वाहतूक करणाºया वाहनधारकांची वाहने रस्त्यावरच उभी राहत असल्याने रस्त्यावर तासन्तास वाहतुकीची कोंडी होते. परंतु त्यापेक्षा महत्त्वाचे म्हणजे बस आणि अन्य वाहनांमुळे एखाद्या विद्यार्थ्याच्या जिवावर बेतू शकते.

संजय शहाणे ।इंदिरानगर : नवविकसित भागातील वाढत्या समस्यांची झळ सामान्य नागरिकांना लागत आहे. वडाळा-पाथर्डी रस्त्यावरील सार्थकनगर बसथांब्यासमोरच पालकवर्ग आणि विद्यार्थी वाहतूक करणाºया वाहनधारकांची वाहने रस्त्यावरच उभी राहत असल्याने रस्त्यावर तासन्तास वाहतुकीची कोंडी होते. परंतु त्यापेक्षा महत्त्वाचे म्हणजे बस आणि अन्य वाहनांमुळे एखाद्या विद्यार्थ्याच्या जिवावर बेतू शकते. पंचवटी येथील सेवाकुंज येथे झालेल्या अपघातात अशाच प्रकारे एका बालकाचा मृत्यू झाला होता. अशा दुर्घटनेच्या पुनरावृत्ती होण्याची वाट तर वाहतूक पोलीस बघत नाही ना, असा भावना नागरिक व्यक्त करीत आहेत.वडाळा-पाथर्डी रस्त्यालगतच इंदिरानगर, कलानगर, सार्थकनगर, रामनगर, सदिच्छानगर, पांडवनगरी, सराफनगर यांसह विविध उपनगरे आहेत. बहुतेक नागरिक वडाळा-पाथर्डी रस्त्याचा वापर करतात. अंबड औद्योगिक वसाहत व देवळाली कॅम्पला हा जवळचा रस्ता असल्याने दिवसभर वाहनांची मोठी वर्दळ सुरू असते. नागपूरच्या धर्तीवर म्हणजे एज टू एज रस्ता रुंदीकरणाचे काम झाल्याने वाहतूक सुरळीत होईल, असे सांगितले जात होते. परंतु येथे घडले भलतेच, रुंद रस्त्यामुळे बेदरकारपणे रस्त्यावर धावणारी वाहने तसेच रस्त्याच्या कडेला उभ्या असणाºया मोटारींमुळे वेगळीच धोकादायक स्थिती निर्माण झाली आहे.सार्थकनगर बसथांब्यासमोरच एक प्राथमिक आणि माध्यमिक विद्यालय आहे. त्याठिकाणी सकाळी ८ वाजता, सकाळी ११च्या सुमारास आणि दुपारी साडेचार वाजेच्या दरम्यान विद्यार्थ्यांना ने-आण करण्यासाठी येणाºया पालकांची दुचाकी आणि चारचाकी वाहने सर्रास रस्त्यावरच लावली जातात. त्यामुळे दिवसभरातून तीन ते चार वेळेस वाहतुकीस रस्ता जणू काही बंदच होतो.  या कालावधीत मार्गक्रमण करणाºया अन्य वाहनधारक आणि पादचाºयांना अक्षरश: तारेवरची कसरत करावी लागते. लाखो रुपये खर्च करून तयार केलेला हा रस्ता वाहतुकीसाठी आहे की वाहनतळासाठी असा प्रश्न संतप्त नागरिक करू लागले आहेत. या विद्यार्थी वाहतूक करणाºयांच्या वाहनांमुळे लगतच असलेल्या अपार्टमेंट व सोसायटीतील रहिवाशांना बाहेर जाणेसुद्धा मुश्कील झाले आहे. तातडीने वाहतुकीस रस्ता मोकळा करावा, अशी मागणी त्रस्त नागरिकांनी केली आहे. (क्रमश:)